शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

केळी खोडापासून धागा निर्मितीचा राज्यातील अनोखा प्रकल्प

By admin | Updated: February 16, 2017 08:40 IST

केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत /वासुदेव सरोदे

जळगाव, दि. 16 - केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न तर मिळतेच शिवाय ५५० जणांना रोजगारही मिळाला आहे. राज्यातील हा एक अनोखा प्रयोग मानला जात आहे.

राज्यात एकूण ७१ हजार ०७२ हेक्टरवर केळी लागवड केली जाते. यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात ४४ हजार ३०२ हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. एका हेक्टरमध्ये सुमारे ४ हजार ४४४ खोड असतात. एक हेक्टर केळी पिकातून सरासरी ६०-८० टन केळी खोड मिळते. शेतकरी ही खोडे बांध अथवा नाल्यात फेकून देतात, यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये प्रती हेक्टर खर्च येतो.

शेतकऱ्यांच्या पैशांची बचत व्हावी आणि थोडाफार आर्थिक आधार मिळावा, यासाठी ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स को-आॅप. सोसायटीने केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग सुरू केला आहे. या प्रकल्पाची किंमत- ६९४.०५ लाख रुपये इतकी आहे. शासनाने राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत २४७.४२ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. यात शेतकऱ्यांचा सहभाग १११.९९ लाख रुपये व संस्थेचा सहभाग ३३४.६४ लाख रुपये इतका आहे. हा प्रकल्प नवसारी कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित आहे.

एका केळीच्या खोडाचे वजन अंदाजे २० किलो असते. यात २-३ किलो वजन हे आतील नाजूक भागाचे असते. उर्वरित केळीच्या खोडातून सुमारे ३०० ते ४०० ग्रॅम धागा व १५ ते १६ किलो भाग हा टाकावू असतो. यात ७ ते ८ लीटर पाणी असते. ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स को-आॅप. सोसायटीने यावल तालुक्यात चार ठिकाणी अर्थात मस्कावद, सातोद, दहिगाव व यावल येथे केळीपासून धागानिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.

यानंतर बोदवड, वरणगाव, खानापूर, हंबर्डी, चिनावल व वाघोड अशा सहा ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही सहा केंद्रे यशस्वी झाली तर आणखी १० प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण व जागृती-केळी उत्पादक तसेच या लघु उद्योग केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

खोडाच्या पाण्यापासून उत्पादने केळी खोडातील पाण्यापासून सेंद्रिय द्रवरूप खत तयार करण्याच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. हे द्रवरूप खत ‘ताप्ती एनर्जी’ या नावाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात राज्यात या द्रवरूप खताची मागणी असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.केळी खोडापासून अशी होते धागानिर्मिती ४शेतकरी बांधवांसाठी पथदर्शी असलेला टाकावू केळी खोडापासून धागा व खत निर्मितीचा प्रकल्प सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पात पूर्वी शेतकऱ्यांकडून फेकले जाणारे खोड आता ५०० रुपये टनाप्रमाणे खरेदी केले जाते. हे केळी खोड प्रकल्पात आणून खोडातील मधोमध असलेला नाजूक भाग वेगळा करण्यात येतो. त्यानंतर खोडाच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जातात व एक-एक पाकळी मशीनमध्ये टाकून धागा निर्मिती केली जाते. या प्रक्रि येतील टाकावू वस्तू गोळा होते त्याला प्रेसमध्ये त्यातील पाणी वेगळे केले जाते. या पाण्यापासून सेंद्रीय द्रवरुप खतनिर्मिती होते व राहिलेल्या टाकावू भागापासून पुन्हा गांडूळ व कम्पोस्ट खत तयार करण्यात येते. अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख चेअरमन आमदार हरिभाऊ जावळे व व्हा.चेअरमन डॉ.आर.एम.चौधरी यांनी दिली. केळी खोडाच्या पाण्यात नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जिब्रालिक अ‍ॅसिड या सारखे पीक वाढ प्रवर्तक असते. केळी खोडाचे पाणी पिकाला दिल्यास पिकाची वाढ जोमाने होते व रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते. सद्य स्थितीला केळी खोडाचे धागे विक्री करण्यात येत आहेत. आतापर्यंत १ हजार ४४५ किलो धाग्यांची निर्मिती करण्यात आली आहे. आता केळी खोडाच्या धाग्यांपासून हात कागद व बोर्ड निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी पुढील वर्षी करण्याचा मानस या ताप्ती एनर्जी संस्थेचा आहे.