शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही त्वरित कर्जमाफी द्या - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 4, 2017 21:48 IST

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली पाहिजे. जर उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तरी कर्जामाफीबाबत मागे का राहावे, असा सवाल उद्धव यांनी केला आहे. 
उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. निवडणूक प्रचारात दिलेले वचन योगी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पूर्ण केले, हे अभिमानास्पद आहे. कर्जमाफीचा घोषणा म्हणजे केवळ निवडणुकीतील पोकळ दावा नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच जर   उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, तर मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मागे का राहावे," असा सवाल त्यांनी केला. 
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींबरोबरच कर्जबाजारीपणा हे त्यामागचे मोठे कारण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही शिवसेनेची मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंपल्पीय अधिवेशनात  विरोधकांबरोबरच शिवसेनेनेही सत्ताधारी भाजपाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कोंडीत पकडले होते. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कर्जमाफीसाठी राज्यव्यापी संघर्षयात्रा काढत राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. आता उत्तर प्रदेशातही कर्जमाफी झाल्याने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जामाफीच्या मुद्यावर तोडगा काढताना दमछाक होणार आहे.