शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

भांडणामुळे शिवसेना-भाजपात अस्वस्थता

By admin | Updated: June 30, 2016 04:29 IST

शिवसेना-भाजपाचे भांडण आरोप-प्रत्यारोपापुरते मर्यादित न राहता ते रस्त्यावर एकमेकांच्या प्रतिमांची जाळपोळ करण्यापर्यंत गेले आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- शिवसेना-भाजपाचे भांडण आरोप-प्रत्यारोपापुरते मर्यादित न  राहता ते रस्त्यावर एकमेकांच्या प्रतिमांची जाळपोळ करण्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत अस्वस्थता आहे. भाजपाच्या ‘मनोगत’ पाक्षिकात प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना शोले चित्रपटात अभिनेते असरानी यांनी साकारलेल्या जेलरशी केल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी सदर मासिकाचे अंक जाळले होते. तर मंगळवारी चर्चगेट परिसरात अमित शहा यांच्या पोस्टरवर ‘हुकूमशहा गब्बरसिंह’, माधव भांडारी यांच्या पोस्टरवर ‘हुकूमशहाचा सांबा’ आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पोस्टरवर ‘शकुनी मामा’ असे छापून ते पोस्टर्स फडकविण्यात आले. यावर शेलार यांना विचारले असता त्यांनी ‘नो कॉमेंट’ अशी प्रतिक्रिया देत यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र शिवसेनेच्या मुखपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने आमचा प्रश्न मिटल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका बैठकीत पार्टी ‘निर्दयता’ से चलानी चाहिये, असे विधान तीन-चार वेळा केले. त्यावर एका नेत्याने ‘निर्भयता से की निर्दयता से’ असा प्रतिसवाल केला; तेव्हा म्हणे शहांनी ‘निर्दयता से’ असे जोर देऊन सांगितले. त्यावरून भविष्यात भाजपा शिवसेनेसोबत कशा पद्धतीने वागेल याची चुणूक दिसेलच, असेही तो नेता म्हणाला.शिवसेनेच्या ५० व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने युती झाली तरच आम्ही युती करू अन्यथा वेगळे लढण्याची तयारी ठेवा, असे सांगून ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडणाऱ्यांपुढे गाजर धरण्याचा प्रयत्न केल्याचे मत भाजपाच्या अत्यंत ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. महापालिका निवडणुकीत जे लोक भाजपातर्फे तिकीट मागण्यासाठी उत्सुक आहेत ते शिवसेना सोडून जाऊ नयेत यासाठी उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक केलेली ही खेळी असल्याचेही सांगितले जात आहे. शिवाय दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे मराठी मते शिवसेनेच्या बाजूने तर अन्य मते भाजपाच्या बाजूने वळतील आणि दोघांच्याही जागा वाढतील, असा सूरही यामागे लावला जात आहे. मात्र या दोघांच्या भांडणांचा परिणाम राज्यातल्या उद्योग, व्यापारावर होत असल्याचे मत मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.