शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विद्यापीठाने खेळ मांडला परीक्षेचा

By admin | Updated: May 14, 2015 01:19 IST

परीक्षांची स्थिती : दरवेळी नवीन चूक; विद्यार्थी कमालीचे वैतागले

संतोष मिठारी= कोल्हापूर -कधी हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका, कधी प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या भागाची छपाई नाही, तर परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर पेपर होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगणे, असे प्रकार शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये घडत आहेत. परीक्षांबाबत दरवेळी एक नवीन चूक होत आहे. त्यामुळे विद्यार्थी वैतागले असून, एकूणच परीक्षांची सद्य:स्थिती पाहता ‘कालचा गोंधळ बरा होता’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील परीक्षा सध्या सुरू आहेत. यात नियमित विद्यार्थ्यांसह दूरशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पहिल्या सत्राचा निकाल मिळविणे आणि दुसऱ्या सत्रासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील गोंधळातच पार पडली. त्यानंतर काही दिवसांत परीक्षा सुरू झाल्या; पण काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबतचा गोंधळ सुरू झाला. एप्रिलमध्ये बी. एड्.च्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषयाची हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. माध्यमशिक्षण विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दुसऱ्या भागाची छपाई न करून विद्यापीठाने कहर केला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपूर्वी दूरशिक्षण विभागातील एम. ए. समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना प्रश्नपत्रिका नसल्याने पेपर होणार नसल्याचे सांगून विद्यापीठाने अनागोंदी कारभाराचे टोक गाठले. पत्रकारितेच्या पदविका परीक्षेत मूळ विषयाऐवजी दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात पडली. दरवेळी नवीन चूक होत असून त्याला परीक्षा अथवा दूरशिक्षण विभाग जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. वर्षभर अभ्यास करायचा आणि नेमक्या परीक्षेच्या वेळी विद्यापीठाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. यात दोष नसतानाही विद्यार्थी भरडले जात आहेत. गुणवत्तेचा केंद्रबिंदू पुण्याकडून कोल्हापूरकडे सरकविणाऱ्या विद्यापीठाच्या नावलौकिकाला परीक्षेबाबतचे असे प्रकार बाधा पोहोचविणारे आहे.परीक्षेत गोंधळाचे प्रकार घडू नयेत, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना परीक्षा विभाग आणि दूरशिक्षण विभागाला दिल्या आहेत. अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने बैठक घेण्याचे नियोजन आहे.- डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलगुरूपरीक्षा आणि दूरशिक्षण विभागात समन्वय नसल्याने गोंधळाचे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. परीक्षांतील गोंधळाचे प्रकार वाढतच आहेत. ते थांबविण्यासाठी विद्यापीठाने यंत्रणा कार्यान्वित करावी. विद्यार्थ्यांच्या परीक्षाविषयक अडचणींबाबत येत्या आठवड्यात कुलगुरूंना भेटणार आहे.- अवधूत अपराध, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी सेनासमन्वय, सहकार्याचा अभावअनेक अभ्यासक्रमांच्या नियमित आणि दूरशिक्षण विभागाची विद्यार्थ्यांची परीक्षा एकत्रितपणे होते. त्यांना विनात्रास परीक्षा देता यावी, ही जबाबदारी परीक्षा विभागासह दूरशिक्षण विभागाची आहे. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे. शिवाय काही कर्मचारी यंत्रणेतील काही घटकांना सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षांबाबतचा गोंधळ वारंवार उडत आहे. विद्यापीठाचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांबाबत संबंधित विभाग गंभीर नाही. गेल्या महिन्याभरातील गोंधळाचे प्रकार पाहिल्यानंतर ते स्पष्ट होत असल्याच्या प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.