शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

फ्लाय अ‍ॅशचा वापर सक्तीचा

By admin | Updated: November 16, 2016 05:23 IST

राज्यातील विविध औष्णिक वीज केंद्रांमध्ये तयार होणारी प्रचंड राख (फ्लाय अ‍ॅश) त्यापासूनचे प्रदूषण, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे अनेकविध

मुंबई : राज्यातील विविध औष्णिक वीज केंद्रांमध्ये तयार होणारी प्रचंड राख (फ्लाय अ‍ॅश) त्यापासूनचे प्रदूषण, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे अनेकविध प्रश्न यावर कायमची मात करण्यासाठी या राखेचा वापर करणारे उद्योग या प्रकल्पांच्या परिसरातच उभारण्याची तरतूद असलेल्या एका व्यापक धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. वीजनिर्मिती केंद्रांच्या ३०० किलोमीटरच्या परिघातील बांधकाम साहित्यात फ्लाय अ‍ॅशचा वापर आता अनिवार्य करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, या वीज केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, तिथे राखेचा वापर करून विविध उत्पादने तयार करणाऱ्या उद्योगांची उभारणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. या उद्योगांना मूल्यवर्धित कर (वॅट) लागणार नाही. शासनाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही या उत्पादनांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. राज्यातील ७१ टक्के वीज ही १९ औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या वापरातून निर्माण केली जाते. या प्रकल्पांमध्ये वापरात येणाऱ्या एकूण कोळशाच्या ४० टक्के एवढी राख तयार होते. या राखेची पर्यावरणाचा विचार समोर ठेवून विल्हेवाट लावण्याची तरतूद आज मंजूर झालेल्या धोरणात करण्यात आलेली आहे. या राखेपासून विटा, दरवाजे, ब्लॉक्स् अन्य बांधकाम साहित्याची निर्मिती करणारे उद्योग उभारण्याची तयारी अनेक उद्योजकांनी दाखविली असून, असे धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे बावनकुळे म्हणाले. फ्लाय अ‍ॅशच्या प्रकल्पापर्यंतचा वाहतुकीचा खर्च औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांकडून करण्यात येईल. वीट उत्पादकांना २0 टक्के राख देण्यापूर्वी औष्णिक वीज निर्मिती केंद्रांनी यापैकी ७0 टक्के राख वीटनिर्मितीसाठी वापरली जाऊन नदीतील वाळूचा उपयोग पूर्णपणे टाळला जात असल्याची खात्री करणे आवश्यक असेल. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राख परिषद स्थापन करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)