शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

चार लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘अनलॉक लर्निंग’ उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:24 IST

गावोगावी समन्वय समिती; पाड्यांपर्यंत पोहोचविले शिक्षण

- यदु जोशीमुंबई : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या शहरी किंवा ग्रामीण भागातील शाळांच्या मुलांपर्यंत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण पोहोचविण्यासाठी धडपड सुरू असली तरी ते प्रत्यक्ष किती टक्के मुलांपर्यंत पोहोचतेय या विषयी अजूनही शंका असतानाच दुसरीकडे आदिवासी विकास विभागाने आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुशिक्षित युवक, पालकांच्या मदतीने गाव/पाड्यांवर शिक्षणाची गंगा पोहोचविणारा ‘अनलॉक लर्निंग’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला असून तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे.आदिवासी विकास विभागाने त्यासाठीचा कार्यक्रम तयार केला आणि जुलैच्या मध्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. आश्रमाशाळांची मुले लॉकडाऊनमुळे दुर्गम भागातील आपापल्या गावी असताना त्यांना शिकवणे हे अतिशय मोठे आव्हान एकीकडे आणि वायफाय, ई-लर्निंगच्या सुविधा त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत हे वास्तव दुसरीकडे अशी स्थिती असताना आदिवासी मुले शिक्षणापासून कोणत्याही परिस्थितीत वंचित राहता कामा नयेत, या एकमेव ध्यासातून हजारो हात पुढे आले आणि ई-संवादाची साधने नसली तरी फारसे काही अडत नाही, हेही या निमित्ताने सिद्ध झाले. इयत्ता बारावीनंतरच्या शिक्षणासाठी राज्यातील विविध वसतिगृहांमध्ये राहणारे ५४ हजार विद्यार्थीही सध्या त्यांच्या गावीच आहेत. त्यांचीही अध्यापन आणि शिक्षणपूरक उपक्रमांसाठी मदत घेतली जात आहे. त्यांच्या वसतिगृहांच्या गृहपालांनी त्यांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रूप तयार केले असून त्या माध्यमातून त्यांच्या योगदानाचा नियमित आढावा घेतला जातो.मोफत पुस्तके पोहोचविण्यात...शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य शाळा या सर्वच निवासी आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे तेथील मुले आपापल्या गावी गेली. अशावेळी त्यांना शिक्षणाशी जोडण्यासाठीचा कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्या मदतीने आखला.प्रत्येक शाळेच्या पाच ते आठ किमीच्या परिसरातील गावे/पाड्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पोहोचविण्यात आली. शिक्षक त्या-त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टंन्सिंगचे भान राखत शिकवू लागले. पावसाळ्यात हे काम किती कठीण आहे हे आदिवासी भागात गेल्याशिवाय कळत नाही. नियमित शिक्षणाबरोबरच पूरक शिक्षणासाठी वर्कबूक, अ‍ॅक्टिव्हिटी बूक पुरविण्यात आले.गावोगावी समन्वय समित्या स्थापून गावातील सुशिक्षित लोक, पालकही शिक्षणाची गंगा मुलांपर्यंत पोहोचवित आहेत. पाड्यांपर्यंत यंत्रणा पोहोचविली जात आहे.