शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारला पावसाने झोडपले

By admin | Updated: July 2, 2016 03:27 IST

रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसईला अक्षरश: झोडपून काढले.

वसई : रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसईला अक्षरश: झोडपून काढले. नालासोपारा शहरात ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर नवघर पूर्वेकडील मीठागर पाड्याला पाण्याने चारीबाजूने वेढल्याने तेथील संपर्क तुटला होता. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.रात्री धो-धो कोसळत असलेल्या पावसाने वसईतील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत केले होते. पावसाचा मोठा फटका नालासोपारा शहराला बसला. शहरातील रेल्वे उड्डाणपूलाखालून तीनही ठिकाणी जाणारे मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर आचोळे, तुळींज आदी परिसरातही पाणी तुंबून राहिले होते. तर सोपारा गाव ते देसाई वाडी दरम्यान पाणी तुंबल्याने तेथील लोकांचे हाल झाले होते. वसई रोड येथील नवघर पूर्वेकडे असलेल्या मीठागर पाड्या शेजारील खाडीला पूर आल्याने येथील लोकांचा संपर्क तुटला होता. कमरेइतके पाणी साचून राहिल्याने दीडशे कुटुंबे अडकून पडली होती. पूर ओसरला नाही आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. वसई रोड रेल्वे स्टेशनलगत पश्चिमेकडील नवघर एसटी स्टँडमध्ये आज गुडघाभर पाणी साचून राहिल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. वसई पश्चिमेकडील काही गावांमध्येही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.>इमारतीचा पाया कोसळलाविरार : सतत पहणाऱ्या मुसळधार पावसाने विरार मध्ये न्यू मोरेश्वर नगर या चार मजली इमारतीचा पाया कोसळला. विरार पूर्व फुलपाडा रोड न्यू मोरेश्वर नगर येथे २० फूट खोल नाल्यावरच ही अनाधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. नाल्याच्या बाजूचा पाया आणि संरक्षण भिंत कोसळल्याने येथील २९ कुटुंबे संकटात सापडली आहेत. >पूरस्थितीमुळेभातरोपे वाया पारोळ/वसई : वसई पूर्व भागात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने तानसा, तुंबाडी या नद्या व जंगलातील नाले भरून वाहू लागल्याने जमीन पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नवजात भातरोप पायाखाली गेल्याने वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट वसई पूर्व भागातील शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.>केळीच्या झाडांचे नुकसान वसई : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने वसई तालुक्यातील पश्चिम पट्टङ्मातील बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान केले. येथील केळीच्या अनेक बागा उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वसई तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी तीन हजार ५०० हेक्टर बागायती शेतीचे क्षेत्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे केळीच्या बागा या काही प्रमाणावर उद्वस्त झाल्या आहेत. वसईची पश्चिम किनार पट्टी नारळ, केळीच्या बागांसाठी प्रसिध्द आहे. बनकेळी, वेलची केळी, भूर केळी अशा विविध प्रकारच्या केळींची लागवड पश्चिम किनारपट्टीवर होते. परंतु गेल्या काही दिवसापासून पडलेल्या पावसामुळे खोचीवडे, भुईगाव, रानगाव, कळंब, राजोडी, निर्मळ या ठिकाणच्या केळी आडव्या झाल्या आहेत. त्यामुुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.