शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

वसईत एसटी धावणारच; मंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 03:34 IST

वसई आणि नालासोपारा आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा एसटीने घेतलेला निर्णय तूर्तास मागे घेतला आहे.

वसई : वसई आणि नालासोपारा आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा एसटीने घेतलेला निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. पालिकेच्या ठेकेदाराकडे पुरेशा बसेस नसल्याने पालिकेने ताबडतोबीने बस सुरु करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यातच परिवहन मंत्र्यांनी हस्तक्षेप करून बस सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तूर्तास शहरी बस वाहतूक सुरु राहणार आहे. लोकमतनेही प्रश्न लावून धरल्याने वसईत आंदोलनाची ठिणगी पडली होती. लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद केल्यानंतर वसई आणि नालासोपारा आगारातील २५ मार्गावर शहरी बस वाहतूक २१ सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळाने घेतला होता. तसे पत्र महामंडळाने वसई विरार पालिका आयुक्तांना देऊन यामार्गावर पालिकेच्या बसेस सुरु करण्यास सुचविले होते. तसेच शहरी बसेसचे विद्यार्थी आणि इतर पासेस देणेही एसटीने बंद केले होते. याप्रकरणी लोकमतने आवाज उठवल्यानंतर वसईत आंदोलन सुुरु झाले होते. या निर्णयामुळे हळुहळू लाल डबा वसईतून हद्दपार होऊन प्रवासी सेवेवर महापालिकेचे अतिक्रमण होण्याची भिती लक्षात घेवून जन आंदोलन समितीने आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने समितीने गावागावात बैठकी लावून जनजागरण केले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी नालासोपारा डेपोत एस.टी.बचाव आंदोलन करून आगार व्यवस्थापक भोसले यांना जाब विचारला. त्यावर एसटी बंद करणार नाही.असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले गेले. >२५ मार्गावर सेवा राहणार सुरू२१ सप्टेंबरपासून पालिकेने बस सेवा सुरु करावत यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र, ठेकेदाराकडे पुरेशा बसेस नसल्याने तूर्तास बस सेवा सुुरु ठेवावी, अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी परिहवन मंत्री दिवाकर रावते यांचकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत रावते यांनी गावकऱ्यांची इच्छा असेल तर बससेवा सुरु ठेवली जाईल, असा शब्द दिला. परिणामी एसटीने तूर्तास २५ शहरी बस वाहतूक सुुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी रावते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती तेंडोलकर यांनी दिली. दुसरीकडे, एसटीने शहरी वाहतूक सुरु ठेवावी यासाठी जनआंदोलनाचा रेटा कायम ठेवला जाणार आहे.