शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अडतमुक्ती नाहीच!

By admin | Updated: September 16, 2016 01:06 IST

शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्री करण्यापासून बंधनमुक्त केले असले तरी शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ मात्र कायम आहे.

विवेक चांदूरकर , बुलडाणाशासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्री करण्यापासून बंधनमुक्त केले असले तरी शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ मात्र कायम आहे. खुल्या बाजारात भाजीपाला विक्री करीत असताना शेतकऱ्यांना उचल मागण्यात येत असून, अडतीचे दोन टक्के पैसे आता ‘उचल’ साठी द्यावे लागत आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यामधील शेतमाल नागपूर, पुणे यासह मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी नेण्यात येतो. तसेच बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील भाजीपाल्याची अमरावती येथे विक्री करण्यात येते. शासनाने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीतच भाजीपाल्याची विक्री करण्याच्या बंधनातून मुक्त केले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी बाजार समिती वगळता अन्य ठिकाणी व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी शेतमाल घेऊन जातात; मात्र त्यानंतरही त्यांची लूटच करण्यात येते. शेतकरी व्यापाऱ्याकडे भाजीपाला विक्रीसाठी घेऊन गेल्यावर मनभावी ठरविण्यात येतात. त्यानंतर एकूण भावाच्या दोन टक्के शेतकऱ्यांना उचल द्यावी लागत आहे. खुल्या बाजारात अडत घेण्यावर बंदी असल्यामुळे व्यापारी अडत घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांना मिळत असलेल्या बिलावर अडत टाकता येत नाही. त्यावर व्यापाऱ्यांनी पळवाट शोधली असून, सदर भाजीपाला खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांना उचल मागण्यात येते. शेतकऱ्यांना माल विक्रीच्या पूर्वी उचल द्यावी लागते. व्यापाऱ्यांच्या या मनमानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच शासनाच्या निर्णयाचाही शेतकऱ्यांना फायदा होत नाही. भाड्याने वाहन करून बाजारात भाजीपाला घेऊन गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावीच लागते. याचाच फायदा व्यापारी घेत आहे. शेतकऱ्यांना भुर्दंडव्यापारी शेतकऱ्यांना दोन टक्के उचल मागतात. एखाद्या शेतकऱ्याने उचल देण्यास विरोध केला, तर त्याच्या मालाची खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर गाडी भाड्याचा भुर्दंड बसतो. तसेच भाजीपाल्याचीही नासाडी होते.