शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

उरमोडी कालव्याला भगदाड, लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 15, 2016 22:32 IST

माण तालुक्यातील अनेक भागांमध्ये महिलांना घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 15- संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. माण तालुक्यातील अनेक भागांमध्ये महिलांना घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. अशावेळी रविवारी उरमोडी कालव्याला पुसेगाव-वडूज रस्त्यावरील वाकेश्वर फाट्यानजीक मोठे भगदाड पडले. ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी अक्षरश: वाया गेले.यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच माण तालुक्यात पाणी आले. मात्र, काही मूठभर लोकांचा करंटेपणा अन प्रशासनाचा नाकर्तेपणा यामुळे पुसेगाव-वडूज रस्त्यावरील वाकेश्वर फाट्याजवळून माण तालुक्यात गेलेल्या उरमोडी कालव्याला रविवारी भले मोठे भगदाड पडले. त्यामुळे पाण्याचे लोट अक्षरश: रस्त्यावरून वाहू लागले. त्यानंतर जवळच असलेल्या ओढ्यात शिरले. पाण्याला वेग प्रचंड असल्याने ओढ्यावरील सर्व बंधारेही काही तासांतच वाहू लागले़. ओढ्यातील पाणी पुढे येरळा नदीत गेले़ 'कालव्यातील पाणी एके ठिकाणी सिमेंटच्या मोठ्या जलवाहिनीतून पुढे जाते; पण सिमेंटच्या नळीच्या तोंडाला वाहून आलेल्या झाडाची झुडपे, कचरा मोठ्या प्रमाणात साठल्याने मागे पाण्याच्या फुगवटा वाढत गेला. त्यामुळे प्रचंड दाब तयार झाला परिणामी मोठे भगदाड पडले,' अशी माहिती परिसरातील शेतक-यांनी दिली. मात्र,काही मुठभर मंडळींनी हा कालवा फोडल्याची दबकी चर्चा दिवसभर सुरू होती.वरिष्ठ अधिकारीही ठाण मांडून !कालव्याचे भगदाड बुजवून पाणी पुन्हा प्रवाहित करण्यासाठी उरमोडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वाय. आर. दाभाडे यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी दिवसभर घटनास्थळी ठाण मांडून होते. ब-याच तासांच्या कष्टानंतर हा कालवा सुरळीत करण्यात या पथकाला यश आले. मात्र, तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले होते.