शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

रासायनिक खतांचा हेक्टरी वापर घटतोय!

By admin | Updated: September 14, 2016 00:25 IST

दुष्परिणामाबाबत शेतकरी सतर्क; राज्यात रासायनिक खताच्या वापरात घट होत असून प्रति हेक्टर १७२ किलोवरुन १0७ किलोवर.

संतोष वानखडे वाशिम, दि. १३ : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. या अनुभवातूनच आता शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा अतिवापर टाळला असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २0१२ मध्ये राज्यात हेक्टरी १७२ किलोग्रॅम असलेला वापर २0१५ मध्ये १0७ किलोग्रॅमवर आला असून, २0१६ च्या खरीप हंगामात हा वापर सरासरी १00 किलोग्रॅमच्या आसपास असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.रासायनिक खते व कीटकनाशक औषधांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. तर दुसरीकडे अन्नधान्य व भाजीपालावर्गीय पिकांवर कीटकनाशकांचा होत असलेला अतिरिक्त फवारा मानवी आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढविणारा आहे. खतांचा अतिरिक्त वापर जमिनीचा पोत बिघडविणारा तर कीटकनाशकांचा जादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा आहे. खत व कीटकनाशक औषधींच्या वापराविषयी काही संकेत आहेत. यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी ९५ किलोग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षित आहे. हा वापर २0१२ पर्यंत सरासरी १७२ किलोग्रॅमपर्यंत पोहोचला होता, असे कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जमिनीचा पोत बिघडणे आणि भाजीपालावर्गीय पिकांसाठी धोकादायक ठरणे आदींचे महत्त्व शेतकर्‍यांना समजू लागल्याने त्यानंतर हळूहळू रासायनिक खतांचा अतिवापर कमी होत गेल्याचे दिसून येते. राज्यात सन २0११-१२ मध्ये दर हेक्टरी सरासरी १७२ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होता. सन २0१२-१३ मध्ये दर हेक्टरी ११९ किलोगॅ्रम, सन २0१४ मध्ये दर हेक्टरी १२५ अणि सन २0१५ मध्ये दर हेक्टरी १0७ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होता. २0१६ च्या खरीप हंगामातील निश्‍चित आकडेवारी राज्यस्तरावर अद्याप संकलित झाली नाही. तथापि, हा वापर दर हेक्टरी सरासरी १00 किलोग्रॅमच्या आसपास राहण्याची शक्यता कृषी विभागाच्या विश्‍वसनीय सूत्रांनी वर्तविली.