शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

भैया देशमुखांचे अनोखे आंदोलन

By admin | Updated: July 26, 2014 02:12 IST

जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लोटांगण घालत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांना शेतीचे पाणी मिळावे, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लोटांगण घालत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. या वेळी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी देशमुख यांनी साडी परिधान करून नाटय़मयरीत्या हे लोटांगण घातले.
गेल्या कैक वर्षापासून मंगळवेढय़ातील 35 गावांना शेतीचे पाणी पुरवणारा प्रकल्प राबवण्याची मागणी होत आहे. मात्र आघाडी सरकारने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. 9 जूनला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देत गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी आझाद मैदानात धरणो आंदोलन करीत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी पाच मिनिटेही नसल्याने मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी लोटांगण आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अडवणूक करू नये, म्हणून सकाळी सात वाजताच पोलिसांची नजर चुकवून देशमुख काही कार्यकत्र्यासह आझाद मैदानातून बाहेर पडले. त्यानंतर प्रत्येकी दोन-दोन कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर आणि सह्याद्री अतिथीगृहाबाहेर घुटमळत होते. आंदोलनाचा सुगावा लागल्याने सकाळपासून मलबार हिल पोलिसांनी कार्यकत्र्याची धरपकड सुरू केली होती.  दुपारी साडेबारा वाजता देशमुख टॅक्सीतून सह्याद्री अतिथीगृहासमोर पोहोचले. पोलिसांनी ओळखू नये म्हणून त्यांनी चक्क साडी नेसली होती. टॅक्सीतून बाहेर पडल्या पडल्याच त्यांनी लोटांगण घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत असलेल्या दोन-तीन कार्यकत्र्यानीही त्यांना साथ दिली. 
मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तातडीने देशमुख यांच्यासह सुमारे 4क् कार्यकत्र्याना ताब्यात 
घेतले. (प्रतिनिधी)