शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वडिवळे धरणाच्या देखभालीकडे होतेय दुर्लक्ष

By admin | Updated: May 19, 2016 02:23 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे

करंजगाव : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे. पाणी काटकसरीने वापरण्याची गरज असताना पाणी गळतीकडे आणि धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वडिवळे धरणाचा कालवा करंजगाव, गोवित्री, साबळेवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणे, कोळवाडी व इतर गावांतून गेला आहे. दोन दशकांपूर्वी प्रत्येक शिवार हे सुजलाम् सुफलाम् होते. परंतु कालवा असूनही पाणी वेळेवर मिळत नाही. शिवाय काही गावांना कालव्याचे पाणी बंद झाले आहे. कालवा बंद झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी कालवा पूर्णपणे बुजवला असून त्या ठिकाणी शेती केली जाते. कालवा काही ठिकाणी नादुरुस्त आहे. मावळात धरण असूनदेखील ही काही गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती ओसाड झाली आहे. वर्षाला एकच पीक घेण्याची वेळ तेथील शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळ्यातील पाण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसून कालवा सुरू होण्याची शेतकरी दोन दशके प्रतीक्षा करीत आहे. पाण्याची कसलीच सोय केली जात नसल्याने वडिवळे धरणालगतचे क्षेत्र ओसाड आहे. काही ठिकाणी जनावरे छावणीत बांधली जातात. परंतु चारा मिळत नाही. धरणाच्या पायथ्याच्या मध्यभागी पाणी सोडण्यासाठीची व्हॉल्व्ह आहे. तेथे जाण्यासाठी सुमारे ४५ फूट उंचीचा लोखंडी जिना आहे. तो तुटलेला असून, गंजही चढला आहे. जोखीम पत्करूनच कामगारांना तेथे जावे लागते. धरणावरील विद्युतविषयक समस्या मोठ्या प्रमाणात असून फ्युज डीपी, वायर, बोर्ड, बटण खराब अवस्थेत आहे. काही ठिकाणी होल्डरला बल्ब नाही. वायर लोंबलेल्या अवस्थेत आहेत. धरणाच्या पायाचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. पाणी सोडले जाते त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गज दिसू लागले आहेत. ते गंजण्याची शक्यता आहे. धरणाला लागूनच अनेक छोटी-मोठी गावे आहेत. जलाशयात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीसाठी होडी अथवा लॉँच नाही. जुनी होडी दुरवस्थेत पडून आहे. धरणातील पाणी इतर गावांना सोडण्यासाठी कालव्याचा वापर केला जातो. परंतु कालव्याला लागूनच अनेक झुडपे आहेत. माळरानातून येणारी माती कालव्यात पडत आहे.मावळ तालुका जास्त पर्जन्यमानाचा असला, तरी शेतकऱ्यांना पाण्याअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाणे मावळात पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी टॅँकरच्या साह्याने पाणी पुरवावे लागते. प्रशासनाने परिसर जलयुक्त करणे गरजेचे असून, कालवे व्यवस्थित करून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच धरणावरील इतर कामे करून सुविधा पूर्ण करून गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. शेतकऱ्यांना करंजगाव शिवारात पाणी देण्यासाठीची वाहिनी अर्धवट अवस्थेत सोडली आहे. पुढील काम कधी चालू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, अशी करंजगावचे तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वाटाणे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली असता, जलवाहिनीचे उर्वरित काम निधी आल्यानंतर चालू होईल. काही वस्तू जीर्ण झाल्यात त्या बदलल्या जातील, असे जाधव यांनी सांगितले.