शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

...तेव्हा कळली न्यूज व्हॅल्यूची किंमत - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: August 3, 2016 21:57 IST

सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 -  सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या असं सांगत त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात सांगितली. 2003-04 या वर्षी देवेंद्र फडणवीस यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं. त्याचदिवशी दुपारी बोलण्याच्या नादात त्यांनी विदर्भ विरोधकांना म्हणजेच अखंड महाराष्ट्रवाद्यांना चालते व्हा असं म्हटलं, त्याचभरात चूक झालीये पण माफी मागणार नाही असंही म्हणत फडणवीस ठाम राहिले. ही आठवण सांगताना फडणवीस म्हणाले की दुस-या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी पुरस्काराची बातमी सोयीस्करपणे बाजूला ठेवत केवळ दुपारचा किस्सा रंगवून सांगितला, आणि त्यादिवशी न्यूज व्हॅल्यू म्हणजे काय ? हे मला कळालं असं फडणवीस बोलले आहेत. 
 
जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आहे. महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला. त्यातून लक्षात येते की वाद अनेक आहेत, पण लोकशाहीत ताकद आहे आणि एकत्र येऊन चांगले काम होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. विधान मंडळ दर्जा चांगला हवा असेल तर या पुरस्कारांच्या माध्यमातून लोकांनी सांगितलं पाहिजे आम्ही काम करणाऱ्याच्या पाठी आहोत असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
 
विधानसभा सुरु असताना एक सकारात्मक बातमी नक्की द्या, यामुळे लोकशाही प्रगल्भ होईल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना केलं आहे.
 
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले.