शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

नव्या सिटी टॅक्सीविरोधात एकजूट

By admin | Updated: November 4, 2016 00:57 IST

महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१६ च्या मसुद्याला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला़

पुणे : अखिल भारतीय पर्यटक परवान्यावर धावणाऱ्या कंपन्यांच्या टॅक्सींना अधिकृत करणाऱ्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या नवीन महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१६ च्या मसुद्याला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला़ त्यातील पहिले पाऊल म्हणून या मसुद्याला विरोध करणाऱ्या हरकती परिवहन आयुक्तांकडे हरकती नोंदविण्याचे या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले़ पुण्यातील रिक्षा पंचायतीच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीला रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ़ बाबा आढाव, एसटीकामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, पुणे पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, निरुउद्दीन इनामदार, ट्रॅक्सी युनियनचे अध्यक्ष शिवाजी खांदवे, मोटार वाहन अधिनियमविषयक तज्ज्ञ अ‍ॅड़ पी़ बी़ शाळिग्राम, रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ शासनाने जाहीर केलेला अधिनियमांचा मसुदा म्हणजे रिक्षांसह टॅक्सी, शहरी बस व राज्य परिवहन महामंडळ या सार्वजनिक वाहतूक देणाऱ्यांना संपविण्याचा बेत आहे़ खासगी कंपन्यांना तकलादू नियमांची चौकट तयार करून त्यांना अधिकृत करून घ्यायचे, असे पद्धतशीर षड्यंत्र रचले आहे़ शहरी प्रवासी वाहतुकीसाठी शहर परिवहन सेवेतील कर्मचारी यांची अवस्था आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांसारखी होणे अपरिहार्य आहे़ या मसुद्यास हरकत नोंदवूनही तो अंतिम झाल्यास सर्व सार्वजनिक परिवहन सेवा ही अस्तित्वाची लढाई समजून एकजुटीने त्याला विरोध करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला़ त्यातील पहिले पाऊस म्हणून सर्व संघटना व त्यांच्या सदस्यांनी परिवहन आयुक्तांकडे या मसुद्यावर हरकती नोंदविण्यात येणार आहे़ याविषयी शासनाला एकजूट दाखविण्यासाठी रिक्षा, टॅक्सी, पीएमपी व एसटी या चार प्रमुख घटकांची या महिनाभरात डॉ़ बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले़ शासनाकडून रिक्षा, टॅक्सीचालकांना ते सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणून परवाना दिला जातो़ त्यांच्या रोजगारावर या अधिनियमामुळे अतिक्रमण होणार असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले़(प्रतिनिधी)>शासनाचा या मसुद्यातील काही तरतुदी भारतीय संविधानाच्या विरोधात तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीच्या विरोधात असल्याचे मत मोटार वाहननियमातील तज्ज्ञ अ‍ॅड़ पी़ बी़ शाळिग्राम यांनी या वेळी सांगितले़