शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वारी

By admin | Updated: January 26, 2016 03:03 IST

महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार व्हावी तसेच शिक्षकांची शैक्षणिक उपयोगिता व परिणामकारकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून १०० टक्के विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ होईल

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार व्हावी तसेच शिक्षकांची शैक्षणिक उपयोगिता व परिणामकारकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून १०० टक्के विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ होईल या हेतूने ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शालेय शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३१ जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानामधून ‘लोकजागृती’ कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या उपक्रमासाठी १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. त्यानुसार बालेवाडी म्हाळुंगे, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले असून, २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता उद्घाटन होणार आहे. काय असेल वारीतलोकसहभागातून शाळा सुधारणा कशी करावे याचे मार्गदर्शन तसेच भाषा, गणित, भूगोल यात प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन यातून मिळणार आहे. लिंग समानता, मूल्यवर्धन विषयांचाही समावेश आहे. व्यवसाय शिक्षण, ई-लर्निंग, तंत्रस्नेही शिक्षण या विषयांच्या स्टॉल्सचाही समावेश असून, वारीत सहभागी होणाऱ्या शिक्षकांची आॅनलाइन पद्धतीने निवड केली आहे. (विशेष प्रतिनिधी)७ हजार शिक्षकांचा सहभाग : या वारीमध्ये निवडक ५० शिक्षणविषयक उपक्रम व शिक्षण पद्धतीचे सादरीकरण आणि प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्ह्यांतून दर दिवशी १८०० या सरासरीने सुमारे ७२०० शिक्षक २७ ते ३० जानेवारीदरम्यान भेट देणे अपेक्षित आहे. ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जनतेस हे प्रदर्शन खुले राहणार आहे.वारीमागील संकल्पना : जिल्हा परिषद, नगरपालिका आदी भागातील शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता नवीन उपक्रम आणि प्रयोग करीत असतात. परंतु त्यांनी केलेले प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे या प्रयोगांची प्रेरणा अन्य शिक्षकांनीही घ्यावी आणि शैक्षणिक चळवळीचा प्रसार सकारात्मक दिशेने व्हावा ही यामागील प्रमुख संकल्पना आहे, असेही तावडे यांनी सांगितले.