शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

आगामी वर्ष ‘समता-समरसता’ वर्ष

By admin | Updated: May 7, 2015 11:31 IST

महात्मा फुले यांची १२५ वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

मुंबई : महात्मा फुले यांची १२५ वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतागौरव व समाजभूषण पुरस्कारांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, समता-समरसता हे विषय भाषणातून नव्हे तर कृतीतून दाखविण्याचे आहेत याच भूमिकेवर राज्य शासन काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. आर्थिक बाबींवरील त्यांचे विचार पथदर्शी होते. त्यांचे आर्थिक विचार समोर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, उद्योजक मिलिंद कांबळे, पत्रकार यदू जोशी आणि संगीतकार प्रभाकर धाकडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते. समाजभूषण पुरस्कारांचे मानकरी संस्था- हॅपी होम अँड स्कूल फॉर दी ब्लाइंड-मुंबई, अन्नपूर्णा परिवार-पुणे, अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र-पुणे , श्री बाबूराव राघोजी देशमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा सेवाभावी संस्था-कागल, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र-लातूर, गोविंद महाराज गोपाल समाज विकास परिषद-निलंगा, दिनदयाल बहु.प्रसारक मंडळ-यवतमाळ, संपूर्ण बांबू केंद्र-अमरावती, बहुभुती शिक्षण संस्था-गोंदिया, मातृसेवा संघ- नागपूर. समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती : जयश्री कांबळे, दुर्गादास साबळे, चंद्रकांत गांगुर्डे, विनोद प्रजापती, किशोर रोहम, दत्तात्रय पांडव (मुंबई), सुभाष वाणी (रत्नागिरी), मोहन कदम, चंद्रकांत जाधव (सिंधुदुर्ग).