शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वडिवळे धरणाच्या देखभालीकडे होतेय दुर्लक्ष

By admin | Updated: May 19, 2016 02:23 IST

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे

करंजगाव : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या वर्षी वडिवळे धरणात पाणीसाठा ३३ टक्केच आहे. पाणी काटकसरीने वापरण्याची गरज असताना पाणी गळतीकडे आणि धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वडिवळे धरणाचा कालवा करंजगाव, गोवित्री, साबळेवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणे, कोळवाडी व इतर गावांतून गेला आहे. दोन दशकांपूर्वी प्रत्येक शिवार हे सुजलाम् सुफलाम् होते. परंतु कालवा असूनही पाणी वेळेवर मिळत नाही. शिवाय काही गावांना कालव्याचे पाणी बंद झाले आहे. कालवा बंद झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी कालवा पूर्णपणे बुजवला असून त्या ठिकाणी शेती केली जाते. कालवा काही ठिकाणी नादुरुस्त आहे. मावळात धरण असूनदेखील ही काही गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती ओसाड झाली आहे. वर्षाला एकच पीक घेण्याची वेळ तेथील शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळ्यातील पाण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसून कालवा सुरू होण्याची शेतकरी दोन दशके प्रतीक्षा करीत आहे. पाण्याची कसलीच सोय केली जात नसल्याने वडिवळे धरणालगतचे क्षेत्र ओसाड आहे. काही ठिकाणी जनावरे छावणीत बांधली जातात. परंतु चारा मिळत नाही. धरणाच्या पायथ्याच्या मध्यभागी पाणी सोडण्यासाठीची व्हॉल्व्ह आहे. तेथे जाण्यासाठी सुमारे ४५ फूट उंचीचा लोखंडी जिना आहे. तो तुटलेला असून, गंजही चढला आहे. जोखीम पत्करूनच कामगारांना तेथे जावे लागते. धरणावरील विद्युतविषयक समस्या मोठ्या प्रमाणात असून फ्युज डीपी, वायर, बोर्ड, बटण खराब अवस्थेत आहे. काही ठिकाणी होल्डरला बल्ब नाही. वायर लोंबलेल्या अवस्थेत आहेत. धरणाच्या पायाचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. पाणी सोडले जाते त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गज दिसू लागले आहेत. ते गंजण्याची शक्यता आहे. धरणाला लागूनच अनेक छोटी-मोठी गावे आहेत. जलाशयात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीसाठी होडी अथवा लॉँच नाही. जुनी होडी दुरवस्थेत पडून आहे. धरणातील पाणी इतर गावांना सोडण्यासाठी कालव्याचा वापर केला जातो. परंतु कालव्याला लागूनच अनेक झुडपे आहेत. माळरानातून येणारी माती कालव्यात पडत आहे.मावळ तालुका जास्त पर्जन्यमानाचा असला, तरी शेतकऱ्यांना पाण्याअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाणे मावळात पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी टॅँकरच्या साह्याने पाणी पुरवावे लागते. प्रशासनाने परिसर जलयुक्त करणे गरजेचे असून, कालवे व्यवस्थित करून पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच धरणावरील इतर कामे करून सुविधा पूर्ण करून गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. शेतकऱ्यांना करंजगाव शिवारात पाणी देण्यासाठीची वाहिनी अर्धवट अवस्थेत सोडली आहे. पुढील काम कधी चालू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, अशी करंजगावचे तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वाटाणे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली असता, जलवाहिनीचे उर्वरित काम निधी आल्यानंतर चालू होईल. काही वस्तू जीर्ण झाल्यात त्या बदलल्या जातील, असे जाधव यांनी सांगितले.