शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

तुकोबांसह वैष्णवांची पाऊले पंढरीकडे

By admin | Updated: June 20, 2014 02:10 IST

भागवत धर्माच्या भगव्या पताका उंचावत.., वीणोचा झंकार, अखंड टाळ-मृदंगाचा निनाद करीत.., ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा आसमंत निनादणारा जयघोष..

श्रीक्षेत्र देहूगाव (जि़ पुणो) : भागवत धर्माच्या भगव्या पताका उंचावत.., वीणोचा झंकार, अखंड टाळ-मृदंगाचा निनाद करीत.., ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा आसमंत निनादणारा जयघोष.. अशा विठ्ठलतल्लीन वातावरणात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने गरुवारी सायंकाळी आषाढी वारीसाठी अनंत तीर्थाचे माहेर असणा:या पंढरपुराकडे प्रस्थान ठेवले. आषाढी वारीसाठी वैष्णवांचा प्रवाह निघाला. पावसाने ओढ दिल्याचा परिणाम पालखी सोहळ्यातील गर्दीवर झाल्याचे जाणवले. 
‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल।, करावा विठ्ठल, जीवभाव।।’ अशी विठ्ठल भेटीची आर्तता वैष्णवांच्या चेह:यावर दिसून येत होती. ‘चला पंढरीशी जाऊ।, रखुमादेवीवरा पाहू।।, डोळे निवतील कान।, मना तेथें समाधान।।’ अशी तुकोबारायांच्या अभंगाची आठवण वैष्णव एकमेकांना करून देत होते. वैष्णवांची गर्दी, विठ्ठलभक्तीने इंद्रायणी ओसंडली होती.  पहाटेपासूनच इंद्रायणी तीरावर भक्तिचैतन्य निर्माण झाले होते. परिसरातील राहुटय़ांत अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. वैष्णव नदीत येऊन स्नान करीत होते. दुसरीकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली होती. यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे वर्ष आणि दिंडय़ांची संख्या 329 आहे. 
तत्पूर्वी पहाटे मुख्य मंदिरातील शिळा मंदिरात, तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत तुकाराममहाराज देवस्थानाचे अध्यक्ष रामदास मोरे, पालखी सोहळाप्रमुख अशोक निवृत्ती मोरे, सुनील दामोदर मोरे, अभिजित मोरे यांनी महापूजा केली. त्यानंतर तसेच वैकुंठस्थान येथे उद्योजक मनु वालिया, तसेच पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज मंदिरात पूजा करण्यात आली. ढगाळ वातावरण असल्याने सूर्यनारायणाचे दर्शन आज उशिराने झाले. सकाळपासूनच सर्वत्र सोहळ्याची लगबग दिसली. मुख्य मंदिरात सकाळी संभाजीमहाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. परिसरातील राहुटय़ांमध्ये दिंडेकरी, फडकरी, वीणोक:यांची सोहळ्याची तयारी सुरू होती. सूर्य माध्यान्हीला येऊ लागला, तशा दिंडय़ा एकेक करून मुख्य मंदिराच्या दिशेने येऊ लागल्या. 
महाराजांच्या आजोळघरी अर्थात इनामदारवाडय़ात घोडेकर सराफांकडून पादुका इनामदार वाडय़ात आणण्यात आल्या. दिलीप मोरे यांनी पूजा केली. गंगा म्हसलेकर मंडळींनी दुपारी दीडच्या सुमारास मुख्य मंदिरात पादुका आणल्या. तोर्पयत मंदिर परिसर दिंडय़ांनी आपापली जागा घेतली होती. टाळ-मृदंगाचा गजर सुरू झाला. दुपारी अडीचच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारातून बाभूळगावकरांचे, तसेच अकलूजच्या मोहिते-पाटलांचे मानाचे अश्व दाखल झाले. दुसरीकडे वीणामंडपात प्रस्थान सोहळा सुरू झाला. 
तुकोबारायांच्या पादुकांची पूजा माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संजय भेगडे, देहूकर दिंडीतील ज्येष्ठ वारकरी शंकरराव अवघडे यांनी सपत्नीक केली. या वेळी मानकरी तसेच वीणोक:यांचा सत्कार करण्यात आला. दुसरीकडे मंदिर परिसरात दिंडेक:यांनी ‘ग्यानबा-तुकाराम’चा ठेका धरला होता. त्यातच वरुणराजाचा अधून-मधून होणारा अभिषेक वैष्णवांचा आनंद द्विगुणित करीत होता. प्रस्थान सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी वैष्णव आतुर झाले होते. आसमंत निनादला आणि भक्तिमय वातावरणात पालखी मंदिराबाहेर आली. त्या वेळी पादुका दर्शनासाठी झुंबड उडाली होती.  (प्रतिनिधी)
 
च्आळंदी देवाची : टाळमृदुंगाचा गजर, भजन, कीर्तन अन् प्रवचनाने अवघी अलंकापुरीच तीन-चार दिवसांपासून दुमदुमून निघाली आहे. विठूभेटीची आस लागलेले लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. आता शुक्रवारी (दि. 2क्) दुपारी 4 वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्यास आरंभ होणार आहे. 
च्आज पहाटेपासूनचे धार्मिक कार्यक्रमांमध्ये पहाटे 2.45 वाजता घंटानाद, काकडा झाल्यानंतर माऊलींना अभिषेक व पंचामृत पूजा, पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वाजेर्पयत भाविकांच्या महापूजा व दर्शन खुले राहील. दुपारी साडेबारा वाजता श्रींना दिल्या जाणा:या नैवेद्यासाठी दर्शन अर्धा तास बंद राहील. दुपारी दोननंतर भाविकांना दर्शन खुले राहील. दोन ते साडेतीन या वेळेत पालखीपुढे चालणा:या भक्तांच्या 27 ंिदंडय़ांना महाद्वारातून प्रवेश दिला जाईल व त्यांच्या पाठोपाठ अश्वांना प्रवेश दिला जाईल. चार वाजेर्पयत हैबतबाबा व संस्थानर्फे आरती होईल. वीणामंडपात मानक:यांना नारळ प्रसाद देऊन सुगंधी फुलांनी सजविलेल्या पालखीत माउलींच्या पादुका ठेवून पालखी मुख्य मंदिरातून बाहेर पडले.