शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

फळभाज्या महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:53 IST

श्रावण महिन्यामुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने बहुतेक सर्वच फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरचीने ग्राहकांना झटका देण्यास सुरुवात केली आहे

पुणे : श्रावण महिन्यामुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने बहुतेक सर्वच फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरचीने ग्राहकांना झटका देण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ बाजारात दोन्ही भाज्यांचे भाव प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. इतर फळभाज्यांचे भाव ४० ते ५० रुपयांच्या जवळपास आहेत. पालेभाज्यांनी मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे.मागील काही दिवसांपासून सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच अनेक भागांत पेरण्यांची कामे सुरू असून शेतकरीवर्ग त्यातच गुंतला आहे. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. या काळात भाज्यांची लागवड काही प्रमाणात कमी होते. तसेच पावसामुळे त्याची काढणीही करताना अडचणी येतात. जास्त पावसामुळे पालेभाज्यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पालेभाज्या फार काळ टिकत नाहीत. त्यातच तीन दिवसांपासून श्रावण महिना सुरू झाल्याने भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी आणि आवक याचे समीकरण बिघडल्याने सध्या बहुतेक भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सध्या भाज्यांची आवक सुमारे २० टक्क्यांनी कमी होत आहे. सुमारे ७० ते ८० ट्रकएवढीच आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांना चढ्या भावाने भाज्यांची खरेदी करावी लागत आहे.घाऊक बाजारातील भाव व किरकोळ बाजारातील भावांत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. काही भागांत किरकोळमध्ये टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ७० ते ७५ रुपये, तर हिरवी मिरचीची ८० ते ८५ रुपयांनी विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात हे भाव साधारणपणे प्रतिदहा किलोमागे अनुक्रमे ५०० ते ६५० आणि ३५० ते ४०० रुपये एवढा आहे. हिरवी मिरचीमध्ये खराब मालाचे प्रमाण अधिक असल्याने भाव अधिक असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. ‘श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दरवर्षी भाज्यांचे भाव वाढतात. तरीही यंदा मागील महिन्यात पावसाने दिलेली ओढ आणि काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.फळभाज्यांचे भाव तेजीत असले तरी ग्राहकांना पालेभाज्यांनी दिलासा दिला आहे. आवक चांगली होत असल्याने बहुतेक पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथीसह बहुतेक भाज्यांची विक्री जुडीमागे १० ते १५ रुपयांनी होत आहे. कांदा पातीचे भाव केवळ २० ते २५ रुपयांपर्यंत आहेत.