शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

बळीराजाचे नव्हे, हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणा-यांचे राज्य - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 1, 2017 07:39 IST

हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणा-यांचे राज्य म्हणावे लागेल अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 01 - मान्सून चांगला होऊनही राज्यातील शेतकऱ्यांची परवड थांबलेली नाही. सरकार बदलले असले तरी बळीराजाचे रुसलेले नशीब बदललेले नाही. तेव्हा सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चुकीच्या सरकारी धोरणांने केलेल्या ‘हत्या’च आहेत, असे कुणी म्हटले तर सत्ताधाऱ्यांकडे त्याचे काय उत्तर आहे? कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा करायचा नाही आणि दुसरीकडे वरुणकृपेने फुललेल्या शेतमळ्यातील पीक कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणायची. हे बळीराजाचे राज्य नव्हे. हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणाऱ्यांचे राज्य म्हणावे लागेल अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून केली आहे.
 
महाराष्ट्रावर या वर्षी वरुणराजाने कृपावृष्टी केली. त्यात पुन्हा राज्यातील सत्ताधाऱ्यांनीही जलसिंचनाच्या कामाबाबत बऱ्याच वल्गना केल्या. त्यामुळे राज्यातील बळीराजाच्या मानेभोवती आवळला गेलेला आत्महत्येचा फास निदान या वर्षी तरी सैल होईल अशी अपेक्षा होती, मात्र कसचे काय अन् कसचे काय! शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला काही तयार नाही. मराठवाड्यात तर दर दिवशी दोन शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळावे लागत आहे. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा केंद्रबिंदू मराठवाडा झाला आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील भाजप सरकार जलसिंचनासह अनेक कामांच्या गमजा नेहमीच मारीत असते. आताही जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्या पक्षाने त्या विषयी स्व-कौतुकाचे ढोल यथेच्छ पिटले, पण मग तरीही मराठवाड्यात दिवसाला दोन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ का आली, या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारलाच द्यावे लागेल. किंबहुना सध्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या अधिकगंभीर आणि चिंताजनक आहेत. कारण त्या कर्जबाजारीपणा किंवा नापिकीमुळे होत नसून शेतमालाच्या पडलेल्या भावांमुळे होत आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
वरुणराजाच्या कृपेने पाच-सहा वर्षांनंतर प्रथमच मराठवाड्यातील शेतीशिवारे फुलली, पीकपाणी चांगले झाले, पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या समाधानाचे हसू फुलूच द्यायचे नाही असा चंगच जणू राज्यातील भाजप सरकारने बांधला आहे. त्यामुळेच शेतमालाचे भाव पडले आणि बळीराजाचे फुललेले नशीबही मावळले. त्यामुळे मागील दोन महिन्यांत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा ११७ वर पोहाचला अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
मोदी सरकारच्या नोटाबंदीचा वरवंटा ऐन सुगीच्या हंगामात फिरला. त्यामुळे पडेल त्या किमतीला खरीपाचे पीक व्यापाऱ्यांच्या तागडीत ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. रब्बी हंगामासाठी बी-बियाणे, खते घेण्याचीही मारामार झाली. त्याचीच परिणती आज मराठवाडय़ात दर दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येत झाली आहे. तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांचीही अवस्था खरेदी केंद्रे बंद करून राज्य सरकारने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी केली आहे. ही खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी हजारो शेतकऱ्यांचे व्हायचे ते आर्थिक नुकसान झालेच आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.