शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

पिंजाळपात्रातील वाळूउपसा होतो वनातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 03:25 IST

तालुक्यातील पिंजाळ नदीपात्रातून राजरोसपणे बेकायदा रेतीचा उपसा करून चोरटी वाहतूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून

वसंत भोईर,

वाडा- तालुक्यातील पिंजाळ नदीपात्रातून राजरोसपणे बेकायदा रेतीचा उपसा करून चोरटी वाहतूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून महसूल विभागाच्या ढिम्म भूमिकेमुळे हजारो लोकांच्या पिण्याच्या पाण्यावर संकट कोसळण्याची वेळ आली आहे. असे असताना ज्या भागातून हा वाळू उपसा केला जातो व वाळूची बेकायदा वाहतूक तसेच साठवणूक केली जाते, तो पूर्ण परिसर वन विभागाच्या संरक्षित वनाचा भाग असल्याने या बेकायदा प्रकारावर वन विभागानेसुद्धा कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. वाडा व विक्र मगड तालुक्यांच्या हद्दीवरून वाहणारी पिंजाळ ही बारमाही नदी सध्या वाळूमाफियांचा कचाट्यात सापडली असून नदीपात्रात बेकायदा उत्खनन करून दिवसरात्र वाळूचा उपसा या नदीपात्रातील पिंजाळ, दाभोण, शिलोत्तर, पीक, मलवाडा, सापणे, पास्ते या भागात केला जातो. व वाळूची वाहतूक राजरोसपणे ट्रॅक्टर व ट्रकच्या मार्फत केली जाते. यामुळे बारमाही वाहणारी निसर्गसंपन्न नदी संकटात सापडली आहे. अनेकदा मागणी करूनदेखील फक्त थातूरमातूर कारवाई महसूल विभागाकडून केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पीकगाव व हातोबा या ठिकाणी रेती साठवणूक व वाहतूक करण्याचे बंदर आहे. मात्र, हे क्षेत्र वन विभागाच्या संरक्षित वनात येत असल्याने वन विभाग ही साठवणूक व वाहतूक रोखू शकते. मात्र, आजपर्यंत वन विभागाने डोळ्यांदेखत होत असणाऱ्या या बेकायदा व्यवसायाकडे कानाडोळा करत एक प्रकारे या व्यवसायाला खतपाणी घातल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता ते महसूल विभागाकडे बोट दाखवतात, तर महसूल विभाग मात्र तालुक्याच्या हद्दीत अडकून कारवाईसाठी टाळाटाळ करतो, असे लोकांचे म्हणणे आहे.>तहसीलदार फोन उचला...वन विभाग जर आपल्या संरक्षित वनातून माती व अन्य वाहतूक रोखू शकते, तर चोरट्या वाळूची वाहतूक व साठवणूक का रोखू शकत नाही, असा सवाल ग्रामस्थ विचारत असून वन विभाग व महसूल विभाग यांनी तातडीने या वाळू वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वाडा नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांना दूरध्वनी केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही, तर तलाठी श्रीकांत कुंभार यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. कारवाईसाठी पीक वनपाल जरी आपले हात वर करत असले तरी जव्हार उपवनसंरक्षक डॉ. शिवाबाला हे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेतील अशी अपेक्षा आहे.