शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कळंबोलीकरांना अखंडित वीज

By admin | Updated: June 11, 2016 02:42 IST

सुरळीत वीजपुरवठा करण्याकरिता रोडपाली येथे नवीन उपकेंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

कळंबोली : पायाभूत आराखडा योजनेंतर्गत कळंबोली आणि खारघरच्या काही भागाला सुरळीत वीजपुरवठा करण्याकरिता रोडपाली येथे नवीन उपकेंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दीड - दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे लवकरच कळंबोलीकरांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे. कळंबोली परिसराची लोकसंख्या दोन लाखांवर पोहचली आहे. या ठिकाणी जवळपास २२ हजार ग्राहक आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. कळंबोलीला तळोजा फिडर आणि या ठिकाणी असलेल्या उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. हे अंतर ६ कि.मी. असल्याने वीज गळती मोठी आहे. शिवाय जुनाट वाहिनी आणि गंजलेल्या पोलमुळे वारंवार तांत्रिक बिघाड होऊन बत्ती गुल होणे, ही नित्याचीच बाब आहे. विद्युत वाहिनीची लांबी असल्याने बिघाड शोधण्याकरिताही विलंब लागतो. त्यामुळे कळंबोलीकरांना नियमित वीज बिले भरूनही आजघडीला खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. या नोडमधील विजेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याचबरोबर कळंबोली नोडकरिता स्वतंत्र व्यवस्था असावी, असा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित होता. महावितरणने सिडको प्रशासनाकडे भूखंडाकरिता मागणी केली होती. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी भूखंड हस्तांतरित झाल्यावर महावितरणने उपकेंद्र उभारण्याचे काम हाती घेतले. तळोजा सबस्टेशनपासून कळंबोलीला भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे कळंबोलीकरांना दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत.तळोजा उपकेंद्रावरील भार कमी तळोजा उपकेंद्रातून निघणाऱ्या १००/२२ केव्ही वीज वाहिनीवरून कळंबोलीला वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्रावरून तळोजा परिसरातही वीज पुरविली जातेच त्याचबरोबर कळंबोलीचाही अतिरिक्त भार आहे. रोडपाली या ठिकाणी नवीन उपकेंद्रामुळे तळोजा उपकेंद्राचा भार कमी होईल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना आहे.>रोडपाली येथे नवीन सबस्टेशनसिडकोने कळंबोलीकरांची गैरसोय दूर करण्यासाठी रोडपाली सेक्टर २० या ठिकाणी १२९३ चौरस मीटरचा भूखंड वीज उपकेंद्राकरिता दिला आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून ही जागा महावितरणला वर्ग केल्यानंतर प्रत्यक्ष उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. प्रस्तावित उपकेंद्रातून कळंबोली वसाहत, लोह-पोलाद बाजार, कोपरा, सिमेन्स कंपनी, मार्बल बाजार, रोडपाली या भागाला वीजपुरवठा होणार आहे.>कळंबोली से.२० मध्ये महावितरणने उपकेंद्र उभारले आहे. हे काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण होऊन उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येईल. यामुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होईल. त्याचबरोबर तांत्रिक बिघाड होऊन वारंवार दुरुस्तीकरिता शटडाऊन घेण्याची गरज भासणार नाही. - डी. बी. गोसावी, कार्यकारी अभियंता, महावितरण, पनवेल विभाग