शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

मानधन, प्रवास भत्ता केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी

By admin | Updated: April 30, 2017 01:39 IST

मराठवाड्यात सातत्याने असलेली दुष्काळी स्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम ध्यानी घेऊन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘श्वास’ ही

- राम शिनगारे, औरंगाबाद

मराठवाड्यात सातत्याने असलेली दुष्काळी स्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम ध्यानी घेऊन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘श्वास’ ही योजना सुरू केली. या योजनेत कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी परिक्षेत्राबाहेरील विविध कार्यक्रमांत मिळणारे मानधन, प्रवास भत्ता जमा करण्याचा निर्णय घेतला. यातून प्रोत्साहन घेत विद्यापीठातील शेकडो प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी यास हातभार लावत लाखोंचा निधी जमा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षे मदतीचा हात दिला आहे.मराठवाड्यात २०१५-१६ या वर्षात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका सर्वसामान्य अनेक विद्यार्थ्यांना बसला. या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याएवढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. पण यातून मार्ग काढण्यासाठी ‘विद्यार्थी कल्याण व पुरस्कार योजना’ (श्वास) सुरू केली. ज्या विद्यार्थ्यांना सरकार व विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही, अशांना या योजनेंतर्गत मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेमध्ये कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेर आपणाला बोलावण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे मानधन आणि प्रवास भत्ता जमा करण्यास सुरुवात केली.सन २०१५-१६ यावर्षी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी कुलगुरूंच्या प्रवास भत्ता व मानधनातून जमा झाला. तर विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी या योजनेला हातभार लावून मुक्तहस्ते निधी दिला. यामुळे ‘श्वास’ योजनेत १३ लाख रुपये जमा झाले. यातून ५३९ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली असल्याची माहिती विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी दिली. हीच योजना २०१६-१७ शैक्षणिक वर्षात सुरू ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कुलगुरू डॉ. विद्यासागर यांनी पुण्यासह इतर ठिकाणच्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तीची मदत घेतली आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वत:पासून सुरुवात केल्यानंतर इतरांना ती सांगता येते. कोणत्याही संस्थेच्या प्रमुखांनी असे आदर्श घालून दिल्यास चांगला पायंडा पडण्यास मदत होते. यात मी पुढाकार घेतला. त्याला माझ्या विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिया पाठिंबा दिला. बाहेरूनही काही संस्थांनी मोलाची मदत केली. यातून काही गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करता आली, याचे समाधान आहे.- डॉ. पंडित विद्यासागर, कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.