शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

आगामी निवडणूक लढवणारच : पतंगराव कदम

By admin | Updated: June 15, 2017 19:24 IST

स्वर्ग आता केवळ दोन बोटेच राहिला आहे, असा समज काहींचा झाला असून अशा लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आगामी निवडणूक लढवणारच असल्याची घोषणा

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि.15 - स्वर्ग आता केवळ दोन बोटेच राहिला आहे, असा समज काहींचा झाला असून अशा लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आगामी निवडणूक लढवणारच असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केली. डॉ. कदम सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कदम यांचा हा रोष भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या दिशेने होता. दरम्यान कर्जमाफीबाबत विरोधकांशीही चर्चा करण्याचे भाजपचे धोरण लोकशाहीत नक्कीच समाधानकारक आहे असे प्रशस्तीपत्र डॉ. कदम यांनी यावेळी देऊन टाकले. 
 
शासनाचे कर्जमाफीचे धोरण, शेतकरी आंदोलन याबाबत डॉ. कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी डॉ. कदम यांनी ही आपली शेवटची निवडणूक आहे. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते. मात्र सध्या वाढत चाललेली भाजपची ताकद व पलुस कडेगाव मतदार संघातील पारंपरिक विरोधक देशमुख बंधू यांचे वाढते प्राबल्य यामुळे आगामी निवडणूक कदम कुटुबियांपैकी अन्य कोणी लढवली तर विरोधकांना ही निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा सुरू आहे.  याबाबत बोलताना डॉ. कदम म्हणाले, आतापर्यंत अनेक उन्हाळे पावसाळे पाहीले आहेत. अनेक वादळं आली व गेली. सध्याची परिस्थिती पाहता आगामी निवडणूक मला लढवावीच लागेल. लोकसभा की विधानसभा हे मात्र ज्या त्या वेळी ठरवू.
 
शेती कर्ज व शेतीच्या प्रश्नांवर सर्व विरोधक अधिवेशनात सरकारवर तुटून पडले. विरोधकांनी एकत्र येऊन चांदा ते बांधा संघर्ष यात्रा काढली. त्यामुळे वातावरण ढवळुन निघाले. त्यातच पुणतांब्याच्या शेतकर्‍यांनी संप जाहीर केला. त्याचा राज्यभर परिणाम झाला. शेतकरी संपावर हे देशात पहील्यांदाच घडले. सरसकट कर्ज माफी व हमीभाव या मुद्यांवर हे आंदोलन झाले. देशभर याचे लोन पसरू लागले. राज्यातही गंभिर स्वरूप येऊ लागले. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली. मात्र कर्जमाफी संदर्भात सुकाणू समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे तत्वता, व निकष याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे. तत्वतः व निकष या शब्दांचा नेमका अर्थ समजला पाहीजे. 
 
कर्जमाफी संदर्भात निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धोरण ठरवण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची समिती बनवण्यात आली. चंद्रकांतदादा पाटील हे सकारात्मक चर्चा करीत आहेत. सर्व विरोधकांचीही भेट घेऊन ते सर्वांचीच भूमिका समजाऊन घेत आहेत. लोकशाहीच्या दृष्टीने सरकारची ही भूमिका चांगलीच आहे असा शेराही डॉ. कदम यांनी देऊन टाकला. 
कर्जमाफीसह स्वामिनाथन्‌ आयोगाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. केवळ कर्जमाफीने काही होणार नाही. उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव मिळणे गरजेचे आहे. शेतीसाठीच्या सिंचन योजना तातडीने पूर्ण व्हायला पाहीजेत असे मत डॉ. कदम यांनी व्यक्त केले. 
जि.प. निवडणूकीत विरोधकांना नोटाबंदीचाच फायदा-
 
सामान्य जनता आमच्या सोबत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत सत्ताधार्‍यांना नोटा बंदीचा मोठा फायदा झाला. नोटा बंदीमुळे केवळ त्यांच्याकडेच पैसा मुबलक उपलब्ध झाला. त्यामुळेच त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडनणूकीत मोठं यश मिळले असल्याचा आरोप डॉ. कदम यांनी केला. हीच परिस्थिती कायम राहत नाहीत. लोक आमच्या सोबतच आहेत. आगामी काळात ती परिस्थिती राहणार नाही असेही स्पष्ट केले. 
वारसांनी कारखाना धुळीस मिळवला-
 
 डॉ. कदम यांनी वसंतदादंबद्दल अनेक आठवणी सांगितल्या. दादांनी कधीही जिल्ह्याच्या प्रगतीत राजकारण आणलं नाही. केवळ एका कारखान्यावर दादांनी राज्यावरच काय देशावर राज्य केलं. वारसांनी मात्र तोच कारखाना धुळीस मिळवला असा आरोप करीत पुन्हा एकदा विशाल पाटील यांना डिवचले.