शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

विद्यापीठाने खेळ मांडला परीक्षेचा

By admin | Updated: May 14, 2015 01:19 IST

परीक्षांची स्थिती : दरवेळी नवीन चूक; विद्यार्थी कमालीचे वैतागले

संतोष मिठारी= कोल्हापूर -कधी हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका, कधी प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या भागाची छपाई नाही, तर परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर पेपर होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगणे, असे प्रकार शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये घडत आहेत. परीक्षांबाबत दरवेळी एक नवीन चूक होत आहे. त्यामुळे विद्यार्थी वैतागले असून, एकूणच परीक्षांची सद्य:स्थिती पाहता ‘कालचा गोंधळ बरा होता’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील परीक्षा सध्या सुरू आहेत. यात नियमित विद्यार्थ्यांसह दूरशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पहिल्या सत्राचा निकाल मिळविणे आणि दुसऱ्या सत्रासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील गोंधळातच पार पडली. त्यानंतर काही दिवसांत परीक्षा सुरू झाल्या; पण काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबतचा गोंधळ सुरू झाला. एप्रिलमध्ये बी. एड्.च्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषयाची हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. माध्यमशिक्षण विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दुसऱ्या भागाची छपाई न करून विद्यापीठाने कहर केला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपूर्वी दूरशिक्षण विभागातील एम. ए. समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना प्रश्नपत्रिका नसल्याने पेपर होणार नसल्याचे सांगून विद्यापीठाने अनागोंदी कारभाराचे टोक गाठले. पत्रकारितेच्या पदविका परीक्षेत मूळ विषयाऐवजी दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात पडली. दरवेळी नवीन चूक होत असून त्याला परीक्षा अथवा दूरशिक्षण विभाग जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. वर्षभर अभ्यास करायचा आणि नेमक्या परीक्षेच्या वेळी विद्यापीठाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. यात दोष नसतानाही विद्यार्थी भरडले जात आहेत. गुणवत्तेचा केंद्रबिंदू पुण्याकडून कोल्हापूरकडे सरकविणाऱ्या विद्यापीठाच्या नावलौकिकाला परीक्षेबाबतचे असे प्रकार बाधा पोहोचविणारे आहे.परीक्षेत गोंधळाचे प्रकार घडू नयेत, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना परीक्षा विभाग आणि दूरशिक्षण विभागाला दिल्या आहेत. अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने बैठक घेण्याचे नियोजन आहे.- डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलगुरूपरीक्षा आणि दूरशिक्षण विभागात समन्वय नसल्याने गोंधळाचे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. परीक्षांतील गोंधळाचे प्रकार वाढतच आहेत. ते थांबविण्यासाठी विद्यापीठाने यंत्रणा कार्यान्वित करावी. विद्यार्थ्यांच्या परीक्षाविषयक अडचणींबाबत येत्या आठवड्यात कुलगुरूंना भेटणार आहे.- अवधूत अपराध, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी सेनासमन्वय, सहकार्याचा अभावअनेक अभ्यासक्रमांच्या नियमित आणि दूरशिक्षण विभागाची विद्यार्थ्यांची परीक्षा एकत्रितपणे होते. त्यांना विनात्रास परीक्षा देता यावी, ही जबाबदारी परीक्षा विभागासह दूरशिक्षण विभागाची आहे. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे. शिवाय काही कर्मचारी यंत्रणेतील काही घटकांना सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षांबाबतचा गोंधळ वारंवार उडत आहे. विद्यापीठाचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांबाबत संबंधित विभाग गंभीर नाही. गेल्या महिन्याभरातील गोंधळाचे प्रकार पाहिल्यानंतर ते स्पष्ट होत असल्याच्या प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.