शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा कळली न्यूज व्हॅल्यूची किंमत - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 09:55 IST

सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या असं सांगत त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली.

ऑनलाइन लोकमत - 

मुंबई, दि. 03 -  सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या असं सांगत त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात सांगितली. 2003-04 या वर्षी देवेंद्र फडणवीस यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं. त्याचदिवशी दुपारी बोलण्याच्या नादात त्यांनी विदर्भ विरोधकांना म्हणजेच अखंड महाराष्ट्रवाद्यांना चालते व्हा असं म्हटलं, त्याचभरात चूक झालीये पण माफी मागणार नाही असंही म्हणत फडणवीस ठाम राहिले. ही आठवण सांगताना फडणवीस म्हणाले की दुस-या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी पुरस्काराची बातमी सोयीस्करपणे बाजूला ठेवत केवळ दुपारचा किस्सा रंगवून सांगितला, आणि त्यादिवशी न्यूज व्हॅल्यू म्हणजे काय ? हे मला कळालं असं फडणवीस बोलले आहेत. 
 
जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आहे. महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला. त्यातून लक्षात येते की वाद अनेक आहेत, पण लोकशाहीत ताकद आहे आणि एकत्र येऊन चांगले काम होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. विधान मंडळ दर्जा चांगला हवा असेल तर या पुरस्कारांच्या माध्यमातून लोकांनी सांगितलं पाहिजे आम्ही काम करणाऱ्याच्या पाठी आहोत असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
 
विधानसभा सुरु असताना एक सकारात्मक बातमी नक्की द्या, यामुळे लोकशाही प्रगल्भ होईल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना केलं आहे.
 
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले.