शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

वसई-विरारला पावसाने झोडपले

By admin | Updated: July 2, 2016 03:27 IST

रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसईला अक्षरश: झोडपून काढले.

वसई : रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसईला अक्षरश: झोडपून काढले. नालासोपारा शहरात ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर नवघर पूर्वेकडील मीठागर पाड्याला पाण्याने चारीबाजूने वेढल्याने तेथील संपर्क तुटला होता. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.रात्री धो-धो कोसळत असलेल्या पावसाने वसईतील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत केले होते. पावसाचा मोठा फटका नालासोपारा शहराला बसला. शहरातील रेल्वे उड्डाणपूलाखालून तीनही ठिकाणी जाणारे मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर आचोळे, तुळींज आदी परिसरातही पाणी तुंबून राहिले होते. तर सोपारा गाव ते देसाई वाडी दरम्यान पाणी तुंबल्याने तेथील लोकांचे हाल झाले होते. वसई रोड येथील नवघर पूर्वेकडे असलेल्या मीठागर पाड्या शेजारील खाडीला पूर आल्याने येथील लोकांचा संपर्क तुटला होता. कमरेइतके पाणी साचून राहिल्याने दीडशे कुटुंबे अडकून पडली होती. पूर ओसरला नाही आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. वसई रोड रेल्वे स्टेशनलगत पश्चिमेकडील नवघर एसटी स्टँडमध्ये आज गुडघाभर पाणी साचून राहिल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. वसई पश्चिमेकडील काही गावांमध्येही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.>इमारतीचा पाया कोसळलाविरार : सतत पहणाऱ्या मुसळधार पावसाने विरार मध्ये न्यू मोरेश्वर नगर या चार मजली इमारतीचा पाया कोसळला. विरार पूर्व फुलपाडा रोड न्यू मोरेश्वर नगर येथे २० फूट खोल नाल्यावरच ही अनाधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. नाल्याच्या बाजूचा पाया आणि संरक्षण भिंत कोसळल्याने येथील २९ कुटुंबे संकटात सापडली आहेत. >पूरस्थितीमुळेभातरोपे वाया पारोळ/वसई : वसई पूर्व भागात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने तानसा, तुंबाडी या नद्या व जंगलातील नाले भरून वाहू लागल्याने जमीन पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नवजात भातरोप पायाखाली गेल्याने वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट वसई पूर्व भागातील शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.>केळीच्या झाडांचे नुकसान वसई : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने वसई तालुक्यातील पश्चिम पट्टङ्मातील बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान केले. येथील केळीच्या अनेक बागा उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वसई तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी तीन हजार ५०० हेक्टर बागायती शेतीचे क्षेत्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे केळीच्या बागा या काही प्रमाणावर उद्वस्त झाल्या आहेत. वसईची पश्चिम किनार पट्टी नारळ, केळीच्या बागांसाठी प्रसिध्द आहे. बनकेळी, वेलची केळी, भूर केळी अशा विविध प्रकारच्या केळींची लागवड पश्चिम किनारपट्टीवर होते. परंतु गेल्या काही दिवसापासून पडलेल्या पावसामुळे खोचीवडे, भुईगाव, रानगाव, कळंब, राजोडी, निर्मळ या ठिकाणच्या केळी आडव्या झाल्या आहेत. त्यामुुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.