शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

केळी खोडापासून धागा निर्मितीचा राज्यातील अनोखा प्रकल्प

By admin | Updated: February 16, 2017 08:40 IST

केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत /वासुदेव सरोदे

जळगाव, दि. 16 - केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न तर मिळतेच शिवाय ५५० जणांना रोजगारही मिळाला आहे. राज्यातील हा एक अनोखा प्रयोग मानला जात आहे.

राज्यात एकूण ७१ हजार ०७२ हेक्टरवर केळी लागवड केली जाते. यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात ४४ हजार ३०२ हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. एका हेक्टरमध्ये सुमारे ४ हजार ४४४ खोड असतात. एक हेक्टर केळी पिकातून सरासरी ६०-८० टन केळी खोड मिळते. शेतकरी ही खोडे बांध अथवा नाल्यात फेकून देतात, यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये प्रती हेक्टर खर्च येतो.

शेतकऱ्यांच्या पैशांची बचत व्हावी आणि थोडाफार आर्थिक आधार मिळावा, यासाठी ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स को-आॅप. सोसायटीने केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग सुरू केला आहे. या प्रकल्पाची किंमत- ६९४.०५ लाख रुपये इतकी आहे. शासनाने राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत २४७.४२ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. यात शेतकऱ्यांचा सहभाग १११.९९ लाख रुपये व संस्थेचा सहभाग ३३४.६४ लाख रुपये इतका आहे. हा प्रकल्प नवसारी कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित आहे.

एका केळीच्या खोडाचे वजन अंदाजे २० किलो असते. यात २-३ किलो वजन हे आतील नाजूक भागाचे असते. उर्वरित केळीच्या खोडातून सुमारे ३०० ते ४०० ग्रॅम धागा व १५ ते १६ किलो भाग हा टाकावू असतो. यात ७ ते ८ लीटर पाणी असते. ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स को-आॅप. सोसायटीने यावल तालुक्यात चार ठिकाणी अर्थात मस्कावद, सातोद, दहिगाव व यावल येथे केळीपासून धागानिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.

यानंतर बोदवड, वरणगाव, खानापूर, हंबर्डी, चिनावल व वाघोड अशा सहा ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही सहा केंद्रे यशस्वी झाली तर आणखी १० प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण व जागृती-केळी उत्पादक तसेच या लघु उद्योग केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

खोडाच्या पाण्यापासून उत्पादने केळी खोडातील पाण्यापासून सेंद्रिय द्रवरूप खत तयार करण्याच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. हे द्रवरूप खत ‘ताप्ती एनर्जी’ या नावाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात राज्यात या द्रवरूप खताची मागणी असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.केळी खोडापासून अशी होते धागानिर्मिती ४शेतकरी बांधवांसाठी पथदर्शी असलेला टाकावू केळी खोडापासून धागा व खत निर्मितीचा प्रकल्प सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पात पूर्वी शेतकऱ्यांकडून फेकले जाणारे खोड आता ५०० रुपये टनाप्रमाणे खरेदी केले जाते. हे केळी खोड प्रकल्पात आणून खोडातील मधोमध असलेला नाजूक भाग वेगळा करण्यात येतो. त्यानंतर खोडाच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात व एक-एक पाकळी मशीनमध्ये टाकून धागा निर्मिती केली जाते. या प्रक्रि येतील टाकावू वस्तू गोळा होते त्याला प्रेसमध्ये त्यातील पाणी वेगळे केले जाते. या पाण्यापासून सेंद्रीय द्रवरुप खतनिर्मिती होते व राहिलेल्या टाकावू भागापासून पुन्हा गांडूळ व कम्पोस्ट खत तयार करण्यात येते. अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख चेअरमन आमदार हरिभाऊ जावळे व व्हा.चेअरमन डॉ.आर.एम.चौधरी यांनी दिली. केळी खोडाच्या पाण्यात नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जिब्रालिक अ‍ॅसिड या सारखे पीक वाढ प्रवर्तक असते. केळी खोडाचे पाणी पिकाला दिल्यास पिकाची वाढ जोमाने होते व रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते. सद्य स्थितीला केळी खोडाचे धागे विक्री करण्यात येत आहेत. आतापर्यंत १ हजार ४४५ किलो धाग्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आता केळी खोडाच्या धाग्यांपासून हात कागद व बोर्ड निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी पुढील वर्षी करण्याचा मानस या ताप्ती एनर्जी संस्थेचा आहे.