शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

नवी मुंबईत भाजीपाला विक्री सुविधा

By admin | Updated: January 7, 2017 02:55 IST

जिल्ह्यातील शेतीउत्पादक शेतकऱ्यांस त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा

जयंत धुळप,

अलिबाग- जिल्ह्यातील शेतीउत्पादक शेतकऱ्यांस त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळावा आणि ग्राहकाला तो माल वाजवी दरात खरेदी करता यावा, या हेतूंच्या शासनाच्या माध्यमातून आॅगस्ट २०१६ पासून हाती घेण्यात आलेले ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान’ शेतकरी आणि ग्राहक या उभयतांकरिता एक वरदान ठरत आहे. पुणे कृषी पणन मंडळाकडून या आठवडे बाजाराकरिता जागा उपलब्ध करून देण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात बेलापूर (नवी मुंबई) येथील सुनील गावस्कर मैदान येथे पेण तालुक्यातील चार, तर कर्जत व उरण तालुक्यांतील प्रत्येकी एक, अशा सहा शेतकऱ्यांच्या एकूण १७५० किलो भाजीपाल्याची विक्रमी विक्री झाली आहे. त्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळत असल्याची माहिती कृ षी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.अभियानांतर्गत आदिती उत्पादक कंपनी (वडखळ-पेण) यांनी कारली, वांगी, फरसबी, मिरची, दुधी, कांदा पात, मेथी, मुळा, कोबी, टोमॅटो, घेवडा असा एकूण ६३० किलो भाजीपाला आठवडा बाजारामध्ये विक्री केला. कर्जत तालुक्यातील सोमजाई शेतकरी उत्पादक गट लाखरण यांनी टोमॅटो, काकडी, मिरची, फरसबी, पाल, मेथी, मुळा असा एकूण १७० किलो भाजीपाला आठवडा बाजारामध्येविक्री केला. तर उरण तालुक्यातील चंद्रकांत धनाजी ठाकूर (केगांव) यांनी काकडी, कारली, टोमॅटो, वांगी, वाल, पालक, दुधी, मुळा, मिरची, कोबी असा एकूण ९५० किलो भाजीपाला विक्र ी केला. या आठवडा बाजारामध्ये शेतकरी उत्पादक गटांना चांगला हमीभाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपला उत्पादित शेतमाल पणन मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या जागेमध्ये नेऊन त्या ठिकाणी विक्री करावयाचा आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व ग्राहकाला वाजवी दरात तो मिळेल. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना आपला उत्पादित शेतमाल सुनील गावस्कर मैदान सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे दर शनिवारी, वाशी सेक्टर-४ येथे दर रविवारी, विधानभवन मुंबई येथे दर रविवारी आठवडी बाजारातविक्रीकरिता नेता येणार असून, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. >शेतकऱ्यांना हमीभावजिल्ह्यातील १५ तालुक्यांतील सुमारे ४७०० शेतकरी भाताच्या खरीप हंगामानंतर वाल, तोंडली व इतर भाजीपाला लागवड करतात. या अभियानाच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना नवी, खात्रिशीर आणि हमीभावाची व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे. बेलापूरनंतर आता वाशी आणि विधानभवन येथे थेट भाजीपाला विक्र ी सुविधा केंद्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संधीचा लाभ घेण्याकरिता व अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कार्यालयातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्कसाधण्याचे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक एस.एस.डावरे यांनी केले आहे.