शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

...तेव्हा कळली न्यूज व्हॅल्यूची किंमत - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: August 3, 2016 21:57 IST

सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 -  सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या असं सांगत त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात सांगितली. 2003-04 या वर्षी देवेंद्र फडणवीस यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं. त्याचदिवशी दुपारी बोलण्याच्या नादात त्यांनी विदर्भ विरोधकांना म्हणजेच अखंड महाराष्ट्रवाद्यांना चालते व्हा असं म्हटलं, त्याचभरात चूक झालीये पण माफी मागणार नाही असंही म्हणत फडणवीस ठाम राहिले. ही आठवण सांगताना फडणवीस म्हणाले की दुस-या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी पुरस्काराची बातमी सोयीस्करपणे बाजूला ठेवत केवळ दुपारचा किस्सा रंगवून सांगितला, आणि त्यादिवशी न्यूज व्हॅल्यू म्हणजे काय ? हे मला कळालं असं फडणवीस बोलले आहेत. 
 
जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आहे. महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला. त्यातून लक्षात येते की वाद अनेक आहेत, पण लोकशाहीत ताकद आहे आणि एकत्र येऊन चांगले काम होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. विधान मंडळ दर्जा चांगला हवा असेल तर या पुरस्कारांच्या माध्यमातून लोकांनी सांगितलं पाहिजे आम्ही काम करणाऱ्याच्या पाठी आहोत असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
 
विधानसभा सुरु असताना एक सकारात्मक बातमी नक्की द्या, यामुळे लोकशाही प्रगल्भ होईल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना केलं आहे.
 
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले.