शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची विनापरवानगी छपाई!

By admin | Updated: May 30, 2017 02:08 IST

अकोल्यातील सात पुस्तक विक्रेते गजाआड : एस. चांद प्रकाशनच्या पुस्तकांची होत होती विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला-पुस्तक खरेदी आणि विक्रीचा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार असलेल्या चिवचिव बाजारातून दिल्ली येथील एस. चांद प्रकाशनच्या नावावर पुस्तकांची अवैध छपाई करून विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने सोमवारी छापेमारी केली. यावेळी सात पुस्तक विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दिल्ली येथील एस. चांद ही प्रकाशन कंपनी देशभरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अभियांत्रिकी, सामान्य ज्ञान यासह विविध प्रकारच्या शासकीय नोकरीसंदर्भातील पुस्तकांचे प्रकाशन करते. मात्र, या कंपनीच्या नावावर बनावट पुस्तकांची छपाई करून अकोल्यातील चिवचिव बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याची माहिती प्रकाशकांना मिळाली. यावरून एस. चांद प्रकाशन कंपनीचे संजीवकुमार राघव यांनी या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्याकडे तक्रार केली. अळसपुरे यांनी संपूर्ण प्रकरणाचा गत आठ दिवसांपासून सखोल तपास केला, त्यानंतर दिल्ली येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुस्तक विक्रेत्यांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी सात पुस्तक विक्रेत्यांकडून एस. चांद प्रकाशनाच्या नावावरील बनावट पुस्तकांची विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले. या सात पुस्तक विक्रेत्यांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या पुस्तक विक्रेत्यांकडून तब्बल १ लाख ५४ हजार ९३६ रुपयांची पुस्तके जप्त करण्यात आली असून, त्यांच्याकडे आणखी बनावट पुस्तकांचा साठा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सात पुस्तक विक्रेत्यांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ४७४ आणि प्रतिलिपी अधिकार अधिनिीयमाच्या कलम ६३ आणि ६४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाशकांच्या तक्रारीनंतरच होते पोलीस कारवाईराज्यासह देशात प्रतिलिपी अधिकार अधिनियमाचे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात बनावट पुस्तकांची छपाई करून विक्री करण्यात येत आहे; मात्र यावर कारवाई करण्यासाठी संबंधित प्रकाशनाचे संचालक यांची तक्रार आवश्यक आहे. प्रकाशकांची तक्रार आल्यानंतरच पोलीस कारवाई करण्यात येते. सोमवारी अकोल्यातील कारवाईही पुस्तक प्रकाशकांच्या तक्रारीनंतर करण्यात आली.पुस्तक विक्रेत्यांकडे दोन वेळा पडताळणीदिल्ली येथील एस. चांद प्रकाशनाचे संजीवकुमार राघव यांना चिवचिव बाजारातून बनावट पुस्तकांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी स्वत: पडताळणी केली. त्यानंतर विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी बनावट पुस्तक विक्रीसंदर्भात गत ८ दिवसात दोन वेळा पडताळणी केल्यानंतर सोमवारी ही कारवाई केली. हे आहेत अटकेतील पुस्तक विक्रेतेविजय बुक डेपोचे संचालक विजय भीमराव जाधव, अग्रवाल बुक स्टॉलचे संचालक हरीशकुमार भगवानदास अग्रवाल, हरणे बुक स्टॉलचे संचालक महेंद्र सुधाकर हरणे, श्री पुस्तक घरचे संचालक श्रीकांत चंद्रभान डाबरे, मराठा बुक्सचे संचालक गोपाळ प्रभाकर हरणे, चेतन बुक स्टॉलचे वासुदेव सांगोळे, श्री साई बुक्सचे संचालक पंकज वासुदेव सांगोळे या सात पुस्तक विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.दहा वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षासात पुस्तक विक्रेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या भारतीय दंड विधानाच्या गुन्ह्यात तसेच प्रतिलिपी अधिकार अधिनियमाच्या उल्लंघन प्रकरणात पुस्तक विक्रेत्यांना दहा वर्षांपासून ते आजन्म कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. हा प्रकार पोलिसांनी पुस्तक विक्रेत्यांच्या लक्षात आणताच त्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते; मात्र त्यासाठी आता या प्रकरणाचा तपास खमक्या पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्याची गरज आहे.प्रतिलिपी उल्लंघनाची पहिलीच पोलीस कारवाईप्रतिलिपी अधिकार अधिनियमाची पोलिसांकडून करण्यात आलेली ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे. राज्यातील बहुतांश पुस्तक विक्रेत्यांकडून बनावट पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या पोलीस कारवाई करण्यास अडचण असल्याने कारवाई होत नाही. या प्रकरणात प्रकाशकांकडून तक्रार प्राप्त झाल्याने विशेष पथकाने ही कारवाई केली.