शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

विलेपार्ल्यातील ‘पारले’ कारखाना इतिहासजमा

By admin | Updated: July 28, 2016 03:18 IST

चर्चगेटहून विलेपार्लेला जाताना ‘पारले-जी’च्या बिस्किटांच्या सुवासावरून विलेपार्ले स्थानक आल्याचे प्रवाशांना समजायचे. अनेक जण ट्रेनमधून प्रवास करताना नवख्या मुंबईकराला

मुंबई : चर्चगेटहून विलेपार्लेला जाताना ‘पारले-जी’च्या बिस्किटांच्या सुवासावरून विलेपार्ले स्थानक आल्याचे प्रवाशांना समजायचे. अनेक जण ट्रेनमधून प्रवास करताना नवख्या मुंबईकराला आवर्जून ‘पारले-जी’ बिस्कीट कारखाना दाखवायचे. पण यापुढे हे सर्व इतिहासजमा होणार आहे. कारण, हा कारखाना बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. विलेपार्ले येथील कारखान्यातील उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.पारले कंपनीची एकूण उलाढाल ही दहा हजार कोटींच्या घरात आहे. देशभरात विविध ठिकाणी पारलेचे उत्पादन केले जाते. विलेपार्ले येथील कारखाना १९२९ साली सुरू करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात या कारखान्यात फक्त कॅण्डीचे उत्पादन केले जायचे. १९३९ नंतर या कारखान्यात बिस्किट बनवण्यास सुरुवात केली होती. ‘पारले-जी’ या बिस्किटांना इतकी वर्षे उलटूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.विलेपार्ल्याच्या कारखान्यातील उत्पादन घटले होते. अशा स्थितीत हा कारखाना सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या शहाणपणाचे नाही. त्यामुळे येथील उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यात शेवटपर्यंत असलेल्या ३०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे पारले उत्पादनांचे कार्यकारी संचालक अरूप चौहान यांनी सांगितले. मुंबईत विविध ठिकाणांची ओळख तिथल्या वास्तूंमुळे आहे. जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा देताना या वास्तूंचा उल्लेख नक्कीच केला जातो. त्याचप्रमाणे विलेपार्लेची एक ओळख म्हणून गेल्या ७७ वर्षांपासून ‘पारले-जी’चा कारखाना उभा होता. याच्या आसपासच्या परिसरातून जाताना बिस्किटाच्या सुवासाने अनेकांची मने मोहून जात. वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईच्या जुन्या खुणा पुसल्या जात आहेत. हा कारखाना बंद झाल्यावरही मुंबईतील एका वास्तूची खूण पुसट होणार आहे. पारलेचा कारखाना बंद होणार ही बातमी पार्ल्यात पसरल्यानंतर पार्लेकरांनी खेद व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)३00 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती- विलेपार्ल्याच्या कारखान्यातील उत्पादन घटले होते. अशा स्थितीत हा कारखाना सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या शहाणपणाचे नाही. त्यामुळे येथील उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. - कारखान्यात शेवटपर्यंत असलेल्या ३०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे पारले उत्पादनांचे कार्यकारी संचालक अरूप चौहान यांनी सांगितले.