शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची सलामी! मंडपात मूर्ती विराजमान, पावसामुळे सोहळ्याचा मुहुर्त हुकला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 05:04 IST

गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाने शनिवार व रविवारी बाप्पाच्या आगमन सोहळ्यांत जोरदार सलामी दिली. पावसामुळे सर्वच मंडळांच्या आगमन सोहळ्यांचा मुहूर्त हुकला. मात्र तसूभरही उत्साह कमी होऊ न देता, ढोलताशांच्या आवाजत नाचत-गाजतच रविवारी सर्व मंडळांनी लाडक्या बाप्पाला मंडपांमध्ये विराजमान केले.

मुंबई : गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाने शनिवार व रविवारी बाप्पाच्या आगमन सोहळ्यांत जोरदार सलामी दिली. पावसामुळे सर्वच मंडळांच्या आगमन सोहळ्यांचा मुहूर्त हुकला. मात्र तसूभरही उत्साह कमी होऊ न देता, ढोलताशांच्या आवाजत नाचत-गाजतच रविवारी सर्व मंडळांनी लाडक्या बाप्पाला मंडपांमध्ये विराजमान केले.गणेश चतुर्थीदिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी बहुतेक मंडळांकडून चतुर्थीआधीच्या रविवारीच आगमन सोहळ्यांचे आयोजन केले जाते. सुट्टीचा मुहूर्त साधत सुमारे ५०हून अधिक मंडळांनी लालबाग, परळ येथील गणेश कार्यशाळांतून आगमन सोहळ्यांचे आयोजन रविवारी केले होते. मात्र सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने गणेशक्तांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. बहुतेक मंडळांनी सकाळ व दुपारच्या मुहूर्तावर पाणी सोडत सायंकाळी पाऊस उघडण्याची वाट पाहण्यातच धन्यता मानली. याउलट दुपारी ओस पडलेल्या रस्त्यांचा फायदा घेत काही मंडळांनी धूमधडाक्यातच बाप्पाचा आगमन सोहळा पार पाडला.काळाचौकी येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाने या वेळी विशेष लक्ष वेधले. नऊवारी साडी नेसलेल्या महिला कार्यखर्त्या, तर गुलाबी रंगांच्या फेट्यांसह जॅकेच्या आतून सदरा व लेंगा घातलेले पुरुष कार्यकर्ते भलतेच भाव खाऊन गेले. मूर्तीवर प्लॅस्टिक टाकून मुंबादेवीच्या राजापासून असल्फाचा लाडका अशा विविध मंडळांनी बाप्पाची स्वारी काढली. भरपावसातही ढोल-ताशांच्या आवाजात गणेशभक्त नाचण्यात दंग झाले होते.वालधुनीची धोक्याची पातळीउल्हासनगर : संततधार पावसामुळे वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. तसेच उल्हासनगर शहरातील अनेक सखल भागांत साचलेले पाणी ते घरांमध्ये शिरले होते. संततधारेने त्रेधातिरपीटकल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार रविवारीही कायम होती. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. चौक जलमय झाल्याने, रस्त्यांतील खड्ड्यांमुळे वाहतुकीला फटका बसला.अकरा ठिकाणी झाडे पडली मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात एका ठिकाणी भिंतीचा भाग पडल्याची घटना घडली. शहरात सहा ठिकाणी, पूर्व उपनगरात एक अशा सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात तीन, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात सहा अशा एकूण अकरा ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनांत हानी झाली नाही.मुंबई शहरात भायखळा, दादर, धारावी, पूर्व उपनगरात चेंबूर, गवाणपाडा, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पश्चिम उपनगरात मरोळ, मालाड, गोरेगाव, दहिसर, दिंडोशी, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल आणि बोरीवली येथे पावसाची अधिक नोंद झाली.२१ आॅगस्ट रोजी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २२ आॅगस्ट रोजी गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, दक्षिण-पूर्व विदर्भ आणि लगतच्या भागावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.मुंबई-गोवा महामार्गावर साचले पाणीशनिवारी पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर मार्गावर पाणी साचले होते. कल्हे गावाजवळ रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामागावरील एक लेन पाण्यात गेली होती. रविवारी हीच परिस्थिती कायम होती. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने या मार्गावर सुरु होती.