शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वडनेरे समितीच्या शिफारशींना २०११ पासून केराची टोपली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By अतुल कुलकर्णी | Updated: August 17, 2019 05:15 IST

राज्यातील धरणांमधून आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती विसर्ग करावा यासाठी वडनेरे समिती नेमण्यात आली होती.

- अतुल कुलकर्णीमुंबई : राज्यातील धरणांमधून आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती विसर्ग करावा यासाठी वडनेरे समिती नेमण्यात आली होती. समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या होत्या. त्याबद्दलचा अध्यादेशही शासनाने ६ एप्रिल २०११ रोजी काढला. मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यावर कसलीही अंमलबजावणी झाली नसल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर, सांगली, साताºयाच्या पूर परिस्थितीला हे देखील महत्त्वाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वडनेरे समितीच्या ४४ शिफारशी राज्य शासनाने स्वीकारल्या होत्या. त्यातील सगळ््यात महत्त्वाची शिफारस नैसर्गिक नद्या-नाल्यांच्या आकारात बदल होईल अशी परवानगी यापुढे देऊ नये, तसेच पूर प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नवीन घरे किंवा बांधकामांना परवानगी देऊ नये ही होती. पूरप्रवण क्षेत्रांमधील निवासी व व्यावसायिक स्वरूपांच्या कामावर कडक निर्बंध असावेत असेही समितीने म्हटले होते. ही शिफारस राज्य शासनाने स्वीकारली होती. तरीही ही पंचगंगा नदीच्या पात्रात ब्ल्यू लाईनचा सोयीचा अर्थ काढून घेत बांधकामांना परवानगी देण्याचे घाटले जात होते. यासंबंधीची बातमी काही दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केली होती.तीव्र पूरप्रवण क्षेत्रातील नदीपात्रामध्ये अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ब्ल्यू लाईन किंवा रेड लाइन यांची आखणी प्राधान्याने केली जावी. हे काम जलसंपदा विभागाने करावे आणि इतर क्षेत्रात त्यानंतर हे काम पूर्ण करावे. या रेषांचे नियतकालिक अद्यावतीकरण किमान पाच वर्षांतून एकदा केलेच पाहिजे, अशी शिफारस शासनाने स्वीकारली होती तसेच मदत व पुनर्वसन विभागाला यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. मात्र या पावसात कोल्हापूर, सांगली, सातारा पुरामध्ये बुडालेले असताना मदत व पुनर्वसन विभाग नेमका काय करत होता?, विभागाचे मंत्री काय करत होते?, असे प्रश्न उपस्थित झाले. वडनेरे समितीच्या शिफारसीनुसार जर मदत व पुनर्वसन विभागाने पाच वर्षांनी एकदा या कामाचा आढावा घेतला असता तर २०११ ते २०१९ या कालावधीत किमान तीन वेळा या कामांचा आढावा घेतला गेला असता. तो जर ब्ल्यू व रेड लाईनचा विचार करून घेतला गेला असता तर पूरप्रवण क्षेत्रात झालेले अतिक्रमण काढता आले असते. त्यामुळे आज जे मोठे नुकसान झाले ते टळू शकले असते, पण मदत व पुनर्वसन विभागाने गेल्या अठरा वर्षांत यात काहीही केले नाही हेदेखील यामुळे स्पष्ट झाले आहे.आपत्कालीन परिस्थितीत पुराचे पूर्वानुमान दर तासाला काढावे व ही माहिती आकाशवाणी, दूरचित्रवाणी, मोबाईल फोन, वर्तमानपत्रे व संकेतस्थळामार्फत जनतेपर्यंत पोहोचवावी. पूर्वानुमान वापरणाºया संस्थेपर्यंत पोहोचविण्यासाठी एकच प्राधिकृत अधिकारी असावा, असेही वडनेरे समितीच्या शिफारशी म्हटले होते. ही शिफारसही शासनाने स्वीकारली होती. २०१९ च्या पुराच्या वेळी कोणी किती सूचना दिल्या, मोबाईलवर किती अलर्ट दिले गेले, पाणी सोडताना किती काळजी घेतली गेली, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यातील दोषी अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई केली गेली नाही तर भविष्यात धरणांच्या पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत अशीच हलगर्जी दाखवली जाईल, अशी प्रतिक्रिया अनेक जलतज्ज्ञांनी व्यक्त केली.खोरे एकक मानासमितीची एक अत्यंत महत्त्वाची शिफारस म्हणजे, धरण किंवा खोरे/उपखोरे यांना एकक मानून एकात्मिक जलाशय परिचालन सूची तयार करावी. त्यासाठी खोरे समारोपण तंत्र तसेच सुयोग्य व प्रस्थापित जलशास्त्रीय प्रतिकृतीवर आधारित पूर्वानुमान याचा वापर करावा. अनेक धरणांची साखळी असलेल्या प्रणालीमध्ये एक खोरे/एक अधिकरण हे तत्त्व सर्व जलाशयाचे परिचालन करताना लागू करावे, ही शिफारस सुद्धा अंमलात आलेली नाही.

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर