शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्यात

By admin | Updated: June 28, 2016 02:12 IST

तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे.

नवी मुंबई : रेल्वे स्थानकालगतचे भुयारी मार्ग बनवताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे. बहुतांश भुयारी मार्ग पावसामुळे सध्या जलमय असून, सुमारे तीन ते चार फूट पाण्यातून प्रवाशांना जावे लागत आहे, तर वाहनांसाठी असलेले काही भुयारी मार्ग साचलेल्या पाण्यामुळे बंद पडत आहेत.पावसाची संततधार सुरू होवून अवघे चारच दिवस झाले असतानाच शहरातील बहुतांश रेल्वे स्थानकालगतचे भुयारी मार्ग जलमय झाले आहेत. त्याठिकाणी सुमारे तीन ते चार फूट उंचीपर्यंतचे पाणी साचले आहे. गाडी पकडण्यासाठी घाई गडबडीत येणारे प्रवासी भुयारी मार्गात साचलेले पाणी पाहून संताप व्यक्त करीत आहेत. परंतु स्थानकाबाहेर जाण्यासाठी अथवा आत येण्यासाठी भुयारी मार्गाशिवाय दुसरा पर्याय देखील नसल्यामुळे प्रवाशांना पाण्यातून चाचपडत वाट शोधत दुसरे टोक गाठावे लागत आहे. वाशी ते ऐरोली या ट्रान्स हार्बर मार्गावरील सहा स्थानकांसह खारघर, खांदेश्वर व पनवेल रेल्वे स्थानकालगतच्या भुयारी मार्गात प्रतिवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. मात्र सुमारे १५ वर्षांचा कालावधी होवून देखील त्यावर ठोस उपाय राबवण्यात प्रशासन अपयशी ठरलेले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी जिवाचा धोका पत्करत दररोज अनेकांना पाण्यातून जावे लागत आहे.कोपरखैरणेत वाहनांसाठी व पादचाऱ्यांसाठी असलेल्या दोन भुयारी मार्गात भिंत नाही. यामुळे एका ठिकाणी साचलेले पाणी दुसऱ्या मार्गात जावून दोन्ही भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. यावेळी पाण्याने ठरावीक उंची गाठल्यानंतर वाहनांची रहदारी पूर्णपणे ठप्प होत आहे. यामुळे रहिवासी भागातून ठाणे-बेलापूर मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना घणसोली, कोपरखैरणे दरम्यानच्या महापे पुलाचा पर्याय वापरावा लागत आहे. तर पादचाऱ्यांना पाण्यातूनच अथवा रेल्वे रूळ ओलांडून जिवाचा धोका पत्करावा लागत आहे. अखेर दिवस-रात्र विद्युत मोटर लावून त्याठिकाणी साचलेल्या पाण्याचा उपसा केला जातो. दिवसभर पाऊस असल्यास मशीनमध्येही बिघाड होण्याचे प्रकार घडत आहेत. >कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली या रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचले नाही तर प्रवासी आश्चर्य व्यक्त करतील, अशी परिस्थिती आहे. त्यात मागील काही वर्षांपासून सानपाडा भुयारी मार्गातही पाणी साचण्याला सुरवात झाली असून यंदाही दोन दिवस झालेल्या पावसामुळे त्याठिकाणी दोन फुटाएवढे पाणी साचले आहे. तुर्भे व रबाळे येथील भुयारी मार्ग असूनही ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर कोपरखैरणे, रबाळे व ऐरोली रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात देखील हीच परिस्थिती आहे.