शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बंद जलवाहिनीद्वारे सिंचनाचा प्रयोग कागदावरच!

By admin | Updated: September 24, 2015 01:06 IST

सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी कामे रखडली

राजरत्न सिरसाट/अकोला : विदर्भातील अकोला जिल्हय़ात उघड्या पाटचार्‍या (कॅनाल) ऐवजी बंद जलवाहिनीद्वारे सिंचनाला पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदाच्या नियामक मंडळाने चार वर्षांपूर्वीच घेतला; परंतु अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसून, सिंचन प्रकल्पाची कामेही सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडली आहेत. त्यामुळे या भागाच्या सिंचन अनुशेषात वाढच होत आहे. जिल्हय़ातील उमा, पूर्णा, घुंगशी, काटेपूर्णा या खारपाणपट्टय़ातील बॅरेज प्रकल्पातून सिंचनाला बंद जलवािहनीद्वारे पाणी सोडण्यासाठी नोव्हेंबर २0११ मध्ये बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला तत्कालीन मंत्री राजेश मुळक हेदेखील उपस्थित होते. २0१३ मध्ये या निर्णयाला जलसंपदा नियामक मंडळाची मान्यता मिळाली; परंतु दोन वर्ष झाली, तरी शासनाकडे हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. शासनाने जुलै २0१५ मध्ये एक परिपत्रक काढले असून, सिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेविना बंद जलवाहिनींना मान्यता मिळणार नसल्याचे म्हटले आहे. धरणांच्या कामासोबतच हे काम झाले तर शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळण्यास वेळ लागणार नाही. विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या बांधकामासाठी गत आठ वर्षांपासून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने विदर्भ, पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामे रखडली आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या बांधकामाच्या किमती वाढत असून, बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव प्रकल्पाची किंमत आजमितीस ५ हजार ७00 कोटी एवढी झाली आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत या प्रकल्पाच्या बांधकामासाठी १४00 कोटीच प्राप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाने यावर्षी राज्यासाठी जवळपास ७७00 कोटींची तरतूद केली असून, विदर्भातील सिंचन प्रकल्पाची कामे सुरू करण्यासाठी यावर्षी ३२00 कोटीची तजवीज करण्यात आली होती. पण, कामे सुरू करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यताच मिळत नसल्याने ही रक्कम खर्च करणार कशी, असा प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पडला आहे. मागील वर्षी विदर्भातील अठराशे कोटींचा निधी अखर्चित होता. याच प्रशासकीय मान्यतेअभावी अकोला जिल्हय़ाला मिळालेला ३00 कोटींहून अधिक निधी अखर्चित राहिला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी राज्यपाल अनुशेष यादीतील कामे रखडली आहेत. सिंचनासाठी बंद जलवाहिनीद्वारे पाणी वितरण प्रणाली चांगला उपक्रम आहे. त्याने पाण्याचा र्‍हास होणार नाही. त्यासाठी जलसंपदा नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे. प्रकल्पांच्या कामासाठी सुधारित मान्यता मिळाल्यानंतर याचाही विचार होईल, असे अकोला येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट के ले.

*कॅनॉलच नसेल तर पाणी सोडणार कसे?

सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी कदाचित सुधारित प्रशासकीय मान्यता मिळेल, जर पाणी साठा निर्माण झाला आणि कॅनॉलच नसले तर अर्थ राहणार नाही. म्हणजे धरण बांधल्यावर पाटचार्‍यासाठी म्हणजेच सिंचनाच्या पाण्यासाठी (कॅनॉल) शेतकर्‍यांना पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.