शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पवार पंतप्रधान झाले नाहीत हे दुर्दैव : मुख्यमंत्री

By admin | Updated: December 22, 2015 02:02 IST

पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करणारा ठराव फडणवीस यांनी विधानसभेत तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत मांडला

नागपूर : शरद पवार हे देशाचे नेतृत्व करण्यासाठीचे गुण असलेले नेते आहेत. ते पहिले मराठी पंतप्रधान होतील, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तसे घडू शकले नाही, असे भावोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत काढले. पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करणारा ठराव फडणवीस यांनी विधानसभेत तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत मांडला. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी पवारांविषयीच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. पवार यांना पंतप्रधान बनण्याची संधी दोनवेळा आली होती पण ती हुकली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम म्हणाले. दोन्ही सभागृहांनी पवार यांचे अभीष्टचिंतन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्र घडविण्यात पवार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. ५५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी पक्षातीत प्रतिमा निर्माण केली. आज दुर्दैवाने राजकीय अस्पृश्यता आणि संवादहीनतेकडे आपण चाललो आहोत का, असा प्रश्न मला पडतो. एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष शत्रू असल्यासारखे वागतात. अशावेळी राज्याच्या वा देशाच्या व्यापक हितासाठी पक्षीय भेदांपलीकडे जाऊन विचार करणारे शरद पवार यांचे महत्त्व अधोरेखित होते. राज्याला राजकीय शत्रूत्व विसरण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, विचार पटणार नाहीत तेव्हा टोकाचा विरोध करू; पण राजकीय शत्रूत्व होता कामा नये. राज्याच्या व्यापक हितासाठी प्रसंगी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे. पवार यांनी हाच विचार नेहमी मांडला. पवार यांनी आपल्या अटी-शर्र्तींवरच राजकारण केले. स्वत:ला योग्य वाटले तेच केले. काँग्रेसमधून ते बाहेर पडले तेव्हा त्यांचा राजकीय अस्त होईल असा तर्क दिला गेला; पण ते टिकून राहिले,असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय विरोध हा मैत्रीच्या वा संबंधांच्या आड येऊ न देण्याचे शरद पवार यांचे कसब सगळ्यांनीच शिकण्याची गरज आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा चालताबोलता इतिहास आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शरद पवार यांनी दिलेल्या मोठेपणाच्या ऋणातून मी माझ्या चामड्याचे जोडे करून त्यांना घातले तरी उतराई होणार नाही. स्वत:ला कॅन्सरने ग्रासलेले असतानाही अखंड कार्यरत असलेले पवार यांच्यासाठी सामान्य माणसांची नाळ जुळून ठेवणे हेच औषध आहे. पवार यांनी सर्व पक्षांमध्ये जपलेल्या संबंधांचे अनुभव आव्हाड यांनी सांगितले. भाजपाचे आशिष शेलार यांनी पवार हे कमिटमेंट असलेले नेते आहेत, असे सांगितले.(प्रतिनिधी)