शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कुत्र्यांची नगरविकास सचिवांकडून दखल

By admin | Updated: August 15, 2016 05:02 IST

जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणात हैदोस सुरू आहे.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणात हैदोस सुरू आहे. त्यावर गांभीर्याने तोडगा काढला जात नसल्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात तीन महिन्यांच्या कालावधीत कुत्र्यांनी दोन हजार ७५७ जणांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांंमुळे नगरविकास सचिवांनी आता प्रशासन सतर्क केले आहे. सध्या ही जिल्ह्यातील शहरे व निवासी वस्त्यांमधील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. गर्भधारणेच्या या कालावधीत त्यांचे रेबीज जीव घेणे ठरत आहेत. चावा घेतल्यानंतर वेळीच औषधोपचार न झाल्यामुळे जीवाला मुकावे लागल्याच्या घटना या आधी घडल्या आहेत. परंतु मागील तीन महिन्यातील घटनांमध्ये सर्वाना वेळेत रेबीजचे इंजेक्शन देऊन संकटातून मुक्त केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांव्दारे केला जात आहे. या घटना टाळण्यासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत मात्र त्यांच्याकडून मौन बाळगले जात आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात तीन महिन्यात सुमारे एक हजार १५० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मे महिन्यात सर्वाधिक ५०६ जणांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्याना चावा घेतला आहे. या खालोखाल जूनमध्ये ४११ जणांवर तर जुलैमध्ये २३३ जणाचा कुत्र्यांनी वेठीस धरून चावा घेतला आहे. याप्रमाणेच जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधील एक हजार ६०७ जणांना देखील कुत्र्यांच्या जीव घेण्या हल्यास तोंड द्यावे लागले आहे. यात सर्वाधिक भिवंडी तालुक्यातील ७१९, अंबरनाथमधील ४३७, शहापूरचे २३५, मुरबाडमधील १४८ आणि कल्याण ग्रामीणच्या ६८ जणांना कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केल्याचे निदर्शनात आले आहे. कुत्र्यांच्या या जीव घेण्या हल्लास गांभीर्याने घेतल्याचे स्थानिक प्रशासनाकडून दाखविले जात आहे. त्या नावाखाली लाखो रूपयांचे खर्च कुत्र्यांच्या नसबंदीवर केल्याचे ही निदर्शनात आले आहेत. मात्र कुत्र्यांचा हैदास अद्यापही कमी होत नसल्यामुळे नागरिकांना जीव घेण्या हल्ल्यास तोंड द्यावे लागत आहे. केवळ खर्चावर जोर देणाऱ्या स्थानिक प्रशासनावर आता नगरविकास विभागाच्या सचिवांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मुलन करणे आणि नागरिकांवर होणारे कुत्र्याचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना व देखरेख समिती ठिकठिकाणच्या पातळ्यावर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ठाणे ते माजिवडा ही मार्ग क्र. २७ ची बस दुपारी २ च्या सुमारास रेल्वे स्थानक येथून माजिवडा गावात आली. तिथून ती परतीच्या मार्गावर होती. तत्पूर्वी चालक यशवंत राव यांना गाडी मागे घेण्यासाठी थोरात हे मदत करत होते. त्याच वेळी एका पिसाळलेल्या श्वानाने त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला. अचानक गुदरलेल्या या प्रसंगामुळे थोरात यांची भंबेरी उडाली. याच बसमधून रेल्वे स्थानकावर जाणारे टीएमटीचे वाहतूक निरीक्षक सुनील साठे, गणेश माहूलकर यांच्यासह चालक यशवंत यांनी त्यांना तातडीने ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुगणालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.