शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

मुलींच्या शिक्षणासाठी वसुंधरेचे ममत्व

By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST

समाजात आजही अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीने स्वीकारली आहे.

रद्दी गोळा करून करतात शिक्षणाचा खर्च : २८ मुलींची स्वीकारली जबाबदारीनागपूर : समाजात आजही अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीने स्वीकारली आहे. संवेदनांची जाणीव असणाऱ्या क ाही व्यक्तींनी या संस्थेची स्थापना केली असून, गेल्या चार वर्षापासून मुलींचे निवासी वसतिगृह चालवित आहे. यासाठी काही निधी स्वत:च्या खिशातून तर काही निधी रद्दी गोळा करून भागवित आहे. वैशालीनगर येथे वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीद्वारे संचालित मुलींचे निवासी वसतिगृह आहे. येथे विदर्भातील अतिशय गरीब, आईवडिलांचे छत्र हरविलेल्या, कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही अशा मुली ज्या शिक्षणापासून वंचित आहे, यांना निवाऱ्याबरोबरच शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षापासून हे वसतिगृह अतिशय जबाबदारीने कर्तव्य बजावत आहे. येथे मुलींना राहण्याची, खाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्था पूर्ण करते. त्यांच्यासाठी बसची सोय, ट्यूशनची सोय करण्यात आली आहे. वर्ग ४ ते वर्ग ११ च्या मुली सध्या येथे निवासाला आहे. या उपक्रमासाठी संस्थेला महिन्याला ५० हजार रुपये खर्च लागतो. १३ हजार रुपये किराया तर वसतिगृहाचा द्यावा लागतो. संस्थेचे सदस्य स्वत:च्या खिशातून हा सर्व खर्च करतात. त्याचबरोबर दर रविवारी घरोघरी फिरून रद्दी गोळा करतात. ही रद्दी विकून आलेल्या पैशातून मुलींच्या शिक्षणावर खर्च करतात. संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे या मुलींनी परीक्षेत भरघोस यश मिळविले आहे. एक मुलगी तर आयएएसची तयारी करीत आहे. या मुलींना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. वसुंधरा संस्थेचा झुनका भाकरचा स्टॉल उद्योजिक मेळाव्यात लागला आहे. या स्टॉलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातून गोळा झालेला निधी मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)उपक्रमात योगदानसामाजिक कार्यकर्ते नागेश पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. सध्या ते संरक्षक म्हणून या उपक्रमाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्यासोबत हर्षा पाटील, मंजुषा गोटेकर, माधुरी रामटेके, मीना पाटील, स्मिता हाडके, सुनिता पाटील, माधुरी रंगारी, सचिन रामटेके, राजेश हाडके, मनीष पाटील यांचे या उपक्रमात संपूर्ण योगदान आहे. समाजानेही खारीचा वाटा स्वीकारावाया निराधार मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वसुंधरा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. यासाठी समाजातील काही सज्जनशील, क्रियाशील व्यक्तीच्या सहकार्याची गरज आहे. स्वत:च्या घासातला एक घास या चिमण्यांच्या मुखात घालावा, त्यांना मायेचे उबदार पांघरुण द्यावे. तरच हा आनंदाचा झरा अव्याहतपणे वाहत राहील, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.