शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

फळभाज्या महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:53 IST

श्रावण महिन्यामुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने बहुतेक सर्वच फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरचीने ग्राहकांना झटका देण्यास सुरुवात केली आहे

पुणे : श्रावण महिन्यामुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने बहुतेक सर्वच फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरचीने ग्राहकांना झटका देण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ बाजारात दोन्ही भाज्यांचे भाव प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. इतर फळभाज्यांचे भाव ४० ते ५० रुपयांच्या जवळपास आहेत. पालेभाज्यांनी मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे.मागील काही दिवसांपासून सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच अनेक भागांत पेरण्यांची कामे सुरू असून शेतकरीवर्ग त्यातच गुंतला आहे. त्यामुळे भाज्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. या काळात भाज्यांची लागवड काही प्रमाणात कमी होते. तसेच पावसामुळे त्याची काढणीही करताना अडचणी येतात. जास्त पावसामुळे पालेभाज्यांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पालेभाज्या फार काळ टिकत नाहीत. त्यातच तीन दिवसांपासून श्रावण महिना सुरू झाल्याने भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी आणि आवक याचे समीकरण बिघडल्याने सध्या बहुतेक भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सध्या भाज्यांची आवक सुमारे २० टक्क्यांनी कमी होत आहे. सुमारे ७० ते ८० ट्रकएवढीच आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांना चढ्या भावाने भाज्यांची खरेदी करावी लागत आहे.घाऊक बाजारातील भाव व किरकोळ बाजारातील भावांत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. काही भागांत किरकोळमध्ये टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ७० ते ७५ रुपये, तर हिरवी मिरचीची ८० ते ८५ रुपयांनी विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात हे भाव साधारणपणे प्रतिदहा किलोमागे अनुक्रमे ५०० ते ६५० आणि ३५० ते ४०० रुपये एवढा आहे. हिरवी मिरचीमध्ये खराब मालाचे प्रमाण अधिक असल्याने भाव अधिक असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. ‘श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दरवर्षी भाज्यांचे भाव वाढतात. तरीही यंदा मागील महिन्यात पावसाने दिलेली ओढ आणि काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.फळभाज्यांचे भाव तेजीत असले तरी ग्राहकांना पालेभाज्यांनी दिलासा दिला आहे. आवक चांगली होत असल्याने बहुतेक पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथीसह बहुतेक भाज्यांची विक्री जुडीमागे १० ते १५ रुपयांनी होत आहे. कांदा पातीचे भाव केवळ २० ते २५ रुपयांपर्यंत आहेत.