शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

मुंबई विद्यापीठ निकाल : कंत्राटी प्राध्यापकांमुळे मूल्यांकन रखडले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:59 IST

सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांमध्ये बहुतांश प्राध्यापक हे कायमस्वरूपी नसल्याने त्याचा फटका मूल्यांकनाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मदतीवरच विद्यापीठाच्या निकालाची मदार असल्याचे समजते.

मुंबई : मुंबई विद्यापीठात सध्या ८ लाख वाणिज्यच्या (बी. कॉम) उत्तरपत्रिकांचा समावेश असून त्यात २ लाख उत्तरपत्रिका या सेल्फ फायनान्सच्या अभ्यासक्रमांच्या आहेत. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांमध्ये बहुतांश प्राध्यापक हे कायमस्वरूपी नसल्याने त्याचा फटका मूल्यांकनाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मदतीवरच विद्यापीठाच्या निकालाची मदार असल्याचे समजते.दरम्यान, आयडॉलच्या २ लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि पारंपरिक अभ्यासक्रमांमधील १ लाख उत्तरपत्रिका या अनुदानित महाविद्यालयांच्या आहेत. तर उरलेल्या सर्व उत्तरपत्रिका या विनाअनुदानित महाविद्यालयांतील आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीचा कोटा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे उरलेल्या उत्तरपत्रिका कोण तपासणार, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांकडून विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून घेण्याचा पर्याय विद्यापीठासमोर उपलब्ध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वेळेत निकाल लावण्यासाठी याआधीच विद्यापीठ प्रशासनाने राज्यातील इतर विद्यापीठांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. इतर विद्यापीठातील प्राध्यापकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दर्जाही प्रशासनाने तपासला आहे. त्यात मुंबई आणि बाहेरील प्राध्यापकांच्या तापसणीमध्ये फारशी तफावत नसल्याची माहिती विशेष अधिकारी विनायक दळवी यांनी दिली. उरलेल्या उत्तरपत्रिकाही इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांकडून तपासून घेण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.२१७ निकाल बाकीमुंबई विद्यापीठातील एकूण ३०७ निकाल गुरुवारी रात्रीपर्यंत जाहीर झाले आहेत. तर अद्याप २१७ निकाल निकाल बाकी आहेत. गुरुवारी १ हजार ३८ प्राध्यापकांनी १९ हजार ७५८ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण केले.रखडलेले निकाल वेळेवर लावण्याचे प्रमुख आव्हान आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाºयांसोबत चर्चा सुरू असून लवकरच निकाल जाहीर केले जातील. हेल्प डेस्कचा आढावा घेऊन त्यातील त्रुटीही दूर केल्या जातील.- डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू