शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

बंद जलवाहिनीद्वारे सिंचनाचा प्रयोग कागदावरच!

By admin | Updated: September 24, 2015 01:06 IST

सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी कामे रखडली

राजरत्न सिरसाट/अकोला : विदर्भातील अकोला जिल्हय़ात उघड्या पाटचार्‍या (कॅनाल) ऐवजी बंद जलवाहिनीद्वारे सिंचनाला पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदाच्या नियामक मंडळाने चार वर्षांपूर्वीच घेतला; परंतु अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसून, सिंचन प्रकल्पाची कामेही सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडली आहेत. त्यामुळे या भागाच्या सिंचन अनुशेषात वाढच होत आहे. जिल्हय़ातील उमा, पूर्णा, घुंगशी, काटेपूर्णा या खारपाणपट्टय़ातील बॅरेज प्रकल्पातून सिंचनाला बंद जलवािहनीद्वारे पाणी सोडण्यासाठी नोव्हेंबर २0११ मध्ये बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला तत्कालीन मंत्री राजेश मुळक हेदेखील उपस्थित होते. २0१३ मध्ये या निर्णयाला जलसंपदा नियामक मंडळाची मान्यता मिळाली; परंतु दोन वर्ष झाली, तरी शासनाकडे हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. शासनाने जुलै २0१५ मध्ये एक परिपत्रक काढले असून, सिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेविना बंद जलवाहिनींना मान्यता मिळणार नसल्याचे म्हटले आहे. धरणांच्या कामासोबतच हे काम झाले तर शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळण्यास वेळ लागणार नाही. विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या बांधकामासाठी गत आठ वर्षांपासून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने विदर्भ, पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामे रखडली आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या बांधकामाच्या किमती वाढत असून, बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव प्रकल्पाची किंमत आजमितीस ५ हजार ७00 कोटी एवढी झाली आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत या प्रकल्पाच्या बांधकामासाठी १४00 कोटीच प्राप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाने यावर्षी राज्यासाठी जवळपास ७७00 कोटींची तरतूद केली असून, विदर्भातील सिंचन प्रकल्पाची कामे सुरू करण्यासाठी यावर्षी ३२00 कोटीची तजवीज करण्यात आली होती. पण, कामे सुरू करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यताच मिळत नसल्याने ही रक्कम खर्च करणार कशी, असा प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पडला आहे. मागील वर्षी विदर्भातील अठराशे कोटींचा निधी अखर्चित होता. याच प्रशासकीय मान्यतेअभावी अकोला जिल्हय़ाला मिळालेला ३00 कोटींहून अधिक निधी अखर्चित राहिला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी राज्यपाल अनुशेष यादीतील कामे रखडली आहेत. सिंचनासाठी बंद जलवाहिनीद्वारे पाणी वितरण प्रणाली चांगला उपक्रम आहे. त्याने पाण्याचा र्‍हास होणार नाही. त्यासाठी जलसंपदा नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे. प्रकल्पांच्या कामासाठी सुधारित मान्यता मिळाल्यानंतर याचाही विचार होईल, असे अकोला येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट के ले.

*कॅनॉलच नसेल तर पाणी सोडणार कसे?

सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी कदाचित सुधारित प्रशासकीय मान्यता मिळेल, जर पाणी साठा निर्माण झाला आणि कॅनॉलच नसले तर अर्थ राहणार नाही. म्हणजे धरण बांधल्यावर पाटचार्‍यासाठी म्हणजेच सिंचनाच्या पाण्यासाठी (कॅनॉल) शेतकर्‍यांना पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.