शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 14, 2017 02:14 IST

महाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, महाड एमआयडीसीलगत असणाऱ्या धामणे, जिते, टेमघर, शेलटोली या गावांना शुक्रवारी रात्री ८ वाजता पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. धामणे गावातील लक्ष्मण विठ्ठल खराडे याच्या घराचे पत्रे उडून गेले, तसेच वीजमीटरची मोडतोड झाली. शेलटोली सजाचे तलाठी एस. एम. चाटे यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार खराडे यांच्या घराचे वादळी पावसामुळे १ लाख १३ हजार ६५० रु पयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच धामणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया अशोक चिकणे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पवार, माजी सरपंच शेखर राखाडे यांनी या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाचे तलाठी एस. एम. चाटे यांच्या मार्फत करून घेतला. तर जिते येथील शोभा रमेश मोहिते यांचे घर या वादळी पावसात पडल्याने ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेलटोली येथील शेतकरी मनोहर मारु ती गायकवाड यांच्या वाड्याची भिंत कोसळून गाईचा मृत्यू झाल्याने २१ हजार रु पयांचे नुकसान झल्याची माहिती तलाठी एस. एम. चाटे यांनी दिली आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदार सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.वादळी पावसामुळे टेमघर, जिते परिसरातील वीज खांब कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण मार्फत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व खांब उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.आंबा पिकाचे नुकसान; शेतकरी चिंतातूरम्हसळा : पावसाने नागरिकांसह व्यापारी, वीजभट्टीचालकांची तारांबळ उडाली. शुक्रवारी रात्री काही परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ऐन बहारात आलेल्या आंबा पिकाचे अवकाळीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्यात सर्वत्र आंबा पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी होऊ लागली आहे.म्हसळा येथील जुन्या सरकारी दवाखान्याशेजारील कर्मचारी निवासस्थान, तसेच पंचायत समिती येथे पावसामुळे झाड तारेवर पडून विजेचा खांब कोसळला. पावसाच्या शिडकाव्याने आंबे काढणीला वेगरेवदंडा : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होऊ नये, म्हणून शनिवारी सकाळपासून आंबे काढून घेण्यासाठी पाडेकरी वर्गाला घेऊन आंबे उतरवण्याची लगबग जाणवत आहे. उतरवलेले आंबे विक्र ीसाठी पाठवण्याची तयारी एकीकडे दिसत असून, पुन्हा एकदा आंबा बागायतदारांकडून खोके, करंड्या, पेपर रद्दी, सुतळ यांना मागणी वाढली आहे. आंब्याचे दर अद्याप भडकलेलेच असल्याने सर्वसामान्यांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. मुरु डमध्ये आंबा बागायतदार, वीटभट्टीचालकांचे नुकसानआगरदांडा : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना शुक्रवारी सुटलेल्या सोसाट्याचा वारा आणि पावसाने काहीसा दिलासा दिला. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक गर्मीने हैराण होते. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी वीजखांब पडले, तर काही ठिकाणी वीज वाहिन्या पडल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले.लहान मुलांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. अचानक आलेल्या पावसाने वीटभट्टीचालकांचे नुकसान झाले. तसेच आंबा बागायतदारांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले. बोर्लीत तब्बल १३ तासांनी वीज पूर्ववतबोर्ली मांडला : बोर्ली मांडला विभागामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी शुक्रवारी बरसल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तो तब्बल १३ तासांनी म्हणजेच शनिवारी सकाळी पूर्ववत करण्यात महावितरणला यश आहे. पाऊस आला असला तरी वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. काशीद तसेच काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.