शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

By admin | Updated: April 29, 2015 01:42 IST

‘अच्छे दिन’ येणार असल्याचे स्वप्न दाखविणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या राजवटीत बहुतांश योजनांचे अनुदान बंद केल्याने राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.

सुधीर लंके ल्ल पुणे‘अच्छे दिन’ येणार असल्याचे स्वप्न दाखविणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या राजवटीत बहुतांश योजनांचे अनुदान बंद केल्याने राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. संबंधित योजना बंद होणार असल्याने त्यांच्या नोकऱ्याही संकटात आल्या आहेत. राज्यांतील बहुतांश योजना केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त अनुदानातून चालतात. मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या राज्यातील बारा जिल्ह्यांत २००७ पासून ‘मागास क्षेत्र अनुदान निधी’ (बीआरजीएफ) योजना सुरू आहे. केंद्राच्या निर्देशांनुसार ही योजना ३१ आॅगस्टपासून बंद होत आहे. त्यामुळे त्यातील ४८३ कर्मचाऱ्यांचे काय?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूरसह इतर महापालिकांतही ‘राजीव आवास योजना’ चालवली जाते; परंतु त्याचेही अनुदान केंद्राने स्थगित केले आहे. राज्य शासनाने गत फेब्रुवारी पर्यंतच्या वेतनाची हमी घेतली. पुढील वेतन महापालिकांनी द्यावे, असे सरकारने कळविले. आता महापालिकांनी जबाबदारी न घेतल्यास या कर्मचाऱ्यांच्या रोजगावारही टांगती तलवार आहे. पंचायत राजच्या सशक्तीकरणासाठी अनुदानातून ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान’ योजना सुरू होती. या योजनेत अडीच हजारहून अधिक अभियंते तसेच प्रत्येक जिल्हा परिषदेत स्वतंत्र कक्ष होता. त्याचेही अनुदान अर्थसंकल्पात बंद करण्यात आले. राज्यात ई-ग्रामपंचायत योजनाही सुरू आहे. संग्राम कक्षामार्फत ती राबविली जाते. त्यात ग्रामपंचायतीत कंत्राटी तत्त्वावर डाटा एन्ट्री आॅपरेटर आहेत. या योजनेसह सर्व शिक्षा अभियानाचेही चालू आर्थिक वर्षाचे अनुदान आलेले नाही. त्यामुळे हे कर्मचारीही धास्तावले आहेत. च्ऐन उमेदीत शासनाच्या कंत्राटी सेवेत काम करणाऱ्या या तरुणांना पुढे इतरत्रही नोकऱ्या मिळत नाहीत. बेरोजगारी हटविण्याच्या घोषणा करणारे सरकार स्वत:च्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेरोजगार बनवित असल्याचे चित्र आहे.च्अनेक उच्चशिक्षित तरुण शासनाच्या योजनांत कंत्राटी तत्त्वांवर काम करतात. पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना सर्व सोयीसुविधा असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र नोकरीची काहीही हमी नसते.