शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

कुत्र्यांची नगरविकास सचिवांकडून दखल

By admin | Updated: August 15, 2016 05:02 IST

जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणात हैदोस सुरू आहे.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणात हैदोस सुरू आहे. त्यावर गांभीर्याने तोडगा काढला जात नसल्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात तीन महिन्यांच्या कालावधीत कुत्र्यांनी दोन हजार ७५७ जणांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांंमुळे नगरविकास सचिवांनी आता प्रशासन सतर्क केले आहे. सध्या ही जिल्ह्यातील शहरे व निवासी वस्त्यांमधील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. गर्भधारणेच्या या कालावधीत त्यांचे रेबीज जीव घेणे ठरत आहेत. चावा घेतल्यानंतर वेळीच औषधोपचार न झाल्यामुळे जीवाला मुकावे लागल्याच्या घटना या आधी घडल्या आहेत. परंतु मागील तीन महिन्यातील घटनांमध्ये सर्वाना वेळेत रेबीजचे इंजेक्शन देऊन संकटातून मुक्त केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांव्दारे केला जात आहे. या घटना टाळण्यासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत मात्र त्यांच्याकडून मौन बाळगले जात आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात तीन महिन्यात सुमारे एक हजार १५० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मे महिन्यात सर्वाधिक ५०६ जणांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्याना चावा घेतला आहे. या खालोखाल जूनमध्ये ४११ जणांवर तर जुलैमध्ये २३३ जणाचा कुत्र्यांनी वेठीस धरून चावा घेतला आहे. याप्रमाणेच जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधील एक हजार ६०७ जणांना देखील कुत्र्यांच्या जीव घेण्या हल्यास तोंड द्यावे लागले आहे. यात सर्वाधिक भिवंडी तालुक्यातील ७१९, अंबरनाथमधील ४३७, शहापूरचे २३५, मुरबाडमधील १४८ आणि कल्याण ग्रामीणच्या ६८ जणांना कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केल्याचे निदर्शनात आले आहे. कुत्र्यांच्या या जीव घेण्या हल्लास गांभीर्याने घेतल्याचे स्थानिक प्रशासनाकडून दाखविले जात आहे. त्या नावाखाली लाखो रूपयांचे खर्च कुत्र्यांच्या नसबंदीवर केल्याचे ही निदर्शनात आले आहेत. मात्र कुत्र्यांचा हैदास अद्यापही कमी होत नसल्यामुळे नागरिकांना जीव घेण्या हल्ल्यास तोंड द्यावे लागत आहे. केवळ खर्चावर जोर देणाऱ्या स्थानिक प्रशासनावर आता नगरविकास विभागाच्या सचिवांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मुलन करणे आणि नागरिकांवर होणारे कुत्र्याचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना व देखरेख समिती ठिकठिकाणच्या पातळ्यावर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ठाणे ते माजिवडा ही मार्ग क्र. २७ ची बस दुपारी २ च्या सुमारास रेल्वे स्थानक येथून माजिवडा गावात आली. तिथून ती परतीच्या मार्गावर होती. तत्पूर्वी चालक यशवंत राव यांना गाडी मागे घेण्यासाठी थोरात हे मदत करत होते. त्याच वेळी एका पिसाळलेल्या श्वानाने त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला. अचानक गुदरलेल्या या प्रसंगामुळे थोरात यांची भंबेरी उडाली. याच बसमधून रेल्वे स्थानकावर जाणारे टीएमटीचे वाहतूक निरीक्षक सुनील साठे, गणेश माहूलकर यांच्यासह चालक यशवंत यांनी त्यांना तातडीने ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुगणालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.