शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

पवार पंतप्रधान झाले नाहीत हे दुर्दैव : मुख्यमंत्री

By admin | Updated: December 22, 2015 02:02 IST

पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करणारा ठराव फडणवीस यांनी विधानसभेत तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत मांडला

नागपूर : शरद पवार हे देशाचे नेतृत्व करण्यासाठीचे गुण असलेले नेते आहेत. ते पहिले मराठी पंतप्रधान होतील, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तसे घडू शकले नाही, असे भावोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत काढले. पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करणारा ठराव फडणवीस यांनी विधानसभेत तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत मांडला. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी पवारांविषयीच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. पवार यांना पंतप्रधान बनण्याची संधी दोनवेळा आली होती पण ती हुकली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम म्हणाले. दोन्ही सभागृहांनी पवार यांचे अभीष्टचिंतन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्र घडविण्यात पवार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. ५५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी पक्षातीत प्रतिमा निर्माण केली. आज दुर्दैवाने राजकीय अस्पृश्यता आणि संवादहीनतेकडे आपण चाललो आहोत का, असा प्रश्न मला पडतो. एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष शत्रू असल्यासारखे वागतात. अशावेळी राज्याच्या वा देशाच्या व्यापक हितासाठी पक्षीय भेदांपलीकडे जाऊन विचार करणारे शरद पवार यांचे महत्त्व अधोरेखित होते. राज्याला राजकीय शत्रूत्व विसरण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, विचार पटणार नाहीत तेव्हा टोकाचा विरोध करू; पण राजकीय शत्रूत्व होता कामा नये. राज्याच्या व्यापक हितासाठी प्रसंगी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे. पवार यांनी हाच विचार नेहमी मांडला. पवार यांनी आपल्या अटी-शर्र्तींवरच राजकारण केले. स्वत:ला योग्य वाटले तेच केले. काँग्रेसमधून ते बाहेर पडले तेव्हा त्यांचा राजकीय अस्त होईल असा तर्क दिला गेला; पण ते टिकून राहिले,असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय विरोध हा मैत्रीच्या वा संबंधांच्या आड येऊ न देण्याचे शरद पवार यांचे कसब सगळ्यांनीच शिकण्याची गरज आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा चालताबोलता इतिहास आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शरद पवार यांनी दिलेल्या मोठेपणाच्या ऋणातून मी माझ्या चामड्याचे जोडे करून त्यांना घातले तरी उतराई होणार नाही. स्वत:ला कॅन्सरने ग्रासलेले असतानाही अखंड कार्यरत असलेले पवार यांच्यासाठी सामान्य माणसांची नाळ जुळून ठेवणे हेच औषध आहे. पवार यांनी सर्व पक्षांमध्ये जपलेल्या संबंधांचे अनुभव आव्हाड यांनी सांगितले. भाजपाचे आशिष शेलार यांनी पवार हे कमिटमेंट असलेले नेते आहेत, असे सांगितले.(प्रतिनिधी)