शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मानधन, प्रवास भत्ता केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी

By admin | Updated: April 30, 2017 01:39 IST

मराठवाड्यात सातत्याने असलेली दुष्काळी स्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम ध्यानी घेऊन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘श्वास’ ही

- राम शिनगारे, औरंगाबाद

मराठवाड्यात सातत्याने असलेली दुष्काळी स्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम ध्यानी घेऊन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘श्वास’ ही योजना सुरू केली. या योजनेत कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी परिक्षेत्राबाहेरील विविध कार्यक्रमांत मिळणारे मानधन, प्रवास भत्ता जमा करण्याचा निर्णय घेतला. यातून प्रोत्साहन घेत विद्यापीठातील शेकडो प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी यास हातभार लावत लाखोंचा निधी जमा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षे मदतीचा हात दिला आहे.मराठवाड्यात २०१५-१६ या वर्षात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका सर्वसामान्य अनेक विद्यार्थ्यांना बसला. या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याएवढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. पण यातून मार्ग काढण्यासाठी ‘विद्यार्थी कल्याण व पुरस्कार योजना’ (श्वास) सुरू केली. ज्या विद्यार्थ्यांना सरकार व विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही, अशांना या योजनेंतर्गत मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेमध्ये कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेर आपणाला बोलावण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे मानधन आणि प्रवास भत्ता जमा करण्यास सुरुवात केली.सन २०१५-१६ यावर्षी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी कुलगुरूंच्या प्रवास भत्ता व मानधनातून जमा झाला. तर विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी या योजनेला हातभार लावून मुक्तहस्ते निधी दिला. यामुळे ‘श्वास’ योजनेत १३ लाख रुपये जमा झाले. यातून ५३९ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली असल्याची माहिती विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी दिली. हीच योजना २०१६-१७ शैक्षणिक वर्षात सुरू ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कुलगुरू डॉ. विद्यासागर यांनी पुण्यासह इतर ठिकाणच्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तीची मदत घेतली आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वत:पासून सुरुवात केल्यानंतर इतरांना ती सांगता येते. कोणत्याही संस्थेच्या प्रमुखांनी असे आदर्श घालून दिल्यास चांगला पायंडा पडण्यास मदत होते. यात मी पुढाकार घेतला. त्याला माझ्या विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिया पाठिंबा दिला. बाहेरूनही काही संस्थांनी मोलाची मदत केली. यातून काही गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करता आली, याचे समाधान आहे.- डॉ. पंडित विद्यासागर, कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.