शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आवक घटल्याने भाजीपाला महागला

By admin | Updated: June 20, 2016 04:10 IST

रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट

प्राची सोनवणे,नवी मुंबईरोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट तसेच अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटले आहे. वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारपेठेतही भाज्यांची आवक घटली असून आठवडाभरात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.पाणीटंचाईमुळे भाजीपाला उत्पादकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वाढत्या दरांमुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ५०० ते ५५० ट्रक आणि टेम्पोची आवक होत होती. या आठवड्यात सरासरी ३०० ते ३५० ट्रक आणि टेम्पोची आवक झाली आहे. टोमॅटोचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टोमॅटोचे भाव दुपटीने वाढले आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आवक घटल्याने आणि उत्पादनापेक्षा मागणी वाढत असल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ९० रुपये किलो दराने विकली जाणारी फरसबी सध्या ११० रुपये किलोने दराने उपलब्ध आहे. गवार ८० ते ९० रुपये, घेवडा १७० ते १८० रुपये, भेंडी ६० ते ७५ रुपये, दोडके १०० ते १२० रुपये, कोबी ४० ते ५०, फ्लॉवर ८० ते ९० रुपये, शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये, तोंडली ६० ते ७० रुपये, वांगी ६० ते ७० रुपये, दुधी ७० ते ८० रुपये, कोथिंबीरची एक जुडी १० ते ३० रुपये तर पालेभाजीची एक जुडी २० ते ३० रुपये दराने विकली जात आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.