शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

मूल्यव्यवस्था हाच समाजव्यवस्थेचा आधार

By admin | Updated: August 22, 2015 23:29 IST

समाजव्यवस्थेत अनेक उपव्यवस्था असतात़ या सर्वांचा आधार मूल्यव्यवस्था आहे़ मूल्यांचा ऱ्हास झाला तर व्यवस्था कोलमडून जाईल, असे मत ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ़ सदानंद मोरे

अहमदनगर : समाजव्यवस्थेत अनेक उपव्यवस्था असतात़ या सर्वांचा आधार मूल्यव्यवस्था आहे़ मूल्यांचा ऱ्हास झाला तर व्यवस्था कोलमडून जाईल, असे मत ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ़ सदानंद मोरे यांनी व्यक्त केले़ न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात तत्वज्ञान विभागाच्यावतीने ‘मानवी मूल्य आणि आधुनिक समाज’या विषयावर शुक्रवारी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मोरे म्हणाले की,मानवी इतिहासाचा मूल्यात्मक आढावा घेताना इतिहासाचा प्रत्येक टप्पा हा मूल्यसंघर्षच होता़ मूल्य ही मानवनिर्मित आहेत़ ते दैवी नाहीत़ मूल्यसंघर्ष हा मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे़ यातूनच नवीन मूल्य निर्माण होत असतात़ काही मूल्यामध्ये बदल हवा असतो़ तर काहींना हा बदल नको असतो़ मूल्य मात्र, कधी संपत नाहीत़ मूल्यविरहीत समाज असूच शकत नाही़ मूल्य व्यवस्था ढासळली तर समाजव्यवस्था धोक्यात येईल असे ते म्हणाले़ प्राचार्य डॉ़ बी़एच़ झावरे यांनी विज्ञान व मूल्यव्यवस्था यांनी हातात हात घालून काम केले तर मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल असे सांगितले़ सीताराम खिलारी म्हणाले, जीवन जगत असताना आपण बरोबर की, चूक हे ठरवताना मूल्य हीच मोजपट्टी आहे़ प्रत्येकाने मूल्य संभाळून व्यवहार केला तर समाज व्यवस्थित राहिल़ तत्वज्ञान विभागप्रमुख प्रा़ अमन बगाडे यांनी प्रास्ताविक केले़ या चर्चासत्रात हैद्राबाद विद्यापीठातील प्रा़ वेंकट रेड्डी, बनारस विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागप्रमुख डॉ़ प्रदीप गोखले यांनी आपल्या विषयांचे सादरीकरण केले़ शनिवारी डॉ़ पेन्ना मधुसूदन, डॉ़ हेमा मोरे, डॉ़ लता चित्रे, डॉ़विजय कांची, डॉ़ शुभदा जोशी, डॉ़ ज़रा़ दाभोळकर व डॉ़ राहुल वर्मा हे विचार व्यक्त करणार आहेत़ यावेळी प्रा़ सुभाष कडलग, प्रा़ काशीद, प्रा़ मीना साळे, प्रा़ अशोक चोथे,डॉ़ बाळासाहेब सागडे, डॉ़ जयश्री आहेर, प्रा़ नागेश शेळके, डॉ़ पी़टी़ शेळके, डॉ़ बी़डी़ उंदरे, डॉ़ बाळासाहेब पवार, प्रा़ गणेश भगत आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)