शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची चोरी

By admin | Updated: August 2, 2016 02:39 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्येच शेतमालाची चोरी होवू लागली आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्येच शेतमालाची चोरी होवू लागली आहे. रात्री ३ ते सकाळी ७ दरम्यान कामगारच भाजीपाल्याची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनीही याविषयी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासनाला चोरी थांबविण्यात अपयश आले आहे. राज्य शासनाने भाजीपाल्याची थेट विक्री करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्यभरातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मालाला बाजार समितीमध्येच संरक्षण मिळत असल्याचा दावा करण्यात आला. शेतकऱ्यांनीही बाजार समित्यांवर विश्वास ठेवून आपला माल तेथेच विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. परंतु वास्तवामध्ये मुुंबई बाजारसमितीमध्येच शेतकऱ्यांच्या मालाची चोरी होत असल्याचे निदर्शनास आला आहे. भाजीपाला मार्केटमधील व्यवहार पहाटे तीन वाजता सुरू होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यासह गुजरात, कर्नाटकवरूनही कृषीमाल विक्रीसाठी येत असतो. कृषी माल खाली करण्यासाठी रोजंदारीवर काम करणारे व काही प्रमाणात माथाडी कामगार मालाची चोरी करत आहेत. ४०० ते ५०० कामगार डोक्यावर गोणीचा झोला घेवून मालाची चढ-उतार करत असतात. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पाठविलेला माल काढून त्या गोणीमध्ये ठेवला जातो. पहाटेपर्यंत अनेकजण ५ ते २५ किलो भाजीपाला काढतात. पूर्वी हा माल साठविण्यासाठी प्रत्येक गाळ्यात पेट्या ठेवल्या जात होत्या. परंतु त्याला आक्षेप घेतल्यामुळे आता कपडे व इतर साहित्य ठेवण्याच्या ठिकाणी हा माल ठेवला जातो. यामधील काही मार्केटमध्येच किरकोळ विक्रेत्यांना विकला जातो. उर्वरित माल कामगार घरी घेवून जातात. चोरी केलेल्या मालाची कोपरखैरणे व इतर ठिकाणी विक्री केली जात आहे. कोपरखैरणे सेक्टर ५, ६, १५ मध्ये रोडवर सायंकाळी भाजीपाल्याची विक्री सुरू असते. यामधील ९० टक्के माल चोरीचा असतो. एपीएमसीमध्ये रोज ५०० ते ६५० ट्रक व टेंपोची आवक होत असते. १८०० ते २२०० टन माल विक्रीसाठी येत असतो. यामुळे कामगारांनी थोडासा माल काढून घेतला तर त्याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही. परंतु प्रत्येकाने थोडा माल काढला तरी रोज ३ ते ४ टन मालाची चोरी होत आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ोतकऱ्यांच्या मालाचे वजन कमी भरल्याने साहजिकच त्यांना पैसेही कमी मिळतात. या व्यतिरिक्तही एपीएमसीमधील अनेक वाहनचालक, गाळ्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती व इतर कामगारही स्वत:च्या घरी फुकट भाजीपाला घेवून जात आहेत. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू आहे. व्यापारी संघटनांनी याबाबत अनेक वेळा तक्रार केली होती. यानंतर चोरीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी अद्याप ते पूर्णपणे थांबलेले नाही.>व्यापाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांच्या मालाची चोरी थांबविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. या तक्रारीनंतर मार्केटमध्ये चोरीचा माल खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिला विक्रेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. गाळ्यांमध्ये चोरीचा माल ठेवण्यासाठीच्या पेट्या उचलण्यास लावले आहे. परंतु यानंतरही कामगारांकडून व इतर घटकांकडून होणारी चोरी थांबत नसून यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रामाणिक कामगारांचीही बदनामी भाजीपाला मार्केटमध्ये अनेक माथाडी कामगार प्रामाणिकपणे कृषी मालाची चढ - उतार करण्याचे काम करतात. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे व संघटनेनेही शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होवू नये अशा सूचना दिल्याने त्याचे पालन केले जाते. परंतु यानंतरही ४०० ते ५०० कामगारांनी अद्याप चोरी थांबविलेली नाही. यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या ठरावीक कामगारांमुळे प्रामाणिक कामगारांचीही प्रतिमा मलिन होत आहे. अशी होते चोरी एपीएमसीमध्ये पहाटे तीन वाजेपासून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होते. मालाची चढ - उतार करणारे कामगार प्रत्येक गोणीमधून थोडासा माल काढतात व डोक्यावर मागील बाजूला सोडलेल्या झोल्यामध्ये (बारदानाची गोणी ) तो माल टाकला जातो. पहाटेपर्यंत अनेकांकडे ५ ते २५ किलोचा माल जमा होतो. काही जण तेथेच किरकोळ विक्रेत्यांना त्याची विक्री करतात. अनेक जण घरी घेवून जातात व ते वास्तव्य करत असलेल्या परिसरात त्याची विक्री करतात. याशिवाय वाहनचालक व इतर अनेक जण घरी वापरण्यासाठीही भाजीपाला घेवून जात आहेत.