शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वारी

By admin | Updated: January 26, 2016 03:03 IST

महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार व्हावी तसेच शिक्षकांची शैक्षणिक उपयोगिता व परिणामकारकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून १०० टक्के विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ होईल

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार व्हावी तसेच शिक्षकांची शैक्षणिक उपयोगिता व परिणामकारकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून १०० टक्के विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ होईल या हेतूने ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शालेय शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३१ जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानामधून ‘लोकजागृती’ कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या उपक्रमासाठी १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. त्यानुसार बालेवाडी म्हाळुंगे, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले असून, २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता उद्घाटन होणार आहे. काय असेल वारीतलोकसहभागातून शाळा सुधारणा कशी करावे याचे मार्गदर्शन तसेच भाषा, गणित, भूगोल यात प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन यातून मिळणार आहे. लिंग समानता, मूल्यवर्धन विषयांचाही समावेश आहे. व्यवसाय शिक्षण, ई-लर्निंग, तंत्रस्नेही शिक्षण या विषयांच्या स्टॉल्सचाही समावेश असून, वारीत सहभागी होणाऱ्या शिक्षकांची आॅनलाइन पद्धतीने निवड केली आहे. (विशेष प्रतिनिधी)७ हजार शिक्षकांचा सहभाग : या वारीमध्ये निवडक ५० शिक्षणविषयक उपक्रम व शिक्षण पद्धतीचे सादरीकरण आणि प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्ह्यांतून दर दिवशी १८०० या सरासरीने सुमारे ७२०० शिक्षक २७ ते ३० जानेवारीदरम्यान भेट देणे अपेक्षित आहे. ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जनतेस हे प्रदर्शन खुले राहणार आहे.वारीमागील संकल्पना : जिल्हा परिषद, नगरपालिका आदी भागातील शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता नवीन उपक्रम आणि प्रयोग करीत असतात. परंतु त्यांनी केलेले प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे या प्रयोगांची प्रेरणा अन्य शिक्षकांनीही घ्यावी आणि शैक्षणिक चळवळीचा प्रसार सकारात्मक दिशेने व्हावा ही यामागील प्रमुख संकल्पना आहे, असेही तावडे यांनी सांगितले.