शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने भाजीपाला महागला

By admin | Updated: June 20, 2016 04:10 IST

रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट

प्राची सोनवणे,नवी मुंबईरोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट तसेच अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटले आहे. वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारपेठेतही भाज्यांची आवक घटली असून आठवडाभरात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.पाणीटंचाईमुळे भाजीपाला उत्पादकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वाढत्या दरांमुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ५०० ते ५५० ट्रक आणि टेम्पोची आवक होत होती. या आठवड्यात सरासरी ३०० ते ३५० ट्रक आणि टेम्पोची आवक झाली आहे. टोमॅटोचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टोमॅटोचे भाव दुपटीने वाढले आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आवक घटल्याने आणि उत्पादनापेक्षा मागणी वाढत असल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ९० रुपये किलो दराने विकली जाणारी फरसबी सध्या ११० रुपये किलोने दराने उपलब्ध आहे. गवार ८० ते ९० रुपये, घेवडा १७० ते १८० रुपये, भेंडी ६० ते ७५ रुपये, दोडके १०० ते १२० रुपये, कोबी ४० ते ५०, फ्लॉवर ८० ते ९० रुपये, शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये, तोंडली ६० ते ७० रुपये, वांगी ६० ते ७० रुपये, दुधी ७० ते ८० रुपये, कोथिंबीरची एक जुडी १० ते ३० रुपये तर पालेभाजीची एक जुडी २० ते ३० रुपये दराने विकली जात आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.