शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

वडिवळे धरणाच्या देखभालीकडे होतेय दुर्लक्ष

By admin | Updated: May 19, 2016 02:23 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे

करंजगाव : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे. पाणी काटकसरीने वापरण्याची गरज असताना पाणी गळतीकडे आणि धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वडिवळे धरणाचा कालवा करंजगाव, गोवित्री, साबळेवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणे, कोळवाडी व इतर गावांतून गेला आहे. दोन दशकांपूर्वी प्रत्येक शिवार हे सुजलाम् सुफलाम् होते. परंतु कालवा असूनही पाणी वेळेवर मिळत नाही. शिवाय काही गावांना कालव्याचे पाणी बंद झाले आहे. कालवा बंद झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी कालवा पूर्णपणे बुजवला असून त्या ठिकाणी शेती केली जाते. कालवा काही ठिकाणी नादुरुस्त आहे. मावळात धरण असूनदेखील ही काही गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती ओसाड झाली आहे. वर्षाला एकच पीक घेण्याची वेळ तेथील शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळ्यातील पाण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसून कालवा सुरू होण्याची शेतकरी दोन दशके प्रतीक्षा करीत आहे. पाण्याची कसलीच सोय केली जात नसल्याने वडिवळे धरणालगतचे क्षेत्र ओसाड आहे. काही ठिकाणी जनावरे छावणीत बांधली जातात. परंतु चारा मिळत नाही. धरणाच्या पायथ्याच्या मध्यभागी पाणी सोडण्यासाठीची व्हॉल्व्ह आहे. तेथे जाण्यासाठी सुमारे ४५ फूट उंचीचा लोखंडी जिना आहे. तो तुटलेला असून, गंजही चढला आहे. जोखीम पत्करूनच कामगारांना तेथे जावे लागते. धरणावरील विद्युतविषयक समस्या मोठ्या प्रमाणात असून फ्युज डीपी, वायर, बोर्ड, बटण खराब अवस्थेत आहे. काही ठिकाणी होल्डरला बल्ब नाही. वायर लोंबलेल्या अवस्थेत आहेत. धरणाच्या पायाचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. पाणी सोडले जाते त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गज दिसू लागले आहेत. ते गंजण्याची शक्यता आहे. धरणाला लागूनच अनेक छोटी-मोठी गावे आहेत. जलाशयात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीसाठी होडी अथवा लॉँच नाही. जुनी होडी दुरवस्थेत पडून आहे. धरणातील पाणी इतर गावांना सोडण्यासाठी कालव्याचा वापर केला जातो. परंतु कालव्याला लागूनच अनेक झुडपे आहेत. माळरानातून येणारी माती कालव्यात पडत आहे.मावळ तालुका जास्त पर्जन्यमानाचा असला, तरी शेतकऱ्यांना पाण्याअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाणे मावळात पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी टॅँकरच्या साह्याने पाणी पुरवावे लागते. प्रशासनाने परिसर जलयुक्त करणे गरजेचे असून, कालवे व्यवस्थित करून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच धरणावरील इतर कामे करून सुविधा पूर्ण करून गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. शेतकऱ्यांना करंजगाव शिवारात पाणी देण्यासाठीची वाहिनी अर्धवट अवस्थेत सोडली आहे. पुढील काम कधी चालू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, अशी करंजगावचे तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वाटाणे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली असता, जलवाहिनीचे उर्वरित काम निधी आल्यानंतर चालू होईल. काही वस्तू जीर्ण झाल्यात त्या बदलल्या जातील, असे जाधव यांनी सांगितले.