शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पावसाच्या तडाख्याने वसई जलमय

By admin | Updated: August 2, 2016 03:10 IST

गेले दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने वसईला झोडपून काढले.

वसई : गेले दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने वसईला झोडपून काढले. विरार, नालासोपारा, नवघरसह वसईच पश्चिमपट्यातील अनेक गावांमध्ये पाणी साचले होते. शनिवारपासून पावसाने वसईत जोरदार हजेरी लावली आहे. सतत कोसळत असलेल पावसाने काल रात्रीपासून वसईत अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. नेहमीप्रमाणे नालासोपारा शहर जलम झाले होते. सेेंट्रल पार्क रस्त्यासह रेल्वे उड्डाण पूलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम होत आहे. समुद्राला मोठे उधाण आल्याने किनारपट्टीवरील अनेक गावांना त्याचा फटका बसला. नाळा-वाळुंजे रस्ता पाण्याखाली गेल्याने नानभाट येथील शाळा बंद ठेवण्यात आली होती. नाळा तलाव भरून वाहू लागल्याने रस्त्यावर पाणी जमा झाले होते. सत्पाळे-राजोडी रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे हाल झाले. मुसळधार पावसाने नालासोपारा शहराला पुन्हा एकदा मोठा फटका दिला. रेल्वे उड्डाणपूलाच्या दुतर्फा पाणी आणि सेेंट्रल पार्क रस्त्यावर साचून राहिल्याने वाहतूक कोंडी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नालासोपारा पश्चिमेकडील रस्ताही पाण्याखाली गेला होता. त्यामुळे एका एटीएम सेंटरमध्ये पाणी शिरले होते. विरार पश्चिमेकडील विराटनगरात पाणी तुंबून राहिले होते. वसई रोड ते गोखीवर या मुख्य रस्त्यावर एव्हरशाईन सिटी दरम्यान प्रचंड पाणी तुंबून राहिल्याने वाहतूक कोलमडून पडली होती. या रस्त्यापलिकडे असलेल्या मीठागर पाड्याला पाण्याने वेढा दिल्याने येथील लोकांचा पुन्हा संपर्क तुटला होता. तर सनसिटी रस्ता काल रात्रीपासून पुन्हा पाण्याखाली गेल्याने यामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पावसाच्या तडाख्याने शनिवारपासून मुंबई-अहमदाबाद हायवेवर काठीयावाड ढाबा परिसरात पाणी तुंबून राहिले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या मार्गावरील वाहतूक ठाणे-भिवंडी मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र हा मार्ग अतिशय दुरवरचा आणि प्रचंड वेळ खाणारा असल्याने वाहने हावेवरून ये-जा करीत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पाणी वाहुन जाण्यासाठी अद्याप कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनांचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे एरव्ही रेती वाहतूक करणारे ट्रक आणि जड वाहनांकडून वसूली करण्यासाठी नाक्यानाक्यावर असलेले ट्रॅफिक पोलीस गायब झाले होते. कोंडी सोडवण्यासाठी पोलीस हायवेवर तैनात करण्यात आले नसल्याने संताप व्यक्त झाला. (प्रतिनिधी)>तानसाने धोक्याची पातळी ओलांडली; प्रशासन सज्जवसई/पारोळ : वसई पूर्व भागाला तानसा नदीने धोक्याची पातळी ओलदल्याने काठावरील गावांना अतिदक्षते चा इशारा देण्यात आला आहे सायवन, शिरवली, पारोळ, उसगाव, चांदीप, कोपर, खानिवडे, नवसई, हेदवडे, चिमने, इ या गावाना इशारा देण्यात आला आहे आपत कालीन परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन सज्ज झाले आहे.>वसई पूर्व भागात १५ गावांचा संपर्क तुटला : वसई पूर्व भागात दोन दिवसापासून पावसाने जोरदार तडाखा दिल्याने तानसा धोक्याची पातळी ओलाडल्याने भाताणे, शिरावली, मेढे पुल दोन दिवसापासून पाण्याखाली असल्यामुळे १५ गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शेकडो हेक्टर भातपीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्गामधे चिंतेचे वातावरण आहे. फोटो:०५ पारोळ भाताणे पूल.