शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

सर्व महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांना अभय

By admin | Updated: March 23, 2015 02:33 IST

राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबतचा सीताराम कुंटे समितीचा अहवाल तत्त्वत: स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

संदीप प्रधान - मुंबईराज्यातील सर्व महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबतचा सीताराम कुंटे समितीचा अहवाल तत्त्वत: स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सर्वप्रथम होत असून, त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाचा लाभ मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांना होणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना कुंटे समितीचा अहवाल तत्त्वत: स्वीकारल्याचे पत्र दिले आहे. कदम म्हणाले की, केवळ औरंगाबाद महापालिका हद्दीत सुमारे २५ हजार बेकायदा बांधकामे असून, राज्य मंत्रिमंडळाने हा अहवाल स्वीकारल्यानंतर त्यापैकी बहुतांश बांधकामे नियमित केली जातील. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सर्वप्रथम होत असून, तेथे त्याचे पडघम वाजू लागले असताना सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबत मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीमध्ये नगररचना तज्ज्ञ, अन्य काही महापालिकांचे आयुक्त यांचा समावेश होता. समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अहवाल विधि व न्याय विभाग आणि महसूल खात्याकडे अभ्यासाकरिता धाडला आहे. महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व अहवालातील शिफारशी यांचा अभ्यास केल्यानंतर कायद्याच्या चौकटीत बसवून जी बांधकामे नियमित करणे शक्य आहे ती केली जातील, असे सांगण्यात आले.विमानतळ, संरक्षण दल, बफर आणि इकॉलॉजिकली सेन्सेटीव्ह झोनमधील बेकायदा बांधकामे नियमित होऊ शकत नसल्याचे कुंटे समितीने नमूद केले आहे. राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यावर प्रत्येक बेकायदा बांधकामाचे प्रकरण तपासून निर्णय घ्यावा लागेल, असे जाणकारांचे मत आहे. हरित पट्ट्यातील बेकायदा बांधकामे आरक्षण बदलून नियमित केली जाऊ शकतात. पूर्वपरवानगी न घेता केलेली बेकायदा बांधकामे दंड आकारून नियमित केली जाऊ शकतात.