शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

मुलींच्या शिक्षणासाठी वसुंधरेचे ममत्व

By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST

समाजात आजही अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीने स्वीकारली आहे.

रद्दी गोळा करून करतात शिक्षणाचा खर्च : २८ मुलींची स्वीकारली जबाबदारीनागपूर : समाजात आजही अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीने स्वीकारली आहे. संवेदनांची जाणीव असणाऱ्या क ाही व्यक्तींनी या संस्थेची स्थापना केली असून, गेल्या चार वर्षापासून मुलींचे निवासी वसतिगृह चालवित आहे. यासाठी काही निधी स्वत:च्या खिशातून तर काही निधी रद्दी गोळा करून भागवित आहे. वैशालीनगर येथे वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीद्वारे संचालित मुलींचे निवासी वसतिगृह आहे. येथे विदर्भातील अतिशय गरीब, आईवडिलांचे छत्र हरविलेल्या, कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही अशा मुली ज्या शिक्षणापासून वंचित आहे, यांना निवाऱ्याबरोबरच शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षापासून हे वसतिगृह अतिशय जबाबदारीने कर्तव्य बजावत आहे. येथे मुलींना राहण्याची, खाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्था पूर्ण करते. त्यांच्यासाठी बसची सोय, ट्यूशनची सोय करण्यात आली आहे. वर्ग ४ ते वर्ग ११ च्या मुली सध्या येथे निवासाला आहे. या उपक्रमासाठी संस्थेला महिन्याला ५० हजार रुपये खर्च लागतो. १३ हजार रुपये किराया तर वसतिगृहाचा द्यावा लागतो. संस्थेचे सदस्य स्वत:च्या खिशातून हा सर्व खर्च करतात. त्याचबरोबर दर रविवारी घरोघरी फिरून रद्दी गोळा करतात. ही रद्दी विकून आलेल्या पैशातून मुलींच्या शिक्षणावर खर्च करतात. संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे या मुलींनी परीक्षेत भरघोस यश मिळविले आहे. एक मुलगी तर आयएएसची तयारी करीत आहे. या मुलींना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. वसुंधरा संस्थेचा झुनका भाकरचा स्टॉल उद्योजिक मेळाव्यात लागला आहे. या स्टॉलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातून गोळा झालेला निधी मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)उपक्रमात योगदानसामाजिक कार्यकर्ते नागेश पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. सध्या ते संरक्षक म्हणून या उपक्रमाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्यासोबत हर्षा पाटील, मंजुषा गोटेकर, माधुरी रामटेके, मीना पाटील, स्मिता हाडके, सुनिता पाटील, माधुरी रंगारी, सचिन रामटेके, राजेश हाडके, मनीष पाटील यांचे या उपक्रमात संपूर्ण योगदान आहे. समाजानेही खारीचा वाटा स्वीकारावाया निराधार मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वसुंधरा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. यासाठी समाजातील काही सज्जनशील, क्रियाशील व्यक्तीच्या सहकार्याची गरज आहे. स्वत:च्या घासातला एक घास या चिमण्यांच्या मुखात घालावा, त्यांना मायेचे उबदार पांघरुण द्यावे. तरच हा आनंदाचा झरा अव्याहतपणे वाहत राहील, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.