शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्यात

By admin | Updated: June 28, 2016 02:12 IST

तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे.

नवी मुंबई : रेल्वे स्थानकालगतचे भुयारी मार्ग बनवताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे. बहुतांश भुयारी मार्ग पावसामुळे सध्या जलमय असून, सुमारे तीन ते चार फूट पाण्यातून प्रवाशांना जावे लागत आहे, तर वाहनांसाठी असलेले काही भुयारी मार्ग साचलेल्या पाण्यामुळे बंद पडत आहेत.पावसाची संततधार सुरू होवून अवघे चारच दिवस झाले असतानाच शहरातील बहुतांश रेल्वे स्थानकालगतचे भुयारी मार्ग जलमय झाले आहेत. त्याठिकाणी सुमारे तीन ते चार फूट उंचीपर्यंतचे पाणी साचले आहे. गाडी पकडण्यासाठी घाई गडबडीत येणारे प्रवासी भुयारी मार्गात साचलेले पाणी पाहून संताप व्यक्त करीत आहेत. परंतु स्थानकाबाहेर जाण्यासाठी अथवा आत येण्यासाठी भुयारी मार्गाशिवाय दुसरा पर्याय देखील नसल्यामुळे प्रवाशांना पाण्यातून चाचपडत वाट शोधत दुसरे टोक गाठावे लागत आहे. वाशी ते ऐरोली या ट्रान्स हार्बर मार्गावरील सहा स्थानकांसह खारघर, खांदेश्वर व पनवेल रेल्वे स्थानकालगतच्या भुयारी मार्गात प्रतिवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. मात्र सुमारे १५ वर्षांचा कालावधी होवून देखील त्यावर ठोस उपाय राबवण्यात प्रशासन अपयशी ठरलेले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी जिवाचा धोका पत्करत दररोज अनेकांना पाण्यातून जावे लागत आहे.कोपरखैरणेत वाहनांसाठी व पादचाऱ्यांसाठी असलेल्या दोन भुयारी मार्गात भिंत नाही. यामुळे एका ठिकाणी साचलेले पाणी दुसऱ्या मार्गात जावून दोन्ही भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. यावेळी पाण्याने ठरावीक उंची गाठल्यानंतर वाहनांची रहदारी पूर्णपणे ठप्प होत आहे. यामुळे रहिवासी भागातून ठाणे-बेलापूर मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना घणसोली, कोपरखैरणे दरम्यानच्या महापे पुलाचा पर्याय वापरावा लागत आहे. तर पादचाऱ्यांना पाण्यातूनच अथवा रेल्वे रूळ ओलांडून जिवाचा धोका पत्करावा लागत आहे. अखेर दिवस-रात्र विद्युत मोटर लावून त्याठिकाणी साचलेल्या पाण्याचा उपसा केला जातो. दिवसभर पाऊस असल्यास मशीनमध्येही बिघाड होण्याचे प्रकार घडत आहेत. >कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली या रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचले नाही तर प्रवासी आश्चर्य व्यक्त करतील, अशी परिस्थिती आहे. त्यात मागील काही वर्षांपासून सानपाडा भुयारी मार्गातही पाणी साचण्याला सुरवात झाली असून यंदाही दोन दिवस झालेल्या पावसामुळे त्याठिकाणी दोन फुटाएवढे पाणी साचले आहे. तुर्भे व रबाळे येथील भुयारी मार्ग असूनही ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर कोपरखैरणे, रबाळे व ऐरोली रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात देखील हीच परिस्थिती आहे.