शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

लग्नसराईमुळे वाढतेय भाज्यांची मागणी!

By admin | Updated: May 10, 2017 00:11 IST

सध्या भाजीबाजारात किरकोळ ग्राहकांकडून फारसा उठाव असली; तरी लग्नसराईमुळे फरसबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, गाजर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सध्या भाजीबाजारात किरकोळ ग्राहकांकडून फारसा उठाव असली; तरी लग्नसराईमुळे फरसबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, गाजर, सिमला मिरची या भाज्यांना मात्र चांगलीच मागणी आहे. फरसबीचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने या भाजीकडे तर सामान्य ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. पण कॅटरर्सकडून मात्र तिची मागणी वाढती असल्याचे ठाण्यातील भाजीविक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर पन्नाशीच्या पुढेच आहेत. वाटाणा, गवार, शेवग्याच्या शेंगा तर ८० आणि १०० घरात पोचल्या आहेत. पण या सर्व भाज्यांमध्ये सध्या भाव खात आहे, ती म्हणजे फरसबी. आधी फरसबी ६० रुपये किलोने विकली जात होती. परंतु उत्पादन घटल्याने आणि त्याचवेळी लग्नसराईमुळे मागणी झपाट्याने वाढत गेल्याने या भाजीने सध्या दरामध्ये द्विशतकाचा उंबरठा गाठला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक फरसबीच्या खरेदीकडे वळत नसल्याचे भाजी विक्रेते संदीप भुजबळ यांनी सांगितले. लग्नसराईत वेगवेगळ््या भाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदा फरसबीसोबतच फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, गाजर, सिमला मिरची या भाज्यांना मागणी आहे. या भाज्यांचे दर सर्व सामान्यांना परवडणारे नसल्याने या भाज्यांनी खरेदी सामान्य ग्राहक फारशी करत नाही. परंतु त्यांना कॅटरर्स आणि हॉटेलवाल्यांकडून मात्र मागणी असल्याचे भाजीविक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.भाज्यांची नावेदर -फरसबी २००फ्लॉवर ६०कोबी ६०वाटाणा १००टोमॅटो ३०सिमला मिरची ६० गवार ८०शेवग्याच्या शेंगा १२०कारले ८०भेंडी ६०तोंडली ६०वांगे ६०शिराळी ८०दूधी ५० ते ६०मिरच्या १२०गाजर ६०काकडी ४०बीट ६०