शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 19:05 IST

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्रीराजीव लोहोकरे/किरण जाधव - वेळापूर आॅनलाईन लोकमतस्वातंत्र्यानंतर ज्यांनी नेतृत्व केले त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यत विकास पोहचू दिला नाही. स्वत:चा विकास साधत त्यांनी स्वत:च्या संस्था व मुलेबाळे मोठी केली. गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत मूलभूत सुविधा न पोहचल्याने तो तसाच राहिला ही राज्याची शोकांतिका आहे. म्हणून राज्य शासन शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी बरोबरच शेतकऱ्यांना मुबलक वीज, पाणी देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यापुढे आव्हाने खूप आहेत. परंतु आपण आव्हाने संपविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.वेळापूर येथील पालखी मैदानावर शेतकरी संघटनेचे उत्तमराव जानकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री ते उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.व्यासपीठावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. प्रशांत परिचारक, उत्तमराव जानकर, माढ्याचे संजय शिंदे, माळीनगर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे, सभापती रुपाली बेंदगुडे, अ‍ॅड. सुभाष पाटील, विठ्ठल शिंदे, के. के. पाटील आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, शेतकरी हा खरा पोशिंदा असल्याने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. शेतकऱ्यांना ८ हजार कोटी रु.ची थेट मदतीबरोबरच १७ हजार कोटी रुपयांची विविध उपक्रमाव्दारे आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित होता. त्यामुळे आपण जलयुक्त शिवार योजना हाती घेतली़ २२ हजार गावापैकी ४ हजार गावे दुष्काळ मुक्त झाली, त्याचे सर्वश्रेय जनतेला आहे.येत्या काळात राज्यासह सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणार असून मागेल त्याला शेततळी यायोजने अंर्तगत १ वर्षात ८ हजार शेततळी या जिल्ह्यात निर्माण झाली असल्याचे सांगून सोलरपंप योजनेची गती वाढावी म्हणूनच फिडरच सोलारवर टाकुन शेतकऱ्यांना १२ महिने २४ तास वीज देणारा पायलट प्रकल्प बनविला़ तो केंद्राने देशातील पथदर्शक प्रकल्प म्हणून मंजुरी केल्याचे सांगत गोरगरीब जनतेच्या अन्न, पाणी व घरे तसेच शिक्षणासाठी शासनाचा संघर्ष चालू असून बीपीएलचे निकष बदलून योग्य लाभार्थ्यांनाच लाभ कसा मिळेल, याकडे लक्ष दिले जाईल. जेवढी घरे मागाल तेवढी घरे मिळतील या पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत २०२२ सालापर्यंत जेवढी मागणी असेल तेवढी घरे मिळणार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू केलेल्या २५ हजार डिजीटल शाळांपैकी १७ हजार शाळा संपूर्णपणे ई-लर्निंग झाल्या़ त्यामुळे शिक्षणात देशात १८ व्या स्थानी असणारे महाराष्ट्र राज्य तिसऱ्या स्थानावर आले आहे़ भविष्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे़ राज्यातील आरोग्य व शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ करोडो जनतेने घेतला असल्याचे सांगितले. ---------------------प्रस्थापितांना संपवा़़़माळशिरस तालुक्यात अनेक वर्षापासून प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित बंड करीत आहेत़ प्रस्थापितांना संपविल्या शिवाय ते थंड होणार नाही, अशी खरमरीत टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.----------------------२१ गावच्या पाण्याच्या प्रश्न सोडवावाप्रास्ताविकात उत्तमराव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे दोन वेळा प्रवेशाचा कार्यक्रम रद्द झाला होता, पण आता प्रतिक्षा संपली आहे. १३ वर्षापूर्वी भाजप आपण सोडला होता़ तालुक्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कुणीही पाठीशी नसताना लढलो. कारखाना उभारणीसाठीही १४ वर्षे गेली. आता भाजपात प्रवेश करताना काही लोक खोड्या करीत आहेत. परंतु आपण लढवय्या असल्याने तालुक्यातील गलिच्छ राजकारण पध्दत मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. तालुक्यातील सहकारातील भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांनी मोडून काढावा, असे सांगून तालुक्याचा एमआयडीसी व निरा देवधर प्रकल्पातून २१ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.