शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वाशिमच्या गोपालकांचा वंदे ‘गो’ मातरमचा नारा!

By admin | Updated: July 24, 2016 14:24 IST

पशूपालनाची आवड असणा-या वाशिम परिसरातील ४० शेतक-यांनी सामूहिकरित्या वंदे ‘गो’ मातरम् या नावाने गट स्थापन करून गीर गोवंशाच्या तब्बल १०० गार्इंचे संगोपन केले.

सुनील काकडे, ऑनलाइन लोकमत 

 
वाशिम, दि. २४ - पशूपालनाची आवड असणा-या वाशिम परिसरातील ४० शेतक-यांनी सामूहिकरित्या वंदे ‘गो’ मातरम् या नावाने गट स्थापन करून गीर गोवंशाच्या तब्बल १०० गार्इंचे संगोपन केले. यामाध्यमातून मिळणारे दुध, तूप, गोमुत्राच्या विक्रीतून या गोपालकांची आर्थिक सक्षमतेकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.
 
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये वाशिमचा प्रकर्षाने समावेश होतो. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे अक्षरश: जेरीस आले आहेत. दुसरीकडे मात्र वाशिम परिसरातील ४० शेतक-यांनी सामूहिकरित्या प्रामुख्याने गुजरातच्या जंगलात वावरणा-या गीर गाईच्या संगोपनाची कास धरली.
 
यामाध्यमातून मिळणा-या दुधाची ६० रुपये प्रतिलिटरप्रमाणे विक्री केली जात असून गाईच्या शुद्ध तुपाला २,२५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. याशिवाय गाईचे गोमूत्र आणि शेणखताच्या वापरामुळे जमीन कसदार बनत असल्याची माहिती वंदे गो मातरम् शेतकरी गटाचे प्रमुख रवि मारशेटवार यांनी दिली. या गटामध्ये पशूपालक दत्ता लोनसूने, बबनराव लोनसूने, इरामल्लू बत्तूलवार, विठ्ठलराव बरडे, संतोष कोरडे, सुभाष वारकड, अतुल रंगभाळ, प्रकाश बावणे, निरखी, पवन इंगोले यांच्यासह इतर ४० गोपालकांचा समावेश आहे.