शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा कळली न्यूज व्हॅल्यूची किंमत - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 09:55 IST

सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या असं सांगत त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली.

ऑनलाइन लोकमत - 

मुंबई, दि. 03 -  सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या असं सांगत त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात सांगितली. 2003-04 या वर्षी देवेंद्र फडणवीस यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं. त्याचदिवशी दुपारी बोलण्याच्या नादात त्यांनी विदर्भ विरोधकांना म्हणजेच अखंड महाराष्ट्रवाद्यांना चालते व्हा असं म्हटलं, त्याचभरात चूक झालीये पण माफी मागणार नाही असंही म्हणत फडणवीस ठाम राहिले. ही आठवण सांगताना फडणवीस म्हणाले की दुस-या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी पुरस्काराची बातमी सोयीस्करपणे बाजूला ठेवत केवळ दुपारचा किस्सा रंगवून सांगितला, आणि त्यादिवशी न्यूज व्हॅल्यू म्हणजे काय ? हे मला कळालं असं फडणवीस बोलले आहेत. 
 
जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आहे. महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला. त्यातून लक्षात येते की वाद अनेक आहेत, पण लोकशाहीत ताकद आहे आणि एकत्र येऊन चांगले काम होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. विधान मंडळ दर्जा चांगला हवा असेल तर या पुरस्कारांच्या माध्यमातून लोकांनी सांगितलं पाहिजे आम्ही काम करणाऱ्याच्या पाठी आहोत असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
 
विधानसभा सुरु असताना एक सकारात्मक बातमी नक्की द्या, यामुळे लोकशाही प्रगल्भ होईल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना केलं आहे.
 
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले.