शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

विद्यापीठ, उद्योगांचा समन्वय आवश्यक

By admin | Updated: January 4, 2015 02:27 IST

देशाच्या उद्यमशीलतेला गती मिळावी आणि विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी विद्यापीठांचा उद्योगांबरोबर समन्वय असणे आवश्यक आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटनमुंबई : देशाच्या उद्यमशीलतेला गती मिळावी आणि विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी विद्यापीठांचा उद्योगांबरोबर समन्वय असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. वैज्ञानिक प्रकल्पांना निधी देण्याचे प्रस्ताव फार काळ प्रलंबित राहता कामा नये आणि यासाठी वैज्ञानिक विभागांना योग्य अधिकार असले पाहिजेत, असेही पंतप्रधान म्हणाले.मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री वाय. एस. चौधरी आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर आदी मान्यवर उपस्थित होते.भारताच्या समृद्ध भविष्यासाठी आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती यांना देशाच्या सर्वाधिक प्राधान्यक्रमाच्या बाबींमध्ये समाविष्ट केले पाहिजे. ग्रामीण भागात सुयोग्य आणि किफायतशीर तंत्रज्ञानाचा विकास, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, प्रदूषणविरहित तंत्रज्ञान किफायतशीर करणे आणि भारताला एक आघाडीचे उत्पादनक्षम राष्ट्र बनविण्यासह ज्ञान व तंत्रज्ञानाने युक्त उद्योगांचे केंद्र बनविणे ही भारतीय शास्त्रज्ञांसमोरील महत्त्वाची उद्दिष्टे असल्याचे मोदी म्हणाले.देशाची प्रगती आणि त्या देशातील मानवविकास यांचा संबंध विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता म्हणून उदय होत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक घडामोडींमध्ये देखील दुसरा क्रमांक मिळविण्याची कामगिरी चीनने केली आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले.पंतप्रधान मोदींकडून नेहरूंचा गौरव !भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायम विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देत भारताला सक्षम करण्याचा प्रयत्न केला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी काढले. महात्मा गांधींपासून पंडित नेहरू यांच्या नीतीवर भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटना टीका करीत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंबद्दल काढलेल्या या गौरवोद्गारावरून एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.जगाने आपल्यासाठी त्यांचे दरवाजे बंद केले, त्या वेळी भारतीय शास्त्रज्ञांनी त्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. ज्या वेळी जगाने आपल्याकडे सहकार्याची अपेक्षा केली़ त्यावेळी आपल्या समाजात असलेल्या स्वाभाविक वृत्तीला अनुसरून खुल्या दिलाने आपण सहकार्याचा हात पुढे केला, असेही त्यांनी नमूद केले.पहिल्याच प्रयत्नात मंगळ यानाला मंगळाच्या कक्षेत पोहोचवण्याची कामगिरी आणि ‘हुदूद’ या चक्रीवादळाचे अचूक भाकीत करून हजारो लोकांचे जीव वाचवण्यात भरीव योगदान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले.प्रत्येक सरकारी विभागात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर देणारा अधिकारी असावा आणि अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी अर्थसंकल्पात ठरावीक निधीची तरतूद करावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. आपल्या देशातील विज्ञान आणि शास्त्रज्ञ याविषयी आपण अभिमान बाळगत त्यांची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असेही मोदी म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीस मोदी यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांना श्रद्धांजली वाहिली.वाढत्या नैसर्गिक आपत्ती राज्यापुढे आव्हान निर्माण करीत असून, त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. नैसर्गिक आपत्तींमुळे आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. या वेळी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेही भाषण झाले.