शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वारी

By admin | Updated: January 26, 2016 03:03 IST

महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार व्हावी तसेच शिक्षकांची शैक्षणिक उपयोगिता व परिणामकारकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून १०० टक्के विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ होईल

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार व्हावी तसेच शिक्षकांची शैक्षणिक उपयोगिता व परिणामकारकता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून १०० टक्के विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभ होईल या हेतूने ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शालेय शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३१ जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानामधून ‘लोकजागृती’ कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या उपक्रमासाठी १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. त्यानुसार बालेवाडी म्हाळुंगे, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले असून, २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता उद्घाटन होणार आहे. काय असेल वारीतलोकसहभागातून शाळा सुधारणा कशी करावे याचे मार्गदर्शन तसेच भाषा, गणित, भूगोल यात प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन यातून मिळणार आहे. लिंग समानता, मूल्यवर्धन विषयांचाही समावेश आहे. व्यवसाय शिक्षण, ई-लर्निंग, तंत्रस्नेही शिक्षण या विषयांच्या स्टॉल्सचाही समावेश असून, वारीत सहभागी होणाऱ्या शिक्षकांची आॅनलाइन पद्धतीने निवड केली आहे. (विशेष प्रतिनिधी)७ हजार शिक्षकांचा सहभाग : या वारीमध्ये निवडक ५० शिक्षणविषयक उपक्रम व शिक्षण पद्धतीचे सादरीकरण आणि प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्ह्यांतून दर दिवशी १८०० या सरासरीने सुमारे ७२०० शिक्षक २७ ते ३० जानेवारीदरम्यान भेट देणे अपेक्षित आहे. ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जनतेस हे प्रदर्शन खुले राहणार आहे.वारीमागील संकल्पना : जिल्हा परिषद, नगरपालिका आदी भागातील शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता नवीन उपक्रम आणि प्रयोग करीत असतात. परंतु त्यांनी केलेले प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे या प्रयोगांची प्रेरणा अन्य शिक्षकांनीही घ्यावी आणि शैक्षणिक चळवळीचा प्रसार सकारात्मक दिशेने व्हावा ही यामागील प्रमुख संकल्पना आहे, असेही तावडे यांनी सांगितले.