शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

बळीराजाचे नव्हे, हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणा-यांचे राज्य - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 1, 2017 07:39 IST

हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणा-यांचे राज्य म्हणावे लागेल अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 01 - मान्सून चांगला होऊनही राज्यातील शेतकऱ्यांची परवड थांबलेली नाही. सरकार बदलले असले तरी बळीराजाचे रुसलेले नशीब बदललेले नाही. तेव्हा सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चुकीच्या सरकारी धोरणांने केलेल्या ‘हत्या’च आहेत, असे कुणी म्हटले तर सत्ताधाऱ्यांकडे त्याचे काय उत्तर आहे? कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा करायचा नाही आणि दुसरीकडे वरुणकृपेने फुललेल्या शेतमळ्यातील पीक कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणायची. हे बळीराजाचे राज्य नव्हे. हे तर शेतकऱ्यांचे ‘बळी’ घेणाऱ्यांचे राज्य म्हणावे लागेल अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून केली आहे.
 
महाराष्ट्रावर या वर्षी वरुणराजाने कृपावृष्टी केली. त्यात पुन्हा राज्यातील सत्ताधाऱ्यांनीही जलसिंचनाच्या कामाबाबत बऱ्याच वल्गना केल्या. त्यामुळे राज्यातील बळीराजाच्या मानेभोवती आवळला गेलेला आत्महत्येचा फास निदान या वर्षी तरी सैल होईल अशी अपेक्षा होती, मात्र कसचे काय अन् कसचे काय! शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला काही तयार नाही. मराठवाड्यात तर दर दिवशी दोन शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळावे लागत आहे. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा केंद्रबिंदू मराठवाडा झाला आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील भाजप सरकार जलसिंचनासह अनेक कामांच्या गमजा नेहमीच मारीत असते. आताही जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्या पक्षाने त्या विषयी स्व-कौतुकाचे ढोल यथेच्छ पिटले, पण मग तरीही मराठवाड्यात दिवसाला दोन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ का आली, या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारलाच द्यावे लागेल. किंबहुना सध्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या अधिकगंभीर आणि चिंताजनक आहेत. कारण त्या कर्जबाजारीपणा किंवा नापिकीमुळे होत नसून शेतमालाच्या पडलेल्या भावांमुळे होत आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
वरुणराजाच्या कृपेने पाच-सहा वर्षांनंतर प्रथमच मराठवाड्यातील शेतीशिवारे फुलली, पीकपाणी चांगले झाले, पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या समाधानाचे हसू फुलूच द्यायचे नाही असा चंगच जणू राज्यातील भाजप सरकारने बांधला आहे. त्यामुळेच शेतमालाचे भाव पडले आणि बळीराजाचे फुललेले नशीबही मावळले. त्यामुळे मागील दोन महिन्यांत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा ११७ वर पोहाचला अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
मोदी सरकारच्या नोटाबंदीचा वरवंटा ऐन सुगीच्या हंगामात फिरला. त्यामुळे पडेल त्या किमतीला खरीपाचे पीक व्यापाऱ्यांच्या तागडीत ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. रब्बी हंगामासाठी बी-बियाणे, खते घेण्याचीही मारामार झाली. त्याचीच परिणती आज मराठवाडय़ात दर दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येत झाली आहे. तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांचीही अवस्था खरेदी केंद्रे बंद करून राज्य सरकारने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी केली आहे. ही खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी हजारो शेतकऱ्यांचे व्हायचे ते आर्थिक नुकसान झालेच आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.