शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अडतमुक्ती नाहीच!

By admin | Updated: September 16, 2016 01:06 IST

शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्री करण्यापासून बंधनमुक्त केले असले तरी शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ मात्र कायम आहे.

विवेक चांदूरकर , बुलडाणाशासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्री करण्यापासून बंधनमुक्त केले असले तरी शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ मात्र कायम आहे. खुल्या बाजारात भाजीपाला विक्री करीत असताना शेतकऱ्यांना उचल मागण्यात येत असून, अडतीचे दोन टक्के पैसे आता ‘उचल’ साठी द्यावे लागत आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यामधील शेतमाल नागपूर, पुणे यासह मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी नेण्यात येतो. तसेच बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील भाजीपाल्याची अमरावती येथे विक्री करण्यात येते. शासनाने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीतच भाजीपाल्याची विक्री करण्याच्या बंधनातून मुक्त केले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी बाजार समिती वगळता अन्य ठिकाणी व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी शेतमाल घेऊन जातात; मात्र त्यानंतरही त्यांची लूटच करण्यात येते. शेतकरी व्यापाऱ्याकडे भाजीपाला विक्रीसाठी घेऊन गेल्यावर मनभावी ठरविण्यात येतात. त्यानंतर एकूण भावाच्या दोन टक्के शेतकऱ्यांना उचल द्यावी लागत आहे. खुल्या बाजारात अडत घेण्यावर बंदी असल्यामुळे व्यापारी अडत घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांना मिळत असलेल्या बिलावर अडत टाकता येत नाही. त्यावर व्यापाऱ्यांनी पळवाट शोधली असून, सदर भाजीपाला खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांना उचल मागण्यात येते. शेतकऱ्यांना माल विक्रीच्या पूर्वी उचल द्यावी लागते. व्यापाऱ्यांच्या या मनमानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच शासनाच्या निर्णयाचाही शेतकऱ्यांना फायदा होत नाही. भाड्याने वाहन करून बाजारात भाजीपाला घेऊन गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावीच लागते. याचाच फायदा व्यापारी घेत आहे. शेतकऱ्यांना भुर्दंडव्यापारी शेतकऱ्यांना दोन टक्के उचल मागतात. एखाद्या शेतकऱ्याने उचल देण्यास विरोध केला, तर त्याच्या मालाची खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर गाडी भाड्याचा भुर्दंड बसतो. तसेच भाजीपाल्याचीही नासाडी होते.