शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वसईत बंधारे गेले वाहून, किनारपट्टीची धूप सुरू

By admin | Updated: June 6, 2017 02:49 IST

मेरी टाईम बोर्डाने वसईच्या किनारपट्टीवरील धूप थांबवण्यासाठी दगडाचे बंधारे बांधले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क वसई : मेरी टाईम बोर्डाने वसईच्या किनारपट्टीवरील धूप थांबवण्यासाठी दगडाचे बंधारे बांधले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम आणि देखभारअभावी कित्येक ठिकाणचे बंधारे उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टीची धूप पुन्हा सुुरु झाली आहे.वसईच्या किनारपट्टीवर आजही अनेक ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे नाहीत. धूप प्रतिबंधक बंधारे नसल्याने मोठे उधाण आणि पावसाळ््यात उसळणाऱ्या मोठ्या लाटांच्या तडाख्याने अनेक ठिकाणच्या किनारपट्टीची धूप सुरु आहे. त्यामुळे समुद्रानजिक असलेली घरे आणि शेती-बागायतींना फटका बसत आहे.मेरी टाईम बोर्डाने किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधारे बांधलेले आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण, निकृष्ट काम आणि देखभाल नसल्याने अनेक भागातील बंधारे वाहून जाण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राच्या लाटा आणि उधाणाच्या तडाख्याने बंधाऱ्याचे दगड वाहून जात असल्याने कामाच्या दर्जाबाबतच गावकरी शंका उपस्थित करू लागले आहेत. धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याच्या कामात मोठ्या गैरव्यवहार झाल्यानेच बंधारे वाहून जाऊन किनाऱ्याची धूप पुन्हा होऊ लागली आहे, असाही गावकऱ्यांचा आरोप आहे. अनेक ठिकाणच्या बंधाऱ्याचे दगडही वाहून गेल्याने समुद्रकिनारे उध्वस्त झाले आहेत. मात्र, याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने किनारपट्टी पुन्हा धोक्यात येण्याची भिती व्यक्त करण्यात येते.