शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

केळी खोडापासून धागा निर्मितीचा राज्यातील अनोखा प्रकल्प

By admin | Updated: February 16, 2017 08:40 IST

केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत /वासुदेव सरोदे

जळगाव, दि. 16 - केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न तर मिळतेच शिवाय ५५० जणांना रोजगारही मिळाला आहे. राज्यातील हा एक अनोखा प्रयोग मानला जात आहे.

राज्यात एकूण ७१ हजार ०७२ हेक्टरवर केळी लागवड केली जाते. यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात ४४ हजार ३०२ हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. एका हेक्टरमध्ये सुमारे ४ हजार ४४४ खोड असतात. एक हेक्टर केळी पिकातून सरासरी ६०-८० टन केळी खोड मिळते. शेतकरी ही खोडे बांध अथवा नाल्यात फेकून देतात, यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये प्रती हेक्टर खर्च येतो.

शेतकऱ्यांच्या पैशांची बचत व्हावी आणि थोडाफार आर्थिक आधार मिळावा, यासाठी ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स को-आॅप. सोसायटीने केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग सुरू केला आहे. या प्रकल्पाची किंमत- ६९४.०५ लाख रुपये इतकी आहे. शासनाने राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत २४७.४२ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. यात शेतकऱ्यांचा सहभाग १११.९९ लाख रुपये व संस्थेचा सहभाग ३३४.६४ लाख रुपये इतका आहे. हा प्रकल्प नवसारी कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित आहे.

एका केळीच्या खोडाचे वजन अंदाजे २० किलो असते. यात २-३ किलो वजन हे आतील नाजूक भागाचे असते. उर्वरित केळीच्या खोडातून सुमारे ३०० ते ४०० ग्रॅम धागा व १५ ते १६ किलो भाग हा टाकावू असतो. यात ७ ते ८ लीटर पाणी असते. ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स को-आॅप. सोसायटीने यावल तालुक्यात चार ठिकाणी अर्थात मस्कावद, सातोद, दहिगाव व यावल येथे केळीपासून धागानिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.

यानंतर बोदवड, वरणगाव, खानापूर, हंबर्डी, चिनावल व वाघोड अशा सहा ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही सहा केंद्रे यशस्वी झाली तर आणखी १० प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण व जागृती-केळी उत्पादक तसेच या लघु उद्योग केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

खोडाच्या पाण्यापासून उत्पादने केळी खोडातील पाण्यापासून सेंद्रिय द्रवरूप खत तयार करण्याच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. हे द्रवरूप खत ‘ताप्ती एनर्जी’ या नावाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात राज्यात या द्रवरूप खताची मागणी असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.केळी खोडापासून अशी होते धागानिर्मिती ४शेतकरी बांधवांसाठी पथदर्शी असलेला टाकावू केळी खोडापासून धागा व खत निर्मितीचा प्रकल्प सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पात पूर्वी शेतकऱ्यांकडून फेकले जाणारे खोड आता ५०० रुपये टनाप्रमाणे खरेदी केले जाते. हे केळी खोड प्रकल्पात आणून खोडातील मधोमध असलेला नाजूक भाग वेगळा करण्यात येतो. त्यानंतर खोडाच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात व एक-एक पाकळी मशीनमध्ये टाकून धागा निर्मिती केली जाते. या प्रक्रि येतील टाकावू वस्तू गोळा होते त्याला प्रेसमध्ये त्यातील पाणी वेगळे केले जाते. या पाण्यापासून सेंद्रीय द्रवरुप खतनिर्मिती होते व राहिलेल्या टाकावू भागापासून पुन्हा गांडूळ व कम्पोस्ट खत तयार करण्यात येते. अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख चेअरमन आमदार हरिभाऊ जावळे व व्हा.चेअरमन डॉ.आर.एम.चौधरी यांनी दिली. केळी खोडाच्या पाण्यात नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जिब्रालिक अ‍ॅसिड या सारखे पीक वाढ प्रवर्तक असते. केळी खोडाचे पाणी पिकाला दिल्यास पिकाची वाढ जोमाने होते व रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते. सद्य स्थितीला केळी खोडाचे धागे विक्री करण्यात येत आहेत. आतापर्यंत १ हजार ४४५ किलो धाग्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आता केळी खोडाच्या धाग्यांपासून हात कागद व बोर्ड निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी पुढील वर्षी करण्याचा मानस या ताप्ती एनर्जी संस्थेचा आहे.