शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

संघ फूलपॅन्टमध्ये!

By admin | Updated: March 14, 2016 02:56 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी अर्धी चड्डी हा गेल्या ९१ वर्षांपासूनचा खास ओळख बनलेला गणवेश आता काळानुरूप बदलणार आहे. खाकी हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची (ब्राऊन) फुलपॅन्ट या बदलत्या गणवेशात

नागौर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी अर्धी चड्डी हा गेल्या ९१ वर्षांपासूनचा खास ओळख बनलेला गणवेश आता काळानुरूप बदलणार आहे. खाकी हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची (ब्राऊन) फुलपॅन्ट या बदलत्या गणवेशात स्वयंसेवक संघ शाखांवर लवकरच दिसू लागतील.अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या त्रिदिवसीय वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांनी दिली. प्रतिनिधी सभा हे रा. स्व. संघाचे सर्वोच्च धोरणात्मक मंडळ आहे. काळाच्या ओघात ताठर न राहता आम्हीही हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची फुलपॅन्ट वापरण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते येथे रविवारी एका पत्रपरिषदेत म्हणाले. १९२५मध्ये स्थापना झाल्यापासून ढगळ खाकी हाफपॅन्ट हा संघ स्वयंसेवकांचा ‘ट्रेडमार्क’ बनला होता. कालौघात सदऱ्यामध्ये जुजबी बदल होत गेला; मात्र खाकी हाफपॅन्ट कायम राहिली होती. ओळख बदलणार नाहीसध्या फुलपॅन्ट ही सामाजिक जीवनातील सर्वसाधारण बाब ठरली असून, आम्ही काळानुसार बदल केला आहे, असे भय्याजी जोशी यांनी म्हटले. तपकिरी रंगाची फुलपॅन्ट निवडण्यामागे विशिष्ट कारण नाही. ही पॅन्ट सहज उपलब्ध होत असून, दिसायला चांगली वाटते. येत्या चार-सहा महिन्यांत ही बाब सर्वसाधारण बनेल. मात्र संघ स्वयंसेवकांच्या ओळखीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)महिलांच्या मंदिर प्रवेशाचे समर्थन... : कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणे अयोग्य असल्याचे रा.स्व. संघाने स्पष्ट केले आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून अयोग्य प्रथा पाळल्या जात असून, महिलांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत ठाम सहमतीचा अभाव दिसून येतो. असे संवेदनशील मुद्दे चर्चेतून सोडविले जावेत, आंदोलनातून नव्हे, असेही ते म्हणाले. हजारो मंदिरांत महिलांना बिनदिक्कत प्रवेश आहे. काही ठिकाणीच प्रवेशबंदीचा मुद्दा आहे. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. अशा मंदिरांच्या व्यवस्थापनाने या बाबी समजून घ्यायला हव्यात, असे भय्याजी जोशी म्हणाले. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर येथे महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्यावरून काही महिला गटांनी आंदोलन चालविले आहे.समाजातील संपन्न वर्गाला आरक्षणाची गरज नाही. पात्र मागासवर्गीयांना प्रत्यक्षात आरक्षण कोट्याचे लाभ मिळतात काय? याबाबत अभ्यास करायला हवा, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. त्यांनी हरियाणातील हिंसक जाट आंदोलनाचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला. हिंदू समुदाय हा जातीभेदाला कारणीभूत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक न्याय विचारात घेता जाती निर्मूलन होण्याची गरज आहे. अशा वर्गाने आपला हक्क सोडत कमकुवत घटकांना मदत करायला हवी, असे त्यांनी सांगितले. प्रतिनिधीसभेने पारित केलेल्या सामाजिक सलोखा, शिक्षण व आरोग्यनिगा यावरील ठरावांची जोशी यांनी माहिती दिली.> ‘ड्रेस कोड’ बदलल्यावर संघाने आता आपली विचारसरणीसुद्धा बदलायला हवी. -दिग्विजय सिंह, काँग्रेस