शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

वरसोलीत कुटुंब वाळीत

By admin | Updated: December 3, 2014 03:48 IST

येथील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या वरसोली गावालाही वाळीत प्रकरणाचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे.

अलिबाग : येथील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या वरसोली गावालाही वाळीत प्रकरणाचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. गावातील मच्छीमार नारायण भगत यांना देवस्थानाला जागा न दिल्याने कुटुंबीयांसह गेल्या ३१ आॅक्टोबरपासून वाळीत टाकले आहे. या प्रकरणी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे १३ विश्वस्त, वरसोली कोळी समाज पंच समितीचे १४ सदस्य व अन्य २० अशा ४७ जणांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात वाळीत टाकण्याचे हे ३७वे प्रकरण उघडकीस आले आहे. या वाळीत प्रकरणाची कुणकुण लागल्यावर अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी दीपक क्षीरसागर, तहसीलदार विनोद खिरोडकर व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत चौधरी यांनी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टी, वरसोली कोळी समाज पंच समिती सदस्य व वरसोलीचे ग्रामस्थ यांची बैठक घेऊन वाळीत टाकणे वा सामाजिक बहिष्कार टाकणे हा गुन्हा आहे. असा प्रकार गावांत होऊ देऊ नये, असे आवाहन करून लोकप्रबोधन केले होते, परंतु भगत यांना वाळीत टाकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला नाही व अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या या ४७ जणांमध्ये श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे विजय बना, परशुराम दांडेकर, नारायण पाटील, अरुण मेस्त्री, धर्मा घारबट, ज्ञानेश्वर जायनाखवा, प्रभाकर पाटील, दिलीप कोळण, बाळकृष्ण भगत, दत्ताराम भगत, गणेश भगत, बाळकृष्ण वाकटी, मदन बना, वरसोली कोळी समाज पंच समितीचे गणेश आवारी, दत्ताराम घारबट, रवींद्र पाटील, जगदीश नवगावकर आदींसह ४७ ग्रामस्थांचा समावेश आहे.