शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

वसईत एसटी धावणारच; मंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 03:34 IST

वसई आणि नालासोपारा आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा एसटीने घेतलेला निर्णय तूर्तास मागे घेतला आहे.

वसई : वसई आणि नालासोपारा आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा एसटीने घेतलेला निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. पालिकेच्या ठेकेदाराकडे पुरेशा बसेस नसल्याने पालिकेने ताबडतोबीने बस सुरु करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यातच परिवहन मंत्र्यांनी हस्तक्षेप करून बस सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तूर्तास शहरी बस वाहतूक सुरु राहणार आहे. लोकमतनेही प्रश्न लावून धरल्याने वसईत आंदोलनाची ठिणगी पडली होती. लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद केल्यानंतर वसई आणि नालासोपारा आगारातील २५ मार्गावर शहरी बस वाहतूक २१ सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळाने घेतला होता. तसे पत्र महामंडळाने वसई विरार पालिका आयुक्तांना देऊन यामार्गावर पालिकेच्या बसेस सुरु करण्यास सुचविले होते. तसेच शहरी बसेसचे विद्यार्थी आणि इतर पासेस देणेही एसटीने बंद केले होते. याप्रकरणी लोकमतने आवाज उठवल्यानंतर वसईत आंदोलन सुुरु झाले होते. या निर्णयामुळे हळुहळू लाल डबा वसईतून हद्दपार होऊन प्रवासी सेवेवर महापालिकेचे अतिक्रमण होण्याची भिती लक्षात घेवून जन आंदोलन समितीने आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने समितीने गावागावात बैठकी लावून जनजागरण केले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी नालासोपारा डेपोत एस.टी.बचाव आंदोलन करून आगार व्यवस्थापक भोसले यांना जाब विचारला. त्यावर एसटी बंद करणार नाही.असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले गेले. >२५ मार्गावर सेवा राहणार सुरू२१ सप्टेंबरपासून पालिकेने बस सेवा सुरु करावत यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र, ठेकेदाराकडे पुरेशा बसेस नसल्याने तूर्तास बस सेवा सुुरु ठेवावी, अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी परिहवन मंत्री दिवाकर रावते यांचकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत रावते यांनी गावकऱ्यांची इच्छा असेल तर बससेवा सुरु ठेवली जाईल, असा शब्द दिला. परिणामी एसटीने तूर्तास २५ शहरी बस वाहतूक सुुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी रावते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती तेंडोलकर यांनी दिली. दुसरीकडे, एसटीने शहरी वाहतूक सुरु ठेवावी यासाठी जनआंदोलनाचा रेटा कायम ठेवला जाणार आहे.